शेतकरी संकटात : ढगाळ व उष्ण हवामानाचा फटकापालांदूर : लाखनी तालुक्याला निसर्गाने चौफेर घेरले आहे. कुठे उन तर कुठे पाऊसाचे सत्र सुरूच आहे. आजही १० टक्के रोवणी झालीच नाही. आटोपलेल्या रोवणीला पावसाने ओढ ताण दिल्याने हंगाम अपेक्षित आला नाही. कन्हैया, पोळा, गणपतीमध्ये पाऊस झाल्याने धान जगला व आता काही फुलोरावर तर गर्भात असताना करपा, तडतुडा व अळीचा प्रादूर्भाव झाल्याने पिक संकटात आलेआहे. पिक वाचविण्याकरीता शेतकऱ्यांची पराकाष्टा सुरू झाली आहे.पालांदूर परिसरात चुलबंदच्या खोऱ्यात काठवरील हलके धान कापणीला आले असताना परतीच्या पावसाने व्यत्य आणल्याने हंगाम लांबला आहे. नरव्हा, पाथरी, मऱ्हेगाव, ढिवरखेडा, वाकल आदी गावात १०० ते १२० दिवसाचे धान कापणीयोग्य झालेले आहेत. ढगाळ व उष्ण हवामानामुळे तुळतुळा अळी जोर करीत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. १/२ दिवसाच्या अंतराने हलका ते मध्यम पावसाच्या सरी येत असल्याने कापणी करने अवघड झाले आहे.मागील वर्षाला लाखनी परिसरात अशाच रोगाने धानपिक उध्वस्त करून चिंता वाढवली होते. कृषिविभागाची अख्खी टिम शेतकऱ्यांच्या मदतीकरीता धावली होती. यावर्षी पालांदूर परिसरात करपा तुडतुडा यांनी नाकीनऊ आणले आहे. करपा रोगाचे प्रकार अधिक असल्याने सामान्य शेतकऱ्याचा समजण्या पलीकडे आहेत. गावातील कृषीचे पदवीधर शेतकऱ्यांच्या विनंतीवरून शेतावर भेट देऊन मार्गदर्शन सुरू आहे. धान हे भंडारा जिल्ह्यातील मुख्य पिक व परंपरेने घेत आलेले असले तरी रोग मात्र नवीन नवीन येत असल्याने शेतकऱ्याला समजण्याच्या पलीकडे आहेत.हलक्या व भारी धानाला पावसाची चिंता दूर झालेली आहे. नवरात्रात एखादा पाऊस आल्यास पूर्णत: धानपिक निपटणार यात शंका नाही. मात्र रोगांचे प्रमाण अनियंत्रित असल्याने कृषी विभागाची गरज वाढली आहे. (वार्ताहर)
धानावर करपा, तुडतुडाचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 25, 2016 00:52 IST