शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: December 2, 2014 23:01 IST

शहर व भंडारा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसिल कार्यालयासमोर निदर्शने व धरणे देण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

भंडारा काँग्रेस कमेटीचे धरणे आंदोलन: तहसलिदार यांना निवेदन सादरभंडारा : शहर व भंडारा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसिल कार्यालयासमोर निदर्शने व धरणे देण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनात नमुद केल्याप्रमाणे अस्मानी संकटामुळे राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे उत्पादनच आले नसून कापसाचे उत्पादन अत्यल्प आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसून राज्य सरकारने वेळीच व पुरेसे कापूस खरेदी केंद्रही उघडले नाहीत. धानाचा शेतकऱ्यांनाही अल्प पावसामुळे चांगले उत्पादन मिळालेले नाही. ज्या भागात बऱ्याचपैकी धान उगवले होते. तिथे अतिवृष्टीमुळे पीक गमवावे लागले. राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप योग्य भाव ठरवून दिलेला नाही. अवकाळी पाऊस व वादळामुळे फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे विदर्भातील जिल्हयामध्येही दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर आहे. या परिस्थितीत सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये तर कापसाला ६,००० रुपयांचा भाव ठरवून बाजार भावावरील रक्कम राज्य शासनाने बोनस म्हणून देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. ओलीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी आहे. राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व रोजगार तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन देण्याची मागणी ही करण्यात आली आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असल्यामुळे शेती कर्ज व विज बिल माफ करण्याची नितांत गरज आहे. वीज बिल माफ केल्यास शेतकऱ्यांना काही मदत होईल.अहमदनगर जिल्हयातील जवखेडा येथे दलित समाजाच्या जाधव कुटूंबातील तीन जनांची एक महिन्यापूर्वी अत्यंत क्रूर पध्दतीने निर्घुण हत्या करण्यात आली. पंरतु अजुनही आरोपींना अटक झालेली नाही. राज्याचा पोलिस विभाग आरोपींना अटक करण्यास असमर्थ असेल तर सरकारने ही चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारकडे बहुमत नाही. विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली. भाजप पुन्हा बहुमत सिध्द करीत नाही. तोपर्यंत त्यांचे राज्यसरकार बरखास्त करुन त्यांनी घेतलेले सर्व निर्णय स्थगित करण्याची मागणी आहे.या मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रेमसागर गणविर, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, राजकुमार मेश्राम, अजय गडकरी, अनिक जमा पटेल, शमिम शेख, पृथ्वीराज तांडेकर, आनंद तिरपुडे, मुकुंद साखरकर, इमरान पटेल, शर्मिल बोदेले, मंगेश हुमने, पिसाराम चोपकर, चोलाराम गायधने, रामभाऊ कडव, राकेश कडबे, पराग खोब्रागडे, निखिल कुंभलकर, जय बोरकर, शमिम पठान, भावना शेंडे, भारती लिमजे, कविता चाचेरे, हिरालाल मस्के यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)