शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?
3
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
4
लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!
5
देशात पहिली...! ओलाची रोडस्टर मोटरसायकल पुण्यात आली; कुठे पहायला मिळणार?
6
भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना
7
"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा
8
VIDEO: थोडक्यात वाचली जिनिलिया, कारमध्ये बसत असताना ड्रायव्हरकडून नकळत झाली चूक अन्...
9
कोर्टातून पळून गेलेला आरोपी मनसेच्या कार्यालयात पोहोचला! नेत्याला दिली धमकी, मुंबईत घडली धक्कादायक घटना 
10
साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!
11
भारताची ताकद पाहून पाकिस्तान घाबरला, देशाच्या सुरक्षेसाठी उचललं मोठं पाऊल! म्हणाला "आमचा शेजारी खतरनाक.."
12
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
13
खासदार असलेली ही अभिनेत्री घेणार घटस्फोट? Ex गर्लफ्रेंडसोबत पतीच्या वाढत्या संबंधामुळे नात्यात दुरावा
14
ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण
15
२१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत
16
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
17
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
18
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
19
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच

निसर्गाच्या वक्रदृष्टीने उन्हाळी धान उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:34 IST

भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रबी मालासाठी उपलब्ध नसलेल्या बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप ...

भंडारा जिल्ह्याची ओळख ही उद्योगविरहित, सिंचनाच्या सोयींचा अभाव, रबी मालासाठी उपलब्ध नसलेल्या बाजारपेठेचा जिल्हा म्हणून आहे. मुख्य पीक खरीप असल्याने जवळपास ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेती म्हणजेच सर्वस्व असल्याने येथील शेतकऱ्यांचे संसार हे येणाऱ्या पिकावरच अवलंबून असते. अशातही अत्यल्प व कवडीमोल भाव यामुळे सर्व चिंतेत आहेत. शासनस्तरावरून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नाहक कागदपत्रे व कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत असल्याने सामान्यांचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.

जिल्ह्यात असलेल्या खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढलेली असली तरीही शेतकऱ्यांना चुकाऱ्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी पडक्या दरात धानाची विक्री करीत आहे. अडत्याकडे धानांच्या भावांचे बोर्डसुध्दा नाहीत.

त्यामुळे अडत्याने जो भाव सांगितला, त्याच भावात आपला माल विकल्याशिवाय गत्यंतर नसल्याने शेतकरी वर्ग अधिकच खचत असून जीवनाचा अंत स्वीकारण्यास धजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. म्हणूनच पाच एकर शेती असलेला शेतकरी हा मजुरापेक्षाही दु:खी आहे. तेव्हा 'बळी' न पडता बळीचे राज्य येण्यासाठी शासनाने कंबर कसून अभय देण्याची गरज आहे.

यावर्षी ऐन धान पीक कापणी योग्य असताना पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात घट आली आहे. एकरी कमी उत्पादन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी विलंबाने होत आहे. आपला नंबर कधी येणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.