शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पाच तासांत कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार

By admin | Updated: November 14, 2016 00:31 IST

चलनातील नोटा बंद झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करून शासनाने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली आहे.

बीड : ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांचा संपूर्ण दिवस आता बँकेतच खर्च होत आहे. रविवारी बँका सुरू होत्या. विश्रांती, खरेदी टाळून लोक नोटा बदलून घेण्यासाठी बँकेच्या दारात रांगेत उभे होते.एटीएम बंद, बँकेत तोबा गर्दी, हजार-पाचशे रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या अशा बिकट परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांची पुरती कोंडी झाली आहे. दूधवाल्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच व्यवहारावर परिणाम झालेला दिसून येत आहे. नोटा बदलण्यासाठी अवघी ४ हजार रुपयांची मर्यादा असल्याने सर्वसामान्यांपासून ते थेट धनदांडग्यांची मोठी अडचण झाली आहे. उधार उसनवारीवरच थोडे फार व्यवहार केले जात आहे.रविवारी पाचव्या दिवशी सकाळपासूनच शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांमधून व्यवहार सुरू होते. नोटा बदलण्यासाठी व बँक व्यवहारासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी लांबच लांब रांगा असल्याचे पाहावयास मिळाले.कामगारांची त्रेधातिरपीटरविवारी हातावर पोट असणारे मजूर आठ दिवसांच्या रोजंदारीवर भाजीपाला, किराणा खरेदी करतात. मात्र, अनेकांना १०००, ५०० च्या नोटांमुळे मजुरी मिळाली नाही. काहींनी बँकेच्या रांगेत थांबून गाठीशी असलेली थोडीफार पुंजी काढण्याचा प्रयत्न केला. काहींचे काम झाले, बाकीच्यांचा मात्र गर्दीमुळे दिवस वाया गेला. बीड, नेकनूरच्या आठवडीबाजारात शुकशुकाटबीड शहरातील भाजीमंडई व नेकनूर येथे आठवडी बाजाराला जबर फटका बसला. हजार, पाचशे रुपयांच्या नोटा कोणीच स्वीकारण्यास तयार नव्हते. त्यामुळे केवळ चाळीस टक्केच व्यवहार होऊ शकले. त्यामुळे भाजीपाला, धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हातीच परतावे लागले. काही व्यापाऱ्यांची जुनी वसुली लांबली असून नव्याने साहित्य उधार दिले. सुट्या पैशांचे वांधे होते. पाचशे-हजार रूपयांची नोट पुढे करताच व्यापाऱ्यांच्या कपाळ्यावर आठ्या येत होत्या. त्यामुळे उलाढाल मंदावल्याचे पहावयास मिळाले.आॅनलाईन व्यवहारावर भररोख चलनाचा तुटवडा असल्यामुळे पैशाच्या देवाणघेवाणीवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन व्यवहारावर व्यापारी, नागरिकांनी भर दिल्याचे मागील चार दिवसात दिसून येत आहे. अनेकांनी घराचे हप्ते, एलआयसी, वीजबिल, फोनबिल, डीश रिचार्ज, मोबाईल रिचार्ज यासाठी आॅनलाईन बँकिंगवर भर दिला आहे. काहींनी नेटबँकिंग सुरू करण्यासाठी बँकेत अर्जही देण्यास सुरूवात केली आहे. बँकेतील रांगा, नोटांची चणचण व वाया जाणारा वेळ यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आॅनलाईन बँकिंगला प्राधान्य दिले जात असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)