शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

कंत्राटीकरण धोरण हाणून पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:11 IST

नियत वयोमर्यादेपर्यंत शासनाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली.

ठळक मुद्देपेन्शन बचाव संयुक्त परिषद : शासनाविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती

आॅनलाईन लोकमतभंडारा : नियत वयोमर्यादेपर्यंत शासनाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली. मात्र २००८ पासून कंत्राटीकरणाचे धोरण राबविण्याचा घाट राज्य सरकार करीत आहे. हे धोरण हाणून पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकसंघ व्हावे असा सुर भंडारा येथे आयोजित पेन्शन बचाव संयुक्त परिषदेतून उमटला.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समिती भंडाराच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक थुल, राज्य सहकारी कर्मचारी संघाचे चंद्रहास सुटे, मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस अशोक दगडे, लिलाधर पाथोडे, जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतुल वर्मा, प्रभाकर कळंबे, सतीश मारबदे, विलास खोब्रागडे आदी उपस्थित होते.यावेळी राज्य सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी धोरणाचा विरोध करण्यासाठी व अंशदायी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करुन शासनाविरुध्द एकसंघ लढा उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा ठराव पारित करण्यात आला. जानेवारी २००४ व नोव्हेंबर २००५ पासून केंद्र शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी योजना पेन्शन लागू झाली. सन २००७ पासून कंत्राटी करणाचे धोरण राज्य सरकारने सुरु केले आहे. याला कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. मात्र कर्मचाºयांचा प्रतिकार कमी पडत असल्याने शासन त्यांची बाजू कर्मचाºयांवर थोपवित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.परिषदेला नरेश कुंभलकर, एस. बी. भोयर, संजय पडोळे, अशोक निमकर, माया रामटेके, जाधव साठवणे, दिलीप रोडके, कल्पना पाथ्थे, विशाल तायडे, रविंद्र मानापुरे, मधुसूदन चवळे, गोविंदराव चरडे, रमेशराव व्यवहारे, विरेंद्र ढबाले, रघुनाथ खराबे, बागडे, सुरेंद्र बन्सोड, लोणारे, राजेश राऊत, आशिष भुरे, श्याम राठोड, पडोळे, रोशन वंजारी, डी. एस. रामटेके उपस्थित होते.कर्मचाऱ्यांचे प्रबोधन महत्त्वाचेकेंद्र सरकारने जर अंशदायी पेन्शन योजना बंद करुन वैधानिक (जुनी) पेन्शन योजना कर्मचाºयांना लागू केली तरच राज्य सरकार यावर सकारात्मक विचार करेल असे व्यक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्य समन्वय समितीबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान केले होते. सदर मागणी संदर्भात प्रखर लढ्याच्या माध्यमातून दबाव आणून केंद्र व राज्य सरकारला निर्णय बदलविण्यास बाध्य करण्यासाठी कर्मचाºयांचे प्रथम प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.