शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पवनीतील पर्यटन संकुलाची दैनावस्था

By admin | Updated: December 11, 2014 23:03 IST

तालुक्यातील पर्यटनस्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाचे काठावर पर्यटन संकुल मंजूर केले. पर्यटन संकूलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. कंत्राटदाराला कामाचे

अशोक पारधी - पवनीतालुक्यातील पर्यटनस्थळ व भेटी देणारे पर्यटक यांचा विचार करुन शासनाने निसर्गरम्य बालसमुद्र तलावाचे काठावर पर्यटन संकुल मंजूर केले. पर्यटन संकूलाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले. कंत्राटदाराला कामाचे देयक न मिळाल्यामुळे किरकोळ काम शिल्लक राहून हस्तांतरण तर थांबलेच. पंरतु बांधकाम झालेल्या पर्यटन संकूलाची दैनावस्था सुरु झाली आहे.प्राचीन व ऐतीहासीक वारसा असलेले पवनी नगर विदर्भाची काशी म्हणून संबोधल्या जाते. व्यापारासाठी भूतकाळात प्रसिध्द असलेल्या नगराचे संरक्षणासाठी मानवनिर्मित इंग्रजी यु आकाराची संरक्षण भिंत व जवाहर गेट पासून काही अंतरापर्यंत भिंतीवर बांधलेली तटबंदी, परकोट(किल्ला), विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले पंचानन गणेश किंवा पंचमुखी गणेश, धरणीधर गणेश मंदिर, वैजेश्वर देवस्थान, मुरलीधर मंदिर, गधादेव, जगन्नाथ मंदिर, दिवाणघाट, वैजेश्वर घाट, पुरातत्व विभागाने उत्खनन करुन शोधलेले भव्य बौध्द स्तुप व त्यांचे अवशेष, दस्त्यांचे स्थान म्हणून प्रसिध्द असलेले चंडीका मंदिर, विढ्ढल रुख्मिणी मंदिर, दत्त मंदिर, राममंदिर, शिल्पकलेचे उत्तम नमुना असलेले गरुड खाब तसेच गोसीखुर्द धरण, कऱ्हांडला पवनी अभयारण्य, रुयाळ येथील महासमाधीभूमी परिसर, कोरंभा डोंगरावरील महादेव मंदिर, ठाणा येथील निसर्गरम्य चंडीकामंदिर व अभयारण्यामुळे प्रवेशास बंदी असलेले ढिवरढुटी असे अनेक पर्यटन स्थळ पवनी तालुक्यात आहे. ही सर्व स्थळे एका दिवसात पाहणे शक्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यंटन मंत्रालयाने पवनी येथे ७ वर्षापूर्वी पर्यटन संकूल प्रस्तापित करुन बांधकाम सुरु केले. थाटात भुमिपूजन झाले. अल्पावधीत पूर्ण करण्याचे आश्वासन तत्कालीन मंत्र्यांनी दिले परंतु लबाडाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही. अशी म्हण आहे. अगदी तसेच पर्यटन संकूलाचे बाबतीत झाले.कोटयावधी रुपयांचे हे पर्यटन संकूल बांधून तयार आहे. पर्यटकांना रमवेल असे स्थळ निवडण्यात आले. प्रशस्त हॉल, आकर्षक इमारत तयार आहे. पंरतु शासनाचे दुर्लक्षामुळे कोट्यावधी रुपये खर्च झालेली इमारत धूळखात पडलेली आहे. छतावर स्लॅप ऐवजी टीनपत्रे वापरली असल्याने हवेच्या दाबाने ती उडू लागली आहेत. पावसाचे पाणी गळून सिटींगचे पीओपी गडून पडत आहे व झालेली रंगरंगोटी खराब होत आहे. पर्यटन विभाग हा सर्व बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने पर्यटकांत नाराजीचा सुर आहे. पर्यटन संकूल पर्यटकांच्या सेवेसाठी लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी जोर धरत आहे.