शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

अवकाळी पावसाने काढणी झालेल्या पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

२० लोक ०२ के लाखांदूर : गत दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असताना १९ मार्च रोजी रात्रीदरम्यान अचानक झालेल्या ...

२० लोक ०२ के

लाखांदूर : गत दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण असताना १९ मार्च रोजी रात्रीदरम्यान अचानक झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यात कापणी झालेल्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकसान झालेल्या पिकांत हरभरा व गहू या पिकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

गत खरीप हंगामात तालुक्यात जवळपास २८४२ हेक्टर क्षेत्रात हरभरा तर १४४९ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली होती. या लागवडीनुसार तालुक्यातील अधिकत्तम क्षेत्रातील पिकांची काढणी व मळणीदेखील आटोपली आहे. मात्र काही प्रमाणातील गहू व हरभरा पिकांची काढणी सुरू असताना तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन शुक्रवारी रात्रीदरम्यान जोरदार पाऊस बरसला. या पावसाने शेतात काढणी झालेले हरभरा व गहू पीक पावसात भिजल्याने या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तथापि काही शेतकऱ्यांनी पावसापासून पिकांच्या बचावासाठी शेतात साठवणूक केलेल्या पिकांवर ताडपत्री घातल्याचे दिसून येत असले तरी पाऊस अधिक प्रमाणात झाल्याने संबंधित पिकांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदाच्या खरिपात धान उत्पादनात घट येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असल्याचे बोलले जात असतानाच कडधान्य पिकांवरदेखील पावसाचा प्रकोप झाल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडल्याचे बोलले जात आहे.