शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना त्यांच्याही नाकीनऊ येत आहेत. सकाळी भंडारा शहरात अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीच्या कामाचा फटका वाहनधारकांना बसत असून गत दहा दिवसांपासून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दररोज सकाळी दोन्ही बाजूला वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असून सकाळी नोकरीनिमित्त जाणारे कर्मचारी, कामगार दोन ते तीन तास उशिरा कार्यालयात पोहोचत आहेत.भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. बायपास नसल्याने संपूर्ण वाहतूक शहरातूनच होते. त्यातच वैनगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने संपूर्ण वाहतूक मोठ्या पुलावरून सुरू आहे. गत दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या पावसाळापूर्व डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना त्यांच्याही नाकीनऊ येत आहेत. सकाळी भंडारा शहरात अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना तासनतास खोळंबून रहावे लागते. सकाळी नोकरीनिमित्त भंडारा शहरात येणारे आणि साकोली व नागपूर येथे जाणारे कामगार आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कार्यालयात जाण्यासाठी सुमारे दोन तास उशीर होत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. वाहतूक कोंडीने सर्वच जण त्रस्त आहेत.

एसटीची बससेवा प्रभावित

- सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने एसटीची बससेवा प्रभावित झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यात एसटी बसही खोळंबतात. राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडसकर म्हणाले, वाहतूक कोंडीमुळे भंडारा ते नागपूर मार्गावरील एसटी बसेस अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. अनेक बसफेऱ्या प्रभावित झाल्या असून प्रवासी त्रस्त होत आहेत. महामंडळालाही आर्थिक फटका बसत आहे.३० मेपर्यंत डागडुजीचे काम- पावसाळापूर्व डागडुजीचे काम गत दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. ३० मेपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुजबी ते कारधापर्यंत पडलेले खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे वाहतूक एकेरी सुरू राहते. रात्रीच्यावेळी काम केले जात असले तरी दिवसभर वाहतूक संथगतीने सुरू असते.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी