शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

शेत जमिनीचा कस झाला कमी

By admin | Updated: January 11, 2015 22:46 IST

शेती करायची की नाही, असा प्रश्न निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना पडत आहे. शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास फायदा मिळेल या आशेने आधुनिक शेतीची पद्धत विकसित झाली,

खराशी : शेती करायची की नाही, असा प्रश्न निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना पडत आहे. शेतीत आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास फायदा मिळेल या आशेने आधुनिक शेतीची पद्धत विकसित झाली, मात्र या आधुनिक शेतीच्या नादात शेतात अक्षरक्ष: विषाची फवारणी होत असल्याचे वास्तव आहे.अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाणांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशातील अनेक कंपन्यांत चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहे. यासाठी किटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे भाजी, फळे इत्यादी विषाक्त होत आहे. सर्व पिकांवर उत्पादनाच्या दृष्टीने फवारणी करा, असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशक मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत.देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रूपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणाला गरजच वाटत नाही. काही कालावधित आधुनिक शेतीमुळे भरघोष उत्पन्न मिळाले असले तरी हायब्रिड बियाणांमुळे धानाचे उत्पादन घटले आहे. आधुनिक शेतीमधील किटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.विशेष म्हणजे रसायनांचे दूष्परिणाम लक्षात आल्यानंतर कमी कीटकनाशके वापरून जास्तीत जास्त फायदा व्हावा, या संकल्पनेतून सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. आता सेंद्रीय खतांचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र या खतासंदर्भातही शेतकरी अनभिज्ञ आहे. काही ठिकाणी या शेतीचा वापर करून केवळ व्यापारी नफा मिळवित असल्याचे दिसते. त्यामुळे या आधुनिक शेतीच्या नादात जमिनीचा कस कमी घेवून शेतात विषाचीच फवारणी होत असल्याने शेती करावी तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. (वार्ताहर)