शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 00:44 IST

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ६७ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज माफीचा लाभ होणार असून पीक कर्ज वाटप योग्यप्रकारे केले जाणार आहे.

नाना पटोले : ३२७ कोटींची होणार जिल्ह्यात कर्जमाफी लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ६७ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज माफीचा लाभ होणार असून पीक कर्ज वाटप योग्यप्रकारे केले जाणार आहे. यासोबतच नवीन कर्ज वाटपासंबंधीचे प्रस्ताव बँकांनी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दुबार पेरणीची परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होईल तेथे बियाणे वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, जिल्हा बँक व्यवस्थापक संजय बरडे यावेळी उपस्थित होते. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ३० जून २०१६ रोजी अल्प आणि अत्यल्प थकबाकीदार सभासदांची एकूण संख्या २९ हजार ९६५ असून थकबाकीची रक्कम १८५ कोटी ६९ लाख एवढी आहे. यापैकी दीड लाखांच्या आतील थकबाकीदार सभासदांची संख्या २६ हजार ८२५ असून थकबाकीची रक्कम १४५ कोटी ८६ लाख एवढी आहे. तर ३१४० सभासद दीड लाखाच्यावर असून थकबाकीची रक्कम ३९ कोटी ८३ लक्ष एवढी आहे.खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २८९ कोटी ९५ लाख कर्जवाटपाचा लक्षांक होता. त्यापैकी २३ जून २०१७ अखेर ४७ हजार ७४२ सभासदांना २१६ कोटी ८२ लाखाचे कर्ज वितरीत करण्यात आले असून कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. जून महिन्यात जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १८२ मि.मी. एवढे असते. मात्र यावर्षी १ जून ते २८ जून २०१७ दरम्यान केवळ ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हयाच्या बऱ्याच भागात दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होवू शकते. ही बाब लक्षात घेता ज्या ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असेल अशा गावांचा कृषी विभागाने सर्वे करावा व बियाणे दयावे अशा सूचना खासदार पटोले यांनी दिल्या.राष्ट्रीयकृत बँकामधून ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या १३ हजार १०२ असून थकबाकीची रक्कम १४२ कोटी सात हजार एवढी आहे. यामध्ये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९७६५ असून थकबाकीची रक्कम ९० कोटी ७७ लाख एवढी आहे. अल्प कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३३३७ एवढी असून थकबाकीची रक्कम ५१ कोटी ३० लाख आहे. राष्ट्रीयकृत बँकातर्फे १५ जूनअखेर ६६५२ सभासदांना ४८ कोटी ३७ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे.