शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांच्या नशिबी कर्जाचा शाप

By admin | Updated: April 1, 2015 00:40 IST

पवनी : स्वतंत्र भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे़ देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्याच शेतीमध्ये घाम गाळणारा धान उत्पादक शेतकरी

पवनी : स्वतंत्र भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे़ देशाची अर्थव्यवस्था ज्या शेतीवर अवलंबून आहे, त्याच शेतीमध्ये घाम गाळणारा धान उत्पादक शेतकरी आजघडीला मरणासन्नाचे जीवन जगत असल्याचे चित्र आहे़ गत महिन्याभरात दोन वेळी आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. विदर्भातील धान उत्पादक शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्यात वावरत आहे़ दरवर्षी निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळाच्या छायेत वावरणारा शेतकरी स्पयंपूर्ण होऊ शकला नाही, हे दुर्देव आहे़ जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी हलाखीचे जीवन जगताना दिसत आहे़ दिवसेंदिवस कर्जाचे ओझे वाढत आहे़ दिवस-रात्र शेतीमध्ये घाम गाळणाऱ्या धान उत्पादकांच्या नशिबिी मात्र कर्जाच्या अभिशापाचे वरदान तर नाही ना, असे म्हणावे लागत आहे़ शेतकरी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या सातत्याने पाठलाग करीत आहेत़ धान उत्पादकांचे हित जोपासण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केली जात नाही़ धान उत्पादक शेतकरी कोणत्याही कष्टाची पर्वा न करता शेतीमध्ये राबतो़ उभे आयुष्य शेतीच्या मशागतीमध्ये खर्ची घालणाऱ्या शेतकऱ्यांना थोडीशीही उसंत मिळत नाही़ देशातील नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारा धान उत्पादक शेतकरी पूर्णत: मानसिकरीत्या खचून जाऊन दुर्बळ झाल्याचे दिसून येत आहे़ एकमेव शेतीच्या मुख्य व्यवसायावर कुटूंबाचा उदरनिर्वाह करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येते़ स्वत:ची जबाबदारी पेलनाता मात्र त्याला अति कष्ट सहन करावे लागते़ तरीसुद्धा त्याची तमा न बाळगता आपल्या कुटूंबासमवेत शेतीमध्ये दिवसभर घाम गाळण्यातच स्वत:ला धन्य मानतो़ काही वर्षापूर्वी धानाची शेती परवडणारी होती़ धान उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या इतर पूरक वस्तूंच्या किमती दामदुपटीने वाढल्या़ पर्यायाने धानाच्या उत्पादन खर्चात कमालीची वाढ झालेली आहे़ त्या मानाने धानाला भाव मिळत नाही़ ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल़ (तालुका प्रतिनिधी)