शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना त्यांच्याही नाकीनऊ येत आहेत. सकाळी भंडारा शहरात अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या डागडुजीच्या कामाचा फटका वाहनधारकांना बसत असून गत दहा दिवसांपासून दररोज वाहतूक कोंडी होत आहे. दररोज सकाळी दोन्ही बाजूला वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांच्या नाकीनऊ येत असून सकाळी नोकरीनिमित्त जाणारे कर्मचारी, कामगार दोन ते तीन तास उशिरा कार्यालयात पोहोचत आहेत.भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग जातो. बायपास नसल्याने संपूर्ण वाहतूक शहरातूनच होते. त्यातच वैनगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने संपूर्ण वाहतूक मोठ्या पुलावरून सुरू आहे. गत दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या पावसाळापूर्व डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रात्री १० वाजतापासून सकाळी ६ वाजेपर्यंत डागडुजीचे काम सुरू असते. यादरम्यान वाहतूक एकेरी केली जाते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. रात्री वाहन काढणे कठीण होते. सकाळी १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी कायम असते. जिल्हा वाहतूक शाखा दररोज वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, वाहतूक कोंडी सोडविताना त्यांच्याही नाकीनऊ येत आहेत. सकाळी भंडारा शहरात अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांना तासनतास खोळंबून रहावे लागते. सकाळी नोकरीनिमित्त भंडारा शहरात येणारे आणि साकोली व नागपूर येथे जाणारे कामगार आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कार्यालयात जाण्यासाठी सुमारे दोन तास उशीर होत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. वाहतूक कोंडीने सर्वच जण त्रस्त आहेत.

एसटीची बससेवा प्रभावित

- सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने एसटीची बससेवा प्रभावित झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. त्यात एसटी बसही खोळंबतात. राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा विभागीय वाहतूक अधिकारी चंद्रकांत वडसकर म्हणाले, वाहतूक कोंडीमुळे भंडारा ते नागपूर मार्गावरील एसटी बसेस अर्धा ते एक तास उशिराने धावत आहेत. अनेक बसफेऱ्या प्रभावित झाल्या असून प्रवासी त्रस्त होत आहेत. महामंडळालाही आर्थिक फटका बसत आहे.३० मेपर्यंत डागडुजीचे काम- पावसाळापूर्व डागडुजीचे काम गत दहा दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे. ३० मेपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुजबी ते कारधापर्यंत पडलेले खड्डे बुजविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे वाहतूक एकेरी सुरू राहते. रात्रीच्यावेळी काम केले जात असले तरी दिवसभर वाहतूक संथगतीने सुरू असते.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी