शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

कंत्राटीकरण धोरण हाणून पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:11 IST

नियत वयोमर्यादेपर्यंत शासनाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली.

ठळक मुद्देपेन्शन बचाव संयुक्त परिषद : शासनाविरुद्ध कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती

आॅनलाईन लोकमतभंडारा : नियत वयोमर्यादेपर्यंत शासनाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली. मात्र २००८ पासून कंत्राटीकरणाचे धोरण राबविण्याचा घाट राज्य सरकार करीत आहे. हे धोरण हाणून पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकसंघ व्हावे असा सुर भंडारा येथे आयोजित पेन्शन बचाव संयुक्त परिषदेतून उमटला.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समिती भंडाराच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष अशोक थुल, राज्य सहकारी कर्मचारी संघाचे चंद्रहास सुटे, मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस अशोक दगडे, लिलाधर पाथोडे, जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अतुल वर्मा, प्रभाकर कळंबे, सतीश मारबदे, विलास खोब्रागडे आदी उपस्थित होते.यावेळी राज्य सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी धोरणाचा विरोध करण्यासाठी व अंशदायी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करुन शासनाविरुध्द एकसंघ लढा उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा ठराव पारित करण्यात आला. जानेवारी २००४ व नोव्हेंबर २००५ पासून केंद्र शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी योजना पेन्शन लागू झाली. सन २००७ पासून कंत्राटी करणाचे धोरण राज्य सरकारने सुरु केले आहे. याला कर्मचारी संघटनेने विरोध केला आहे. मात्र कर्मचाºयांचा प्रतिकार कमी पडत असल्याने शासन त्यांची बाजू कर्मचाºयांवर थोपवित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.परिषदेला नरेश कुंभलकर, एस. बी. भोयर, संजय पडोळे, अशोक निमकर, माया रामटेके, जाधव साठवणे, दिलीप रोडके, कल्पना पाथ्थे, विशाल तायडे, रविंद्र मानापुरे, मधुसूदन चवळे, गोविंदराव चरडे, रमेशराव व्यवहारे, विरेंद्र ढबाले, रघुनाथ खराबे, बागडे, सुरेंद्र बन्सोड, लोणारे, राजेश राऊत, आशिष भुरे, श्याम राठोड, पडोळे, रोशन वंजारी, डी. एस. रामटेके उपस्थित होते.कर्मचाऱ्यांचे प्रबोधन महत्त्वाचेकेंद्र सरकारने जर अंशदायी पेन्शन योजना बंद करुन वैधानिक (जुनी) पेन्शन योजना कर्मचाºयांना लागू केली तरच राज्य सरकार यावर सकारात्मक विचार करेल असे व्यक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्य समन्वय समितीबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान केले होते. सदर मागणी संदर्भात प्रखर लढ्याच्या माध्यमातून दबाव आणून केंद्र व राज्य सरकारला निर्णय बदलविण्यास बाध्य करण्यासाठी कर्मचाºयांचे प्रथम प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.