शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:49 IST

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणी अवघ्या सहा दिवसांवर आली असून गावागावांत विजयावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पक्ष कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य नागरिकही आकडेमोड करण्यात सध्या व्यस्त आहे.

ठळक मुद्दे२३ मेच्या निकालाकडे लक्ष : विजयाचे दावे - प्रतिदावे, गावागावांत चर्चा, उमेदवारांचे वाढले टेंशन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात पार पडलेल्या भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. मतमोजणी अवघ्या सहा दिवसांवर आली असून गावागावांत विजयावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. पक्ष कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य नागरिकही आकडेमोड करण्यात सध्या व्यस्त आहे. तब्बल ४२ दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मतमोजणी होत असल्याने उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे.भंडारा - गोंदिया लोकसभा मतदार संघाची निवडणूक ११ एप्रिल रोजी पार पडली. ६८.२७ टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुध्दे, भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे, बसपाच्या उमेदवार विजया नंदुरकर यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य यंत्रात बंद झाले. मतदानाच्या दिवसापासून विजयावर दावे-प्रतीदावे सुरु आहे. मात्र ठामपणे कोण विजयी होईल याचा अंदाज बांधणे राजकीय तज्ञांनाही कठीण झाले आहे.गावागावांत जातीय समीकरण आणि कोणता उमेदवार कुठे अधिक चालला यावरुन काथ्यकुट केले जात आहे. विजयावरून अनेकांनी पैजाही लावल्या आहे. निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वशक्तीपणाला लावणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचे समीकरण मांडण्यात मोठी चुरस दिसत आहे. बेरीज वजाबाकीच्या समीकरणातून कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे आपलाच उमेदवार विजयी होणारे असे गणीतही मांडले आहे.भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी आणि भाजपा यांच्यात थेट लढत झाली. दोनही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते विजयाचे दावे करीत आहे. आता २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.मतमोजणीला अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात उमेदवार सोबतच विजयाचे समीकरण मांडणाºया कार्यकर्त्यांचे हृदयाचे ठोके वाढले आहे. प्रत्येकजण विजयाचे दावे करीत असले तरी ठामपणे कुणीही विजयाची खात्री देतांना दिसत नाही.कोण किती मते घेणार?भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात ६८.२७ टक्के मतदान झाले. म्हणजे १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघात १४ उमेदवार रिंगणात होते. विजयासाठी उमेदवाराला जवळपास ४२ ते ४४ टक्के मत हवे आहेत. यावरुन विजयासाठी उमेदवाराला जवळपास साडेपाच लाख मते हवी आहेत. आता कोणता उमेदवार किती मते घेतो आणि कोण विजयी होतो, यासाठी २३ मेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.अंदाज बांधणे कठीणलोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघातून कोण विजयी होणार याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण झाले आहे. दोन्ही पक्षाचे पाठीराखे आपला उमेदवार विजयी होईल असा दावा करीत असले तरी ठामपणे किती मताधिक्य राहिल हे मात्र कुणी सांगताना दिसत नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक