शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

भंडारा-वरठी राज्यमार्ग ठरतोय मृत्यू मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 01:00 IST

भंडारा-वरठी राज्य महामार्ग हा अतंत्य वर्दळीचा महामार्ग आहे. जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन व पोलाद कारखाना असल्यामुळे या रस्त्यावरून २४ तास वाहनांची रहदारी सुरु राहाते. रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे हे वाहन चालकाकरिता त्रासदायक ठरत आहेत.

ठळक मुद्देखड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, रस्त्याचे कठडेही धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : भंडारा-वरठी राज्य महामार्ग हा अतंत्य वर्दळीचा महामार्ग आहे. जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन व पोलाद कारखाना असल्यामुळे या रस्त्यावरून २४ तास वाहनांची रहदारी सुरु राहाते. रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे हे वाहन चालकाकरिता त्रासदायक ठरत आहेत.रस्त्यावर ठिकठिकाणाहून डांबर उखडलेले आहे. रस्ता दुभाजक तयार करताना झालेला अव्यवस्थितपणा हा अपघाताला आमंत्रण देते. दरम्यान रात्री रस्त्यावर आडवे येणारे रानडुक्कर धोकादायक आहेत.राज्य व केंद्र शासनाचे गाव तेथे रास्ता हे ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार रस्ते तयार करण्यात आले. पण रस्त्याचा दर्जा एकदम खालच्या स्तराचा आहे.वरठी - भांडारा या दहा किमी अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडणारे खड्डे नियमित बाब आहे. पण या रस्त्यावर पडलेले खड्डे हे रास्ता बांधकामात झालेल्या गैरप्रकाराची साक्षात पुरावे आहेत.रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात साचणारे पावसाचे पाणी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अनेक भागातून रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर उखडले आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्ड्याना डबक्याचे स्वरूप आले आहे. या रस्तावरुन वाहन चालवणे म्हणजे चंद्रावर स्वारी करण्यासारखे आहे. वाहन चालकांना उद्या मारत वाहन चालवावे लागते.वरठी येथे जिल्ह्याचे रेल्वे स्टेशन व पोलाद कारखाना आहे. यामुळे दिवस रात्र या रस्त्यावरून रहदारी सुरु राहते. सदर राज्यमार्ग तुमसर मार्ग असल्यामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडणारा मार्ग आहे. यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणात होते.पण रस्त्याची वाईट अवस्था ही अपघाताला कारण ठरत आहे. वरठीचे स्मशान घाट ते सिरसी फाटा पर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे मृत्यूला आमंत्रण देणारे आहे. खोल व अरुंद पडलेले खड्डे रात्री किंवा पावसाच्या वेळी लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार सहज अपघाताला बळी पडत असतात. जगनाडे चौकातील वळण मार्गावर संपूर्ण रास्ता उखडलेले आहे. त्यामुळे वळण घेणारे वाहन अपघातग्रस्त होतात.वर्षभरात ९ बळी व ४३ जखमीवरठी-भंडारा राज्यमार्गावर २०१७ ते जून २०१८ या कालावधीत १२ मोठे अपघात झाले आहे. यात ९ जणांचा मृत्यू व ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात ९ पुरुष १९ महिला व २ मुलांचा समावेश आहे. शुल्लक अपघातात १२ जखमींची नोंद आहे. सदर आकडे हे पोलीस स्टेशन वरठी येथे दाखल झालेल्या गुन्हे नोंदवहीतील आहेत. अनेक अपघाताची तक्रार न नोंदवल्यामुळे अपघाताची संख्या कळली नाही. पण या रस्त्यावर होणारे अपघात हे मोठ्या प्रमाणात असून गत सहा महिन्यात ३५ च्या वर छोटे अपघात झाले आहेत. यात दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. अपघाताला मुख्य कारण म्हणजे खड्डे आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका सामान्य लोकांना जीव गमावून करावा लागत आहे.रस्ता दुभाजक अव्यवस्थितवरठी-भंडारा राज्यमार्ग तयार करताना ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या मधातून दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. पण हि विभागणी शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली नाही. मधातून विभागलेले भाग उंच असून सामान पातळी नसल्यामुळे रस्ता ओलंडणारे वाहन सहज कोसळते. दुभाजक म्हणून केलेले दोन्ही भागात वाहन चालकांना सहजासहजी येता जाता येत नाही. एका बाजूला उंच व दुसरीकडे खोल अशी अवस्था आहे. यामुळे रस्त्यावरून धावणारे वाहन स्लीप होतात आणि अपघाताला समोर जातात. यात दुचाकी स्वारासह मोठ्या वाहनांचा समावेश आहे.