शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

अतिवृष्टीने ८,३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 12:27 IST

Bhandara : नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे ८१९ शेतकरी भरपाईसाठी पात्र

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : गत २० ते २२ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील आवत्या व रोवणी झालेल्या धानपिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ही माहिती स्थानिक लाखांदूर तालुका प्रशासनांतर्गत देण्यात आली आहे.

खरीप हंगामात दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रात विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. त्यामध्ये सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्रात केवळ धान पिकाची लागवड केली जाते. उर्वरित क्षेत्रांत विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. या लागवडीअंतर्गत यंदाच्या खरिपात गत काही महिन्यांत तालुक्यातील ५२३ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानपिकाची लागवड करण्यात आली होती. उर्वरित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान पिकाची रोवणी करण्यात आली होती.

धान पिकाची लागवड होऊन काही दिवस लोटत नाही तोच मागील २० जुलै ते २२ जुलैदरम्यान तालुक्यात सरासरी २४१.५ मिमी पाऊस पडला होता. हा पाऊस सरासरी अतिवृष्टीच्या तब्बल चौपट अधिक झाल्याने यंदाच्या खरिपात लागवडीखालील सर्व शेतपिके पाण्याखाली बुडाली होती.

पाण्याखाली बुडालेली पिके नष्ट झाल्याने नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तालुका प्रशासनाने स्थानिक तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त नेतृत्वात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्यानुसार स्थानिक लाखांदूर तालुक्यातील सुमारे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धानपिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

१७ हजार १०८ शेतकऱ्यांना मिळणार भरपाईअतिवृष्टीमुळे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीअंतर्गत तालुक्यात खरिपात कोरडवाहू क्षेत्रात लागवडीखालील आवत्या धानपिकाचे एकूण ५२३ हेक्टर क्षेत्रापैकी ३५२.४२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे ८१९ शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना शासननियमांनुसार प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई अपेक्षित आहे तर तालुक्यातील सिंचनयुक्त क्षेत्रांतर्गत सुमारे ७ हजार ९७९.७८ हेक्टर क्षेत्रातील रोवणी झालेल्या धानपिकाची नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील सिंचन सुविधाधारक सुमारे १६ हजार २८९ शेतकऱ्यांना शासननियमानुसार प्रतिहेक्टर २७ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई अपेक्षित आहे. एकंदरीत अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील आवत्या व रोवणी अंतर्गत नुकसानग्रस्त सुमारे १७ हजार १०८ शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत. 

 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा