शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

१०,१६३ हेक्टरमधील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:34 IST

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देवातावरण बदल : सिंचनाअभावी रबीची केवळ २२ टक्के पेरणी

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २२ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, अकाली पाऊस, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत.यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने यासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी निर्धारित केले असले तरी शेतकºयांनी आतापर्यंत केवळ २२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. १० हजार १६३ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आलेली आहे.यावर्षी आजपर्यंत गहू पिकाची १,२७८ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली.हरभरा १,१७३ हेक्टर, लाख-लाखोळी ३ हजार ८७६, पोपट १३२, वटाना ६५, उडीद ७०६, मुंग ७८४, बरबटी ११, मका १३ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली. जवस ८८३, मोहरी ६२, गळीत पिके १ हेक्टर, भाजीपाला ९९७ हेक्टर, बटाटा ५७, मिरची १२१ तर इतर रबी पिकांची ११७५ हेक्टर क्षेत्रात लागवड क्षेत्रात लागवड करण्यात आल्याची माहिती आहे.अनेक पिकांची पेरणी रखडलीजिल्ह्यात परतीचा पाऊस पडला असला तरी रबी पिकांसाठी समाधानकारक नसल्यामुळे अनेक पिकांची पेरणी रखडली आहे. जिल्ह्यात केवळ २२ टक्के रबीची पेरणी झाली आहे. मसूर, वाल, चवळी, मोट व उडीद, सूर्यफुल, करडई, तीळ, ऐरंडी आदी पिकांची पेरणी झालेली नाही. खरीप हंगामात शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याची भर रबी हंगामात काढण्याचा शेतकºयांचा हेतू होता. मात्र ओलीताचे साधन नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केलीच नाही. भंडारा तालुक्यात ७ हजार ६५१ सर्वसाधारण क्षेत्रापैकी कुठेच पेरणी केली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मोहाडी तालुक्यात ३७२ हेक्टर, तुमसर ५ हजार ५१४, पवनी १ हजार २७५, साकोली ४७४, लाखनी ४८७ तर लाखांदुरात २ हजार ४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी केल्याची नोंद आहे.