शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आयुध निर्माणी कमी संख्याबळावर चालविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST

जवाहरनगर : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान सामूहिक क्षेत्रातील कंपन्या, कारखाने येथे अस्तित्वात असलेल्या संख्येपेक्षा निम्म्या ...

जवाहरनगर : केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या कोविड-१९ प्रादुर्भावादरम्यान सामूहिक क्षेत्रातील कंपन्या, कारखाने येथे अस्तित्वात असलेल्या संख्येपेक्षा निम्म्या कामगारांद्वारे काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र आयुध निर्माणी, भंडारा येथे कामगारांची उपस्थिती जवळजवळ शंभर टक्के असल्याचे कामगार संघटनांच्या निदर्शनास आले. त्यानुसार कमी संख्येवर आयुध निर्माणी येथे काम करण्यात यावे, या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना इंटक युनियनतर्फे देण्यात आले.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारने औद्योगिक कारखान्यांमध्ये बाहेरून ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनाई केली. औद्योगिक क्षेत्र ५०-५० टक्क्यांवर, तर सरकारी कार्यालये १५ टक्के कर्मचारी संख्याबळावर चालविण्याचे दिशानिर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. परंतु आयुध निर्माणी, भंडारा, जवाहरनगरमध्ये आजच्या परिस्थितीत एकूण स्थायी कर्मींचे संख्याबळ २२०० पेक्षा जास्त असून सरकारच्या दिशानिर्देशानुसार १००० पेक्षा जास्त कर्मी अशा कोरोना परिस्थितीत निर्माणीत एकत्र येतात. त्यात कंत्राटी मजुरांची पण अधिक भर पड़त आहे.

येथील कारखान्यात कामाचा प्रकार सामूहिक व रसायनांचा असून काम झाल्यावर सर्व कर्मचारी आपल्या विश्राम / चेंजिग रूममध्ये एकत्र येतात. परिणामी संक्रमणाचा जास्त प्रसार होण्याची चिन्हे दिसत आहेत. आतापर्यंत निर्माणी परिसरातमध्ये ५५० पेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले असून, आतापर्यंत आठ कर्मचारी मृत्युमुखी पडलेले आहेत. परिसरातील लोकांमध्ये भीतीचे दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. दरम्यान ‘न्यू एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी वर्कर्स युनियन,’ भंडारा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनात नमूद केले की, सरकारी कार्यालयाप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातही १५ टक्क्यांवर चालविण्यात यावे. कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यास मदत होईल. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना युनियनचे महासचिव चंद्रशील नागदेवे, कार्यकारी अध्यक्ष विकास बावनकुळे, नाना जेठे, उमाकांत तिवारी, मोटघरे गुरुजी, रंजित बागडे, कुलदीप खोब्रागडे, एकनाथ कुंजेवार, सुशील बागडे, सरोज चकोले, इ. यांनी दिले.