शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सदोष जलवाहिनीमुळे दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: January 7, 2017 00:30 IST

पवनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पालोरा आबादी येथील सदोष जलवाहिनीमुळे दुषित पाणी पुरवठा होत आहे.

पालोरा येथील प्रकार : पाण्याचा अपव्ययनिश्चित मेश्राम पालोरा (चौ.) पवनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या पालोरा आबादी येथील सदोष जलवाहिनीमुळे दुषित पाणी पुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका जनतेला बसत आहे. दोन वर्षापुर्वीच ही पाईप लाईन नव्याने टाकण्यात आली होती. मात्र मागील १ वर्षापासून ठिकठिकाणी पानी लिकेज होत असल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. सर्व ग्रामस्थ याच नळयोजनेचा पाणी पिण्याकरिता वापरत आहेत.पालोरा हे गाव दोन हजार लोकवस्तीचे आहे. येथील सरपंच संगीता गिऱ्हेपुंजे यांच्या हिटलरशाहीपणामुळे ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने ही ग्रामपंचायत जिल्ह्यात गाजत असते. मागील दोन वर्षापुर्वीच लक्षावधी रुपये खर्च करुन पाण्याची टाकी बनविण्यात आली. ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पाणी मिळेल म्हणून हमी देण्यात आली होती. मात्र या नळयोजनेचे पाईप निकृष्ठ दर्जाचे टाकल्या गेल्यामुळे सुरुवातीपासून जागोजागी लिकेज होणे सुरु झाले होते. मात्र लोकप्रतिनिधी व कंत्राटदार यांनी संगणमत करुन काम पुर्ण झाले म्हणून कंत्राटदाराने हात वर केले. नव्याने जलवाहिनी घालण्यात विरोधदोन वर्षापुर्वी जी नळयोजना तयार करण्यात आली त्याच नळयोजनेवर ३ लक्ष रुपये खर्च करुन दुसरीकडे पाईप जोडण्याचे काम सुरु आहे. येथील सरपंचानी कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता पाईप लाईन टाकण्याचे काम कंत्राटदाराला दिला आहे. पुर्वी याच कंत्राटदाराने नळयोजनेचे काम केले होते. आता पुन्हा याच कंत्राटदाराला काम दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये शंका कूशंका व्यक्त केल्या जात आहे. कंत्राटदाराने आपल्या स्वमर्जीने जेसीबी मशीन लावून खोदकाम केले व पाईपलाईन टाकून बुजविण्यात आले. आतमध्ये पाईप कसे टाकण्यात आले, किती खोल नाली करण्यात आली हे कूणालाच माहिती नाही. कोणत्याही आधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधीने सुध्दा पाहणी केली नाही ही नळयोजना ग्रामस्थांना जिवदान देणार की मृत्यदान हेच लक्षात येत नाही. याबाबद ग्रामस्थांनी व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी लोकप्रतिनिधीबद्दल रोष व्यक्त केला आहे. हा काम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.