शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
4
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
5
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
6
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
7
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
8
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
9
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
10
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
11
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
12
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
13
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
14
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
15
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
16
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
17
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
18
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
19
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
20
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?

पुराने धान पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST

शेतकऱ्यांचे वायदा माफ करण्यात आला आहे. नदीच्या वाढत्या पात्रानंतर थोडीफार शेती शिल्लक आहे. या शेतीत शेतकरी कुटुंबियांचे उदरनिर्वाह करित आहे. परंतु उदरनिर्वाहावर पुराच्या पाण्याने आघात केला आहे. पुराचे पाण्यात धानाचे पीक बुडाले असल्याने अर्धे अधिक पीक सडले आहे. धान पीक अर्ध्यावर आले आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे.

ठळक मुद्देबपेरा परिसराला फटका : उत्पादनात घट होणार, पिकांचे सर्वेक्षण नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी व वैनगंगा नद्यांच्या संंगम तटावर असणाऱ्या बपेरा गाव शिवारात पुराच्या पाण्याचे दोन दिवस वेढा असल्याने धान पिकाचे मोठ्या नुकसान झाले आहे. यंत्रणेमार्फत केवळ पाहणी करण्यात आली असून सर्वेक्षण करण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सूर आहे.वैनगंगा व बावनथडी नद्यांचे संगम बपेरा गावाच्या शिवारातील शेती आहे. गावातील शेतकऱ्यांना बावनथडी नदीचे पात्र कर्दनकाळ ठरले आहे. नदीच्या वाढत्या पात्रात ८७ हेक्टर आर बागायती शेती गिळंकृत झाली आहे. सधन शेतकरी आता शेतमजुर झाली आहेत. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपदा घोषित करित शासनाने हेक्टरी आर्थिक मदत दिली नाही. शेती नसताना शासन मात्र शेतसारा वसुल करित असताना शेतकऱ्यांच्या दबावानंतर शासनाने शेतसारा वसुलीला स्थगीती दिली आहे.या शेतकऱ्यांचे वायदा माफ करण्यात आला आहे. नदीच्या वाढत्या पात्रानंतर थोडीफार शेती शिल्लक आहे. या शेतीत शेतकरी कुटुंबियांचे उदरनिर्वाह करित आहे. परंतु उदरनिर्वाहावर पुराच्या पाण्याने आघात केला आहे. पुराचे पाण्यात धानाचे पीक बुडाले असल्याने अर्धे अधिक पीक सडले आहे. धान पीक अर्ध्यावर आले आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे. वर्षभराचे नियोजन करताना शेतकऱ्यांना अडचणीचे ठरणार आहे. बपेरा शिवारातील शेतीच्या सर्वेक्षणाची अपेक्षा होती. परंतु यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पाहणी करिता काढता पाय घेतला आहेत. पुराची पाहणी केल्याने नुकसानग्रस्त शेतकºयांची समस्या सुटणार नाही. त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना सर्वेक्षणासाठी यंत्रणा फिरकलीच नाही. ग्रामपंचायत प्रशासनाला शेतकरी वारंवार विचारणा करित आहेत. स्थानिक यंत्रणेला धारेवर घेत आहेत. शासनाने त्वरीत सर्वेक्षण करावे, अशी मागणी आहे.बपेरा गावाच्या शिवारात पुराच्या पाण्याने धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण करित आर्थिक मोबदला दिला पाहिजे.-भगत राऊत, सरपंच, बपेरा.

टॅग्स :agricultureशेती