शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

अतिवृष्टीने ८,३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 12:27 IST

Bhandara : नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे ८१९ शेतकरी भरपाईसाठी पात्र

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : गत २० ते २२ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील आवत्या व रोवणी झालेल्या धानपिकाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ही माहिती स्थानिक लाखांदूर तालुका प्रशासनांतर्गत देण्यात आली आहे.

खरीप हंगामात दरवर्षी लाखांदूर तालुक्यातील जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रात विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. त्यामध्ये सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्रात केवळ धान पिकाची लागवड केली जाते. उर्वरित क्षेत्रांत विविध खरीप पिकांची लागवड केली जाते. या लागवडीअंतर्गत यंदाच्या खरिपात गत काही महिन्यांत तालुक्यातील ५२३ हेक्टर क्षेत्रात आवत्या धानपिकाची लागवड करण्यात आली होती. उर्वरित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धान पिकाची रोवणी करण्यात आली होती.

धान पिकाची लागवड होऊन काही दिवस लोटत नाही तोच मागील २० जुलै ते २२ जुलैदरम्यान तालुक्यात सरासरी २४१.५ मिमी पाऊस पडला होता. हा पाऊस सरासरी अतिवृष्टीच्या तब्बल चौपट अधिक झाल्याने यंदाच्या खरिपात लागवडीखालील सर्व शेतपिके पाण्याखाली बुडाली होती.

पाण्याखाली बुडालेली पिके नष्ट झाल्याने नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली होती. तालुका प्रशासनाने स्थानिक तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त नेतृत्वात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्यानुसार स्थानिक लाखांदूर तालुक्यातील सुमारे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धानपिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

१७ हजार १०८ शेतकऱ्यांना मिळणार भरपाईअतिवृष्टीमुळे ८ हजार ३३२.२० हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीअंतर्गत तालुक्यात खरिपात कोरडवाहू क्षेत्रात लागवडीखालील आवत्या धानपिकाचे एकूण ५२३ हेक्टर क्षेत्रापैकी ३५२.४२ हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान झाले. या नुकसानीअंतर्गत तालुक्यातील सुमारे ८१९ शेतकरी भरपाईसाठी पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना शासननियमांनुसार प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई अपेक्षित आहे तर तालुक्यातील सिंचनयुक्त क्षेत्रांतर्गत सुमारे ७ हजार ९७९.७८ हेक्टर क्षेत्रातील रोवणी झालेल्या धानपिकाची नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार तालुक्यातील सिंचन सुविधाधारक सुमारे १६ हजार २८९ शेतकऱ्यांना शासननियमानुसार प्रतिहेक्टर २७ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई अपेक्षित आहे. एकंदरीत अतिवृष्टीमुळे लाखांदूर तालुक्यातील आवत्या व रोवणी अंतर्गत नुकसानग्रस्त सुमारे १७ हजार १०८ शेतकरी नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत. 

 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा