शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

१०,१६३ हेक्टरमधील पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:34 IST

वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देवातावरण बदल : सिंचनाअभावी रबीची केवळ २२ टक्के पेरणी

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील १० हजार १६३ हेक्टरमधील रबी पिके धोक्यात आली असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २२ टक्के रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाच्या लहरीपणा व किडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची भिस्त रबी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, अकाली पाऊस, किडींचा प्रादूर्भाव आदी विविध कारणामुळे पीक संकटात आहेत.यावर्षीच्या रबी हंगामासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निर्धारित केले आहे. यासंदर्भात कृषी विभागाने यासाठी ४५ हजार ६८७ हेक्टर क्षेत्र रब्बी पिकांसाठी निर्धारित केले असले तरी शेतकºयांनी आतापर्यंत केवळ २२ टक्के पेरणी पूर्ण केली आहे. १० हजार १६३ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आलेली आहे.यावर्षी आजपर्यंत गहू पिकाची १,२७८ हेक्टर क्षेत्रात गहू पिकाची लागवड करण्यात आली.हरभरा १,१७३ हेक्टर, लाख-लाखोळी ३ हजार ८७६, पोपट १३२, वटाना ६५, उडीद ७०६, मुंग ७८४, बरबटी ११, मका १३ हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकाची लागवड पूर्ण करण्यात आली. जवस ८८३, मोहरी ६२, गळीत पिके १ हेक्टर, भाजीपाला ९९७ हेक्टर, बटाटा ५७, मिरची १२१ तर इतर रबी पिकांची ११७५ हेक्टर क्षेत्रात लागवड क्षेत्रात लागवड करण्यात आल्याची माहिती आहे.अनेक पिकांची पेरणी रखडलीजिल्ह्यात परतीचा पाऊस पडला असला तरी रबी पिकांसाठी समाधानकारक नसल्यामुळे अनेक पिकांची पेरणी रखडली आहे. जिल्ह्यात केवळ २२ टक्के रबीची पेरणी झाली आहे. मसूर, वाल, चवळी, मोट व उडीद, सूर्यफुल, करडई, तीळ, ऐरंडी आदी पिकांची पेरणी झालेली नाही. खरीप हंगामात शेतकरी मेटाकुटीला आला असून त्याची भर रबी हंगामात काढण्याचा शेतकºयांचा हेतू होता. मात्र ओलीताचे साधन नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी रबी पिकांची पेरणी केलीच नाही. भंडारा तालुक्यात ७ हजार ६५१ सर्वसाधारण क्षेत्रापैकी कुठेच पेरणी केली नसल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मोहाडी तालुक्यात ३७२ हेक्टर, तुमसर ५ हजार ५१४, पवनी १ हजार २७५, साकोली ४७४, लाखनी ४८७ तर लाखांदुरात २ हजार ४१ हेक्टर क्षेत्रात पेरणी केल्याची नोंद आहे.