शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
3
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
4
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
7
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
8
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
9
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
10
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
11
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
12
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
13
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
14
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
15
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
16
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
17
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
18
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
19
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
20
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...

१०,१६३ हेक्टरमधील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:34 IST

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देवातावरण बदल : सिंचनाअभावी रबीची केवळ २२ टक्के पेरणी

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २२ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, अकाली पाऊस, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत.यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने यासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी निर्धारित केले असले तरी शेतकºयांनी आतापर्यंत केवळ २२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. १० हजार १६३ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आलेली आहे.यावर्षी आजपर्यंत गहू पिकाची १,२७८ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली.हरभरा १,१७३ हेक्टर, लाख-लाखोळी ३ हजार ८७६, पोपट १३२, वटाना ६५, उडीद ७०६, मुंग ७८४, बरबटी ११, मका १३ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली. जवस ८८३, मोहरी ६२, गळीत पिके १ हेक्टर, भाजीपाला ९९७ हेक्टर, बटाटा ५७, मिरची १२१ तर इतर रबी पिकांची ११७५ हेक्टर क्षेत्रात लागवड क्षेत्रात लागवड करण्यात आल्याची माहिती आहे.अनेक पिकांची पेरणी रखडलीजिल्ह्यात परतीचा पाऊस पडला असला तरी रबी पिकांसाठी समाधानकारक नसल्यामुळे अनेक पिकांची पेरणी रखडली आहे. जिल्ह्यात केवळ २२ टक्के रबीची पेरणी झाली आहे. मसूर, वाल, चवळी, मोट व उडीद, सूर्यफुल, करडई, तीळ, ऐरंडी आदी पिकांची पेरणी झालेली नाही. खरीप हंगामात शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याची भर रबी हंगामात काढण्याचा शेतकºयांचा हेतू होता. मात्र ओलीताचे साधन नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केलीच नाही. भंडारा तालुक्यात ७ हजार ६५१ सर्वसाधारण क्षेत्रापैकी कुठेच पेरणी केली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मोहाडी तालुक्यात ३७२ हेक्टर, तुमसर ५ हजार ५१४, पवनी १ हजार २७५, साकोली ४७४, लाखनी ४८७ तर लाखांदुरात २ हजार ४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी केल्याची नोंद आहे.