शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: December 2, 2014 23:01 IST

शहर व भंडारा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसिल कार्यालयासमोर निदर्शने व धरणे देण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

भंडारा काँग्रेस कमेटीचे धरणे आंदोलन: तहसलिदार यांना निवेदन सादरभंडारा : शहर व भंडारा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील तहसिल कार्यालयासमोर निदर्शने व धरणे देण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनात नमुद केल्याप्रमाणे अस्मानी संकटामुळे राज्याच्या बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे उत्पादनच आले नसून कापसाचे उत्पादन अत्यल्प आहे. कापसाला योग्य भाव मिळत नसून राज्य सरकारने वेळीच व पुरेसे कापूस खरेदी केंद्रही उघडले नाहीत. धानाचा शेतकऱ्यांनाही अल्प पावसामुळे चांगले उत्पादन मिळालेले नाही. ज्या भागात बऱ्याचपैकी धान उगवले होते. तिथे अतिवृष्टीमुळे पीक गमवावे लागले. राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप योग्य भाव ठरवून दिलेला नाही. अवकाळी पाऊस व वादळामुळे फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे विदर्भातील जिल्हयामध्येही दुष्काळी परिस्थिती असून या दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर आहे. या परिस्थितीत सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजार रुपये तर कापसाला ६,००० रुपयांचा भाव ठरवून बाजार भावावरील रक्कम राज्य शासनाने बोनस म्हणून देण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. ओलीत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना व फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी आहे. राज्यात दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व रोजगार तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करुन देण्याची मागणी ही करण्यात आली आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात असल्यामुळे शेती कर्ज व विज बिल माफ करण्याची नितांत गरज आहे. वीज बिल माफ केल्यास शेतकऱ्यांना काही मदत होईल.अहमदनगर जिल्हयातील जवखेडा येथे दलित समाजाच्या जाधव कुटूंबातील तीन जनांची एक महिन्यापूर्वी अत्यंत क्रूर पध्दतीने निर्घुण हत्या करण्यात आली. पंरतु अजुनही आरोपींना अटक झालेली नाही. राज्याचा पोलिस विभाग आरोपींना अटक करण्यास असमर्थ असेल तर सरकारने ही चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारकडे बहुमत नाही. विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली. भाजप पुन्हा बहुमत सिध्द करीत नाही. तोपर्यंत त्यांचे राज्यसरकार बरखास्त करुन त्यांनी घेतलेले सर्व निर्णय स्थगित करण्याची मागणी आहे.या मागण्या मान्य न झाल्यास काँग्रेस पक्षाने तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रेमसागर गणविर, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, राजकुमार मेश्राम, अजय गडकरी, अनिक जमा पटेल, शमिम शेख, पृथ्वीराज तांडेकर, आनंद तिरपुडे, मुकुंद साखरकर, इमरान पटेल, शर्मिल बोदेले, मंगेश हुमने, पिसाराम चोपकर, चोलाराम गायधने, रामभाऊ कडव, राकेश कडबे, पराग खोब्रागडे, निखिल कुंभलकर, जय बोरकर, शमिम पठान, भावना शेंडे, भारती लिमजे, कविता चाचेरे, हिरालाल मस्के यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)