शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

४३ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 00:44 IST

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ६७ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज माफीचा लाभ होणार असून पीक कर्ज वाटप योग्यप्रकारे केले जाणार आहे.

नाना पटोले : ३२७ कोटींची होणार जिल्ह्यात कर्जमाफी लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ४३ हजार ६७ शेतकऱ्यांना ३२७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज माफीचा लाभ होणार असून पीक कर्ज वाटप योग्यप्रकारे केले जाणार आहे. यासोबतच नवीन कर्ज वाटपासंबंधीचे प्रस्ताव बँकांनी पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात दुबार पेरणीची परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होईल तेथे बियाणे वाटपाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, जिल्हा बँक व्यवस्थापक संजय बरडे यावेळी उपस्थित होते. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ३० जून २०१६ रोजी अल्प आणि अत्यल्प थकबाकीदार सभासदांची एकूण संख्या २९ हजार ९६५ असून थकबाकीची रक्कम १८५ कोटी ६९ लाख एवढी आहे. यापैकी दीड लाखांच्या आतील थकबाकीदार सभासदांची संख्या २६ हजार ८२५ असून थकबाकीची रक्कम १४५ कोटी ८६ लाख एवढी आहे. तर ३१४० सभासद दीड लाखाच्यावर असून थकबाकीची रक्कम ३९ कोटी ८३ लक्ष एवढी आहे.खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २८९ कोटी ९५ लाख कर्जवाटपाचा लक्षांक होता. त्यापैकी २३ जून २०१७ अखेर ४७ हजार ७४२ सभासदांना २१६ कोटी ८२ लाखाचे कर्ज वितरीत करण्यात आले असून कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे. जून महिन्यात जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान १८२ मि.मी. एवढे असते. मात्र यावर्षी १ जून ते २८ जून २०१७ दरम्यान केवळ ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हयाच्या बऱ्याच भागात दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण होवू शकते. ही बाब लक्षात घेता ज्या ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असेल अशा गावांचा कृषी विभागाने सर्वे करावा व बियाणे दयावे अशा सूचना खासदार पटोले यांनी दिल्या.राष्ट्रीयकृत बँकामधून ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या १३ हजार १०२ असून थकबाकीची रक्कम १४२ कोटी सात हजार एवढी आहे. यामध्ये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ९७६५ असून थकबाकीची रक्कम ९० कोटी ७७ लाख एवढी आहे. अल्प कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३३३७ एवढी असून थकबाकीची रक्कम ५१ कोटी ३० लाख आहे. राष्ट्रीयकृत बँकातर्फे १५ जूनअखेर ६६५२ सभासदांना ४८ कोटी ३७ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची प्रक्रीया सुरु आहे.