शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

धान पिकाचे ४५८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : दिनांक १० मे रोजी निसर्गाच्या दुष्टचक्राने आपली अवकृपा दाखवत पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत ४५८.५० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पालांदूर : दिनांक १० मे रोजी निसर्गाच्या दुष्टचक्राने आपली अवकृपा दाखवत पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत ४५८.५० हेक्टर, लाखनी तालुक्यात ८३५.७० हेक्टरवरील धान पिकाचे गारपिटीने सुमार नुकसान केले. याची दखल तालुका प्रशासनाने घेत थेट नुकसानग्रस्त शेतांवर जेवनाळा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भेट दिली. यावेळी तहसीलदार मल्लिक विरानी, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, खंडविकास अधिकारी डॉ. जाधव, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तथा शेतकरी बहुसंख्येने खेमराज गिरेपुंजे (जेवनाळा) यांच्या शेतावर उपस्थित होते.

सोमवारी भंडारा जिल्ह्यासह लाखनी तालुक्याला गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. दिवसभर मोकळे वातावरण असताना सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटीत लाखनी तालुक्यात ३,१८४ हेक्टर धानाच्या क्षेत्रफळापैकी ८३५.७० हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात प्रशासनाच्यावतीने ३३ टक्केच्या आत ४०७.८० हेक्टर, ३३ टक्केच्यावर ४२७.९० हेक्टर नुकसान नोंदविण्यात आले असून, १,०४३ शेतकरी संख्या दाखविण्यात आली आहे. पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत उन्हाळी धानाचे लागवडीखालील एकूण क्षेत्रफळ १४६७.२० हेक्टर दाखविण्यात आले आहे. यापैकी ४५८.५० हेक्टर जमीन नुकसानग्रस्त दाखविण्यात आली. यात ३३ टक्केचे आत २०७.३० तर ३३ टक्केच्यावर २५१.२० हेक्टर दाखवली असून, यात ५०१ शेतकरी प्रभावित झाले आहेत. भाजीपाल्यात १०.७० हेक्टरचे नुकसान असून, यात २२ शेतकरी प्रभावित झाले आहेत. मुगाचे २.८० हेक्टरवरील नुकसान झाले असून, यात ६ शेतकरी प्रभावित झाले आहेत.

बॉक्स

शेतकरी गहिवरला

शेवटच्या टोकात मेहनतीअंती हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल ठरल्याने शेतकरी सुमार संकटात सापडला आहे. तालुका प्रशासन प्रभावित शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानाची पाहणी करताना विचारलेल्या माहितीत मात्र शेतकरी गहिवरला.

मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनीसुद्धा गारपिटीने नुकसानग्रस्त शेतीचे निरीक्षण करून माहिती गोळा केली. शेतकऱ्यांना धीर देत हे ही दिवस निघून जातील, अशी आशा दिली. पालांदूर मंडलांंतर्गत ३४ गावांतील शेती गारपीट, वादळ वाऱ्याने प्रभावित झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.