शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

आयुध निर्माणी कमी संख्याबळावर चालविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

जवाहरनगर : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान सामूहिक क्षेत्रातील कंपन्या, कारखाने येथे अस्तित्वात असलेल्या संख्येपेक्षा निम्म्या ...

जवाहरनगर : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान सामूहिक क्षेत्रातील कंपन्या, कारखाने येथे अस्तित्वात असलेल्या संख्येपेक्षा निम्म्या कामगारांद्वारे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आयुध निर्माणी, भंडारा येथे कामगारांची उपस्थिती जवळजवळ शंभर टक्के असल्याचे कामगार संघटनांच्या निदर्शनास आले. त्यानुसार कमी संख्येवर आयुध निर्माणी येथे काम करण्यात यावे, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना इंटक युनियनतर्फे देण्यात आले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारने औद्योगिक कारखान्यांमध्ये बाहेरून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनाई केली. औद्योगिक क्षेत्र ५०-५० टक्क्यांवर, तर सरकारी कार्यालये १५ टक्के कर्मचारी संख्याबळावर चालविण्याचे दिशानिर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु आयुध निर्माणी, भंडारा, जवाहरनगरमध्ये आजच्या परिस्थितीत एकूण स्थायी कर्मींचे संख्याबळ २२०० पेक्षा जास्त असून सरकारच्या दिशानिर्देशानुसार १००० पेक्षा जास्त कर्मी अशा कोरोना परिस्थितीत निर्माणीत एकत्र येतात. त्यात कंत्राटी मजुरांची पण अधिक भर पड़त आहे.

येथील कारखान्यात कामाचा प्रकार सामूहिक व रसायनांचा असून काम झाल्यावर सर्व कर्मचारी आपल्या विश्राम / चेंजिग रूममध्ये एकत्र येतात. परिणामी संक्रमणाचा जास्त प्रसार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत निर्माणी परिसरातमध्ये ५५० पेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले असून, आतापर्यंत आठ कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान ‘न्यू एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी वर्कर्स युनियन,’ भंडारा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनात नमूद केले की, सरकारी कार्यालयाप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातही १५ टक्क्यांवर चालविण्यात यावे. कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यास मदत होईल. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना युनियनचे महासचिव चंद्रशील नागदेवे, कार्यकारी अध्यक्ष विकास बावनकुळे, नाना जेठे, उमाकांत तिवारी, मोटघरे गुरुजी, रंजित बागडे, कुलदीप खोब्रागडे, एकनाथ कुंजेवार, सुशील बागडे, सरोज चकोले, इ. यांनी दिले.