शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबत दिला होता इशारा

By admin | Updated: May 18, 2017 00:34 IST

सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या हल्ल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी वर्षभरापूर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.

नाना पटोलेंनी विचारला प्रश्न : उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरल्याची हमीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या हल्ल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी वर्षभरापूर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत दिनांक ११ मे २०१६ रोजी पटोलेयांनी सायबर हल्ल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. यात त्यांनी म्हटले होते. प्रसार माध्यमांद्वारे पुढे आलेल्या माहितीनुसार आरआरसीटीसी या भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘डेटा हॅक’ करण्यात आला. यामध्ये जवळ पास १ कोटी ग्राहकांना ‘डेटा हॅक’ करण्याची भीती त्यांनी वर्तविली होती. या संकेतस्थळावर कोट्यवधी रुपयांची देवाण घेवाण करण्यात येते. आॅनलाईन रेल्वे तिकीट काढण्यासाठी आधारकार्ड, क्रेटीड कार्ड, डेबीट कार्ड आणि नेटबँकींगची माहिती ग्राहकांकडून पुरविण्यात येते. वेबसाईट ‘हॅक’ झाल्यास ग्राहकांची महत्वपूर्ण माहिती चोरल्या जाऊ शकते याचा विविध महत्वपूर्ण सेवांवर परिणाम होवू शकतो असा प्रश्न उपस्थित पटोले यांनी उपस्थित केला होता.पटोले यांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाद्वारे भारतीय ब ँकींग क्षेत्रावरील सायबर हल्ल्याशी निगडीत प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी म्हटले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्याही मोठ्या सायबर हल्ल्याशी सामना करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने कोणत्या उपाययोजना आहेत असा प्रश्न विचारला होता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी, देशात कोणत्याही मोठ्या सायबर हल्ल्याचा सामना करण्यासाठी सायबर संकट व्यवस्थापन दलाची स्थापना करण्यात आली आहे. बँकींग परिवेक्षणासाठी सीईआरटीआयएन च्या मदतीने शासन बँकेमधील सुरक्षेबाबत पडताळणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पटोले यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी लोकसभेत तारांकीत प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित करून भारतातील अणू उर्जा संस्थावर आतंकवादी किंवा सायबर हल्ला झाल्यास याचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना, असा प्रश्न विचारला होता. अणू उर्जा संस्थांमध्ये उत्तम दर्जाची आंतरीक व बाह्य सुरक्षा स्थापित करण्यात आल्याचे तसेच, सायबर हल्ल्याला परतवून लावण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याचे उत्तर प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिले होते.