भंडारा : यावर्षीच्या हंगामात अतवृष्टीने कहर केला. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. परंतु भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही. जो जनतेचे सुख दु:ख जाणत नाही, पालकत्वाची जबाबदारी सांभाळता येत नाही, अशांना पालकमंत्री पद देता तरी कशाला, असा घणाघाती आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला. पत्रपरिषदेला हेमंत बांडेबुचे, सुनील कुरंजेकर, अनिल गायधने उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, २८ नोव्हेंबर २0१0 मध्ये भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हापासून केवळ १७ भेटी त्यांनी दिल्या आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण समारंभाला ते आले नाहीत. याशिवाय मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा जिल्ह्यात आले तरीही ते पालकमंत्री या नात्याने येत नाहीत, तरीसुद्धा त्यांच्या पक्षात ते पदावर कायम आहेत. ती त्यांच्या पक्षांतर्गत बाब असली तरी सामान्यांचे प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून मार्गी लागतात. या समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असतात. त्यांच्या न येण्यामुळे नियोजन समितीची सभा होत नाही. परिणामी कामे रेंगाळतात, असा आरोपही त्यांनी केला. १३.९६ कोटी थकीत पालकमंत्री रणजित कांबळे यांच्याकडे पाच विभागाची जबाबदारी आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे ते राज्यमंत्री आहेत. असे असताना जिल्ह्यात धान खरेदी केंद्र बंद आहेत. याबाबत पणन विभागाला विचारले तर ते अन्न पुरवठा विभागाकडे बोट दाखवितात. अन्न पुरवठा विभागाला विचारले तर ते शासनाकडे बोट दाखवितात. जिल्ह्यात सरकारचे प्रतिनिधीच असताना सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे असा सवालही त्यांनी केला. ८ मे २0१४ रोजी रोजी नवीन शासन निर्णयात धान खरेदी केंद्र बंद करण्यात यावे, असे म्हटले आहे. मुळात अधिकार्यांनी धान खरेदी केंद्र सुरुकेले नाहीत रत बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शासनाचे बोनस शेतकर्यांऐवजी व्यापार्यांना मिळत आहे. सन २0१३-१४ मध्ये ‘अ’ श्रेणी व साधारण धान ५,७७,९७0 क्विंटल खरेदी करण्यात आला. त्याची किंमत ९0 कोटी ९0 ला ९९,८२८ ईतकी होते. त्यातील १३ कोटी ९६ लाख रुपयांची शेतकर्यांची रक्कम थकीत आहे. चार वर्षात एकदाही बैठक नाही भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी शेतकर्यांना मिळाले नाही. तरीसुद्धा पालकमंत्र्यांनी चार वर्षात एकदाही या प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी बैठक घेतली नाही. १४ तासांचे भारनियमन जिल्ह्यात ८३ फिडर आहेत. दररोज मोठय़ा प्रमाणात फिडरनिहाय भारनियमन सुरू आहे. कुठे तीन तास तर कुठे १२ तासांचे भारनियमन सुरु आहे. कृषी पंपाचे चार ते १४ तासांचे भारनियमन सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
विकासकामे खोळंबण्याला पालकमंत्र्यांची दिरंगाई कारणीभूत
By admin | Updated: May 27, 2014 00:34 IST