शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दादासाहेबांनी जपले भंडाऱ्याशी ऋणानुबंध

By admin | Updated: July 26, 2015 00:58 IST

बिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा.सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे भंडारा जिल्ह्याशी जवळीक ऋणानुबंध होते.

आठवणींना उजाळा : आंबेडकरी चळवळीचे केले कुशल नेतृत्व देवानंद नंदेश्वर  भंडाराबिहार आणि केरळचे माजी राज्यपाल, विधानपरिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा.सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचे भंडारा जिल्ह्याशी जवळीक ऋणानुबंध होते. त्यांचे जिल्हावासीयांसोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध व आंबेडकर चळवळीसाठी केलेले कार्य जिल्हावासीय कधीही विसरू शकणार नाहीत. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दादासाहेबांकडे रिपब्लिकन पक्षाची धुरा आली. ही धुरा त्यांनी समर्थपणे व झुंझारवृत्तीने सांभाळली. लहाणपणापासूनच ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत होते. सन १९६२ पासून भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी शहरवासीयांची इच्छा होती. या कार्यासाठी अनेकांचा विरोध होता. मात्र विरोध झुगारून दादासाहेबांनी जागेसाठी यथोचित प्रयत्न केले. त्यांनी जागेसाठी शासनाकडून परवानगी मागितली आणि अखेर ती परवानगी मिळाली. सन २००२ मध्ये भूमिपूजन तत्कालिन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानी खा. रा.सू. गवई उपस्थित होते. भूमिपूजनानंतर पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी त्यांची धावपळ वाखाणण्याजोगी होती. अथक प्रयत्नानंतर पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. त्याचे थाटात उद्घाटनही करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याची दादासाहेबांची तीव्र इच्छा होती. मात्र वृद्धापकाळ व आजारापणामुळे ते या सोहळ्याला उपस्थित झाले नव्हते. याची खंत ते नेहमीच कार्यकर्त्यांकडे व्यक्त करीत. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ‘कसेल त्याची जमीन, राहील त्याचे घर’ असा नारा दिला होता. त्यावेळी दादासाहेबांनी ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. भूमिहिनांना जमीन मिळण्यात यावी, यासाठी दादासाहेबांनी मोठी चळवळ उभी केली. विदर्भातील संपूर्ण जबाबदारी दादासाहेबांकडे होती. अनेकदा धरणे, मोर्चे, आंदोलन, सत्याग्रह करण्यात आले. यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे होते. हजारो कार्यकर्त्यांसह त्यांना कारागृहात डांबण्यात आले होते. अखेर शासनाने आंदोलनाची दखल घेत भूमिहिनांना जमीन देण्याचा कायदा केला. त्यांना विदर्भ केसरी म्हणूनही ओळखले जाते. १९५४ च्या पोटनिवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारासाठी ते पायी फिरले. मजुरीची कामे मिळावी, यासाठी त्यांनी रोजगार हमी कायदा ही योजना राबविली. भंडारा शहरानजीक असलेल्या हत्तीडोई दशबल पहाडीच्या सौंदर्यीकरण व पर्यटनस्थळासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अनेक विहारांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले. पवनी येथील महासमाधीस्तूप बांधकामासाठी प्रयत्न करून उद्घाटनासाठी ते आवर्जून उपस्थित होते. सामंजस्य, समतोल विचारांचा, अचूक मार्गदर्शन, हळव्या मनाचा, परंतु झुंझार वृत्तीचा संघटक आणि बाबासाहेबांची चळवळ सर्वसामान्यांमध्ये पोहचविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आंबेडकरी समाज कधीच विसरू शकणार नाही.