शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

विकासकामे खोळंबण्याला पालकमंत्र्यांची दिरंगाई कारणीभूत

By admin | Updated: May 27, 2014 00:34 IST

यावर्षीच्या हंगामात अतवृष्टीने कहर केला. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. परंतु भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही. जो जनतेचे सुख दु:ख जाणत नाही,

भंडारा : यावर्षीच्या हंगामात अतवृष्टीने कहर केला. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. परंतु भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही. जो जनतेचे सुख दु:ख जाणत नाही, पालकत्वाची जबाबदारी सांभाळता येत नाही, अशांना पालकमंत्री पद देता तरी कशाला, असा घणाघाती आरोप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला. पत्रपरिषदेला हेमंत बांडेबुचे, सुनील कुरंजेकर, अनिल गायधने उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले, २८ नोव्हेंबर २0१0 मध्ये भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हापासून केवळ १७ भेटी त्यांनी दिल्या आहे. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण समारंभाला ते आले नाहीत. याशिवाय मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा जिल्ह्यात आले तरीही ते पालकमंत्री या नात्याने येत नाहीत, तरीसुद्धा त्यांच्या पक्षात ते पदावर कायम आहेत. ती त्यांच्या पक्षांतर्गत बाब असली तरी सामान्यांचे प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून मार्गी लागतात.

या समितीचे पालकमंत्री अध्यक्ष असतात. त्यांच्या न येण्यामुळे नियोजन समितीची सभा होत नाही. परिणामी कामे रेंगाळतात, असा आरोपही त्यांनी केला.

१३.९६ कोटी थकीत

पालकमंत्री रणजित कांबळे यांच्याकडे पाच विभागाची जबाबदारी आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे ते राज्यमंत्री आहेत. असे असताना जिल्ह्यात धान खरेदी केंद्र बंद आहेत. याबाबत पणन विभागाला विचारले तर ते अन्न पुरवठा विभागाकडे बोट दाखवितात.

अन्न पुरवठा विभागाला विचारले तर ते शासनाकडे बोट दाखवितात. जिल्ह्यात सरकारचे प्रतिनिधीच असताना सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचे असा सवालही त्यांनी केला. ८ मे २0१४ रोजी रोजी नवीन शासन निर्णयात धान खरेदी केंद्र बंद करण्यात यावे, असे म्हटले आहे.

मुळात अधिकार्‍यांनी धान खरेदी केंद्र सुरुकेले नाहीत रत बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शासनाचे बोनस शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांना मिळत आहे. सन २0१३-१४ मध्ये ‘अ’ श्रेणी व साधारण धान ५,७७,९७0 क्विंटल खरेदी करण्यात आला. त्याची किंमत ९0 कोटी ९0 ला ९९,८२८ ईतकी होते. त्यातील १३ कोटी ९६ लाख रुपयांची शेतकर्‍यांची रक्कम थकीत आहे.

चार वर्षात एकदाही बैठक नाही

भंडारा जिल्ह्यात गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी शेतकर्‍यांना मिळाले नाही. तरीसुद्धा पालकमंत्र्यांनी चार वर्षात एकदाही या प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी बैठक घेतली नाही.

१४ तासांचे भारनियमन

जिल्ह्यात ८३ फिडर आहेत. दररोज मोठय़ा प्रमाणात फिडरनिहाय भारनियमन सुरू आहे. कुठे तीन तास तर कुठे १२ तासांचे भारनियमन सुरु आहे. कृषी पंपाचे चार ते १४ तासांचे भारनियमन सुरू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)