शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

पेरणीपूर्वी शेतमालाचे हमीभाव जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

भंडारा : खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यापूर्वी केंद्र सरकारने शेतमालाच्या खर्चावर आधारित हमीभाव तत्काळ जाहीर करावा, ...

भंडारा : खरीप हंगामातील पिकांची पेरणी करण्यापूर्वी केंद्र सरकारने शेतमालाच्या खर्चावर आधारित हमीभाव तत्काळ जाहीर करावा, अशी मागणी अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी मोहाडी तालुकाध्यक्ष राजेश हटवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांव्दारे पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

केंद्र सरकारने दरवर्षी खरीप हंगामात पेरणीपूर्वी शेतमालाचे हमीभाव जाहीर केल्यानंतर शेतकरी बांधव खरिपाच्या पेरणीचे पूर्व नियोजन करून विविध भागातील शेतकरी धान,कापूस,सोयाबीन, तूर, ज्वारी,मका यासारख्या इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. त्यामुळे केंद्र सरकारने पेरणीपूर्वी शेतमालाचे खर्चावर आधारित हमीभाव जाहीर करणे ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे. परंतु पावसाळा ऋतूला सुरुवात झाली, तरीही केंद्र सरकारने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले नाही. त्यामुळे या वर्षी पेरणीच्या हंगामात कोणत्या पिकाला चांगला दर मिळेल, याची माहिती शेतकरी बांधवांकडे नसल्याने शेतात कोणत्या पिकाच्या वाणाची पेरणी करावी, असा प्रश्न आ वासून उभा ठाकला आहे.

केंद्र सरकारने पेरणीपूर्वी शेतमालाचे खर्चावर आधारित हमीभाव जाहीर न केल्याने शेतकरी बांधवांच्या अडचणी वाढल्या असून ते त्रस्त झाले आहेत. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाचे काम रेंगाळले असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. केंद्र सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी बांधवांना त्रास सहन करावा लागत आहे.