शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकाचे ४५८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पालांदूर : दिनांक १० मे रोजी निसर्गाच्या दुष्टचक्राने आपली अवकृपा दाखवत पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत ४५८.५० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पालांदूर : दिनांक १० मे रोजी निसर्गाच्या दुष्टचक्राने आपली अवकृपा दाखवत पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत ४५८.५० हेक्टर, लाखनी तालुक्यात ८३५.७० हेक्टरवरील धान पिकाचे गारपिटीने सुमार नुकसान केले. याची दखल तालुका प्रशासनाने घेत थेट नुकसानग्रस्त शेतांवर जेवनाळा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भेट दिली. यावेळी तहसीलदार मल्लिक विरानी, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, खंडविकास अधिकारी डॉ. जाधव, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तथा शेतकरी बहुसंख्येने खेमराज गिरेपुंजे (जेवनाळा) यांच्या शेतावर उपस्थित होते.

सोमवारी भंडारा जिल्ह्यासह लाखनी तालुक्याला गारपिटीने जबरदस्त तडाखा दिला. दिवसभर मोकळे वातावरण असताना सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटीत लाखनी तालुक्यात ३,१८४ हेक्टर धानाच्या क्षेत्रफळापैकी ८३५.७० हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात प्रशासनाच्यावतीने ३३ टक्केच्या आत ४०७.८० हेक्टर, ३३ टक्केच्यावर ४२७.९० हेक्टर नुकसान नोंदविण्यात आले असून, १,०४३ शेतकरी संख्या दाखविण्यात आली आहे. पालांदूर मंडल कृषी कार्यालयांतर्गत उन्हाळी धानाचे लागवडीखालील एकूण क्षेत्रफळ १४६७.२० हेक्टर दाखविण्यात आले आहे. यापैकी ४५८.५० हेक्टर जमीन नुकसानग्रस्त दाखविण्यात आली. यात ३३ टक्केचे आत २०७.३० तर ३३ टक्केच्यावर २५१.२० हेक्टर दाखवली असून, यात ५०१ शेतकरी प्रभावित झाले आहेत. भाजीपाल्यात १०.७० हेक्टरचे नुकसान असून, यात २२ शेतकरी प्रभावित झाले आहेत. मुगाचे २.८० हेक्टरवरील नुकसान झाले असून, यात ६ शेतकरी प्रभावित झाले आहेत.

बॉक्स

शेतकरी गहिवरला

शेवटच्या टोकात मेहनतीअंती हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल ठरल्याने शेतकरी सुमार संकटात सापडला आहे. तालुका प्रशासन प्रभावित शेतकऱ्यांच्या शेतात झालेल्या नुकसानाची पाहणी करताना विचारलेल्या माहितीत मात्र शेतकरी गहिवरला.

मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर यांनीसुद्धा गारपिटीने नुकसानग्रस्त शेतीचे निरीक्षण करून माहिती गोळा केली. शेतकऱ्यांना धीर देत हे ही दिवस निघून जातील, अशी आशा दिली. पालांदूर मंडलांंतर्गत ३४ गावांतील शेती गारपीट, वादळ वाऱ्याने प्रभावित झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानाचा पंचनामा करून तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी रास्त अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.