शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

आयुध निर्माणी कमी संख्याबळावर चालविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

जवाहरनगर : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान सामूहिक क्षेत्रातील कंपन्या, कारखाने येथे अस्तित्वात असलेल्या संख्येपेक्षा निम्म्या ...

जवाहरनगर : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान सामूहिक क्षेत्रातील कंपन्या, कारखाने येथे अस्तित्वात असलेल्या संख्येपेक्षा निम्म्या कामगारांद्वारे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आयुध निर्माणी, भंडारा येथे कामगारांची उपस्थिती जवळजवळ शंभर टक्के असल्याचे कामगार संघटनांच्या निदर्शनास आले. त्यानुसार कमी संख्येवर आयुध निर्माणी येथे काम करण्यात यावे, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना इंटक युनियनतर्फे देण्यात आले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारने औद्योगिक कारखान्यांमध्ये बाहेरून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनाई केली. औद्योगिक क्षेत्र ५०-५० टक्क्यांवर, तर सरकारी कार्यालये १५ टक्के कर्मचारी संख्याबळावर चालविण्याचे दिशानिर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु आयुध निर्माणी, भंडारा, जवाहरनगरमध्ये आजच्या परिस्थितीत एकूण स्थायी कर्मींचे संख्याबळ २२०० पेक्षा जास्त असून सरकारच्या दिशानिर्देशानुसार १००० पेक्षा जास्त कर्मी अशा कोरोना परिस्थितीत निर्माणीत एकत्र येतात. त्यात कंत्राटी मजुरांची पण अधिक भर पड़त आहे.

येथील कारखान्यात कामाचा प्रकार सामूहिक व रसायनांचा असून काम झाल्यावर सर्व कर्मचारी आपल्या विश्राम / चेंजिग रूममध्ये एकत्र येतात. परिणामी संक्रमणाचा जास्त प्रसार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत निर्माणी परिसरातमध्ये ५५० पेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले असून, आतापर्यंत आठ कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान ‘न्यू एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी वर्कर्स युनियन,’ भंडारा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनात नमूद केले की, सरकारी कार्यालयाप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातही १५ टक्क्यांवर चालविण्यात यावे. कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यास मदत होईल. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना युनियनचे महासचिव चंद्रशील नागदेवे, कार्यकारी अध्यक्ष विकास बावनकुळे, नाना जेठे, उमाकांत तिवारी, मोटघरे गुरुजी, रंजित बागडे, कुलदीप खोब्रागडे, एकनाथ कुंजेवार, सुशील बागडे, सरोज चकोले, इ. यांनी दिले.