शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

अन्नातून विषबाधेने मुलाचा मृत्यू, आईवडील, भाऊ अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 22:41 IST

Bhandara News अन्नातून विषबाधा झाल्याने एका १५ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या आईवडिलांसह लहान भाऊ अत्यवस्थ झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील माडगी टेकेपार येथे मंगळवारी घडली.

 

भंडारा : अन्नातून विषबाधा झाल्याने एका १५ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या

आईवडिलांसह लहान भाऊ अत्यवस्थ झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील माडगी टेकेपार येथे मंगळवारी घडली. वडिलांवर भंडारा येथे, तर आई व लहान भावावर लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परमानंद फुलचंद मेश्राम (१५) असे मृत बालकाचे नाव आहे, तर फुलचंद गणपत मेश्राम (५३), दुर्गा फुलचंद मेश्राम (४५) आणि चेतन फुलचंद मेश्राम (१३) अशी प्रकृती गंभीर असलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील माडगी येथे मेश्राम परिवार राहतो. रविवारी रात्री या सर्वांनी लाल भाजी खाल्ली, तर सोमवारी सकाळी चवळीची भाजी खाल्ली. मात्र, दुपारनंतर त्यांना उलटी व हगवण सुरू झाली. त्यामुळे सर्वांना लाखनी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, परमानंदची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला सायंकाळी भंडारा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. वडिलांची प्रकृती मंगळवारी गंभीर झाल्याने त्यांनाही भंडारा येथे आणण्यात आले. आई व मुलावर लाखनी येथे उपचार सुरू आहेत.

अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले, तरी जिल्हा रुग्णालयातून डॉक्टरांनी मेंदूज्वर किंवा विषबाधा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीतून खरे कारण पुढे येणार आहे. आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे.

- डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Deathमृत्यूfood poisoningअन्नातून विषबाधा