शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धान पिकाचे ४५८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : दिनांक १० मे रोजी निसर्गाच्या दुष्टचक्राने आपली अवकृपा दाखवत पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत ४५८.५० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पालांदूर : दिनांक १० मे रोजी निसर्गाच्या दुष्टचक्राने आपली अवकृपा दाखवत पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत ४५८.५० हेक्टर, लाखनी तालुक्यात ८३५.७० हेक्टरवरील धान पिकाचे गारपिटीने सुमार नुकसान केले. याची दखल तालुका प्रशासनाने घेत थेट नुकसानग्रस्त शेतांवर जेवनाळा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भेट दिली. यावेळी तहसीलदार मल्लिक विरानी, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, खंडविकास अधिकारी डॉ. जाधव, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तथा शेतकरी बहुसंख्येने खेमराज गिरेपुंजे (जेवनाळा) यांच्या शेतावर उपस्थित होते.

सोमवारी भंडारा जिल्ह्यासह लाखनी तालुक्याला गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. दिवसभर मोकळे वातावरण असताना सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटीत लाखनी तालुक्यात ३,१८४ हेक्टर धानाच्या क्षेत्रफळापैकी ८३५.७० हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात प्रशासनाच्यावतीने ३३ टक्केच्या आत ४०७.८० हेक्टर, ३३ टक्केच्यावर ४२७.९० हेक्टर नुकसान नोंदविण्यात आले असून, १,०४३ शेतकरी संख्या दाखविण्यात आली आहे. पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत उन्हाळी धानाचे लागवडीखालील एकूण क्षेत्रफळ १४६७.२० हेक्टर दाखविण्यात आले आहे. यापैकी ४५८.५० हेक्टर जमीन नुकसानग्रस्त दाखविण्यात आली. यात ३३ टक्केचे आत २०७.३० तर ३३ टक्केच्यावर २५१.२० हेक्टर दाखवली असून, यात ५०१ शेतकरी प्रभावित झाले आहेत. भाजीपाल्यात १०.७० हेक्टरचे नुकसान असून, यात २२ शेतकरी प्रभावित झाले आहेत. मुगाचे २.८० हेक्टरवरील नुकसान झाले असून, यात ६ शेतकरी प्रभावित झाले आहेत.

बॉक्स

शेतकरी गहिवरला

शेवटच्या टोकात मेहनतीअंती हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल ठरल्याने शेतकरी सुमार संकटात सापडला आहे. तालुका प्रशासन प्रभावित शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानाची पाहणी करताना विचारलेल्या माहितीत मात्र शेतकरी गहिवरला.

मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनीसुद्धा गारपिटीने नुकसानग्रस्त शेतीचे निरीक्षण करून माहिती गोळा केली. शेतकऱ्यांना धीर देत हे ही दिवस निघून जातील, अशी आशा दिली. पालांदूर मंडलांंतर्गत ३४ गावांतील शेती गारपीट, वादळ वाऱ्याने प्रभावित झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.