शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 00:44 IST

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ६७ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज माफीचा लाभ होणार असून पीक कर्ज वाटप योग्यप्रकारे केले जाणार आहे.

नाना पटोले : ३२७ कोटींची होणार जिल्ह्यात कर्जमाफी लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ६७ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज माफीचा लाभ होणार असून पीक कर्ज वाटप योग्यप्रकारे केले जाणार आहे. यासोबतच नवीन कर्ज वाटपासंबंधीचे प्रस्ताव बँकांनी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दुबार पेरणीची परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होईल तेथे बियाणे वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, जिल्हा बँक व्यवस्थापक संजय बरडे यावेळी उपस्थित होते. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ३० जून २०१६ रोजी अल्प आणि अत्यल्प थकबाकीदार सभासदांची एकूण संख्या २९ हजार ९६५ असून थकबाकीची रक्कम १८५ कोटी ६९ लाख एवढी आहे. यापैकी दीड लाखांच्या आतील थकबाकीदार सभासदांची संख्या २६ हजार ८२५ असून थकबाकीची रक्कम १४५ कोटी ८६ लाख एवढी आहे. तर ३१४० सभासद दीड लाखाच्यावर असून थकबाकीची रक्कम ३९ कोटी ८३ लक्ष एवढी आहे.खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २८९ कोटी ९५ लाख कर्जवाटपाचा लक्षांक होता. त्यापैकी २३ जून २०१७ अखेर ४७ हजार ७४२ सभासदांना २१६ कोटी ८२ लाखाचे कर्ज वितरीत करण्यात आले असून कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. जून महिन्यात जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १८२ मि.मी. एवढे असते. मात्र यावर्षी १ जून ते २८ जून २०१७ दरम्यान केवळ ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हयाच्या बऱ्याच भागात दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होवू शकते. ही बाब लक्षात घेता ज्या ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असेल अशा गावांचा कृषी विभागाने सर्वे करावा व बियाणे दयावे अशा सूचना खासदार पटोले यांनी दिल्या.राष्ट्रीयकृत बँकामधून ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या १३ हजार १०२ असून थकबाकीची रक्कम १४२ कोटी सात हजार एवढी आहे. यामध्ये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९७६५ असून थकबाकीची रक्कम ९० कोटी ७७ लाख एवढी आहे. अल्प कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३३३७ एवढी असून थकबाकीची रक्कम ५१ कोटी ३० लाख आहे. राष्ट्रीयकृत बँकातर्फे १५ जूनअखेर ६६५२ सभासदांना ४८ कोटी ३७ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे.