शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

शेत जमिनीचा कस झाला कमी

By admin | Updated: January 11, 2015 22:46 IST

शेती करायची की नाही, असा प्रश्न निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना पडत आहे. शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास फायदा मिळेल या आशेने आधुनिक शेतीची पद्धत विकसित झाली,

खराशी : शेती करायची की नाही, असा प्रश्न निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना पडत आहे. शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास फायदा मिळेल या आशेने आधुनिक शेतीची पद्धत विकसित झाली, मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे.अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाणांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशातील अनेक कंपन्यांत चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहे. यासाठी किटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे भाजी, फळे इत्यादी विषाक्त होत आहे. सर्व पिकांवर उत्पादनाच्या दृष्टीने फवारणी करा, असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत.देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रूपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणाला गरजच वाटत नाही. काही कालावधित आधुनिक शेतीमुळे भरघोष उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धानाचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.विशेष म्हणजे रसायनांचे दूष्परिणाम लक्षात आल्यानंतर कमी कीटकनाशके वापरून जास्तीत जास्त फायदा व्हावा, या संकल्पनेतून सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. आता सेंद्रीय खतांचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र या खतासंदर्भातही शेतकरी अनभिज्ञ आहे. काही ठिकाणी या शेतीचा वापर करून केवळ व्यापारी नफा मिळवित असल्याचे दिसते. त्यामुळे या आधुनिक शेतीच्या नादात जमिनीचा कस कमी घेवून शेतात विषाचीच फवारणी होत असल्याने शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)