शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

एका गंभीर क्षणी जनता दरबार स्तब्ध

By admin | Updated: March 5, 2017 00:29 IST

सुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, ....

नाना पटोले म्हणाले, शेवटच्या व्यक्तीला प्रवाहात आणा : मोहाडीतील जनता दरबारात अधिकाऱ्यांना समजराजू बांते मोहाडीसुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, सर, आम्ही केव्हाही मरु शकतो. हे एक वाक्य नानाभाऊच्या काळजाला भेदून गेले. त्यावेळी संपूर्ण जनतादरबार धीरगंभीर झाला होता. मोहाडीत अशी हेलवणारी बाब गंभीरतेने घेणारी संवेदनशील माणसे मोहाडीत नाहीत का? असा प्रश्न करुन मार्ग काढण्याचे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले.मोहाडीत तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित जनता दरबारात खासदार नाना पटोले बोलत होते. मंचावर आमदार चरण वाघमारे, तहसिलदार धनंजय देशमुख, सभापती हरिश्चंद्र बंधाटे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, उपसभापती विलास गोबाडे, बाबू ठवकर, युवराज जमईवार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, आम्ही जनतेचे सेवक आहोत. उणीदुणी काढण्यासाठी जनता दरबार नाही. प्रशासनात काम करताना अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. प्रत्येक काम माझे आहे. या दृष्टीने बघा. नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडा. लोकशाही सक्षम करण्यासाठी शेवटचा व्यक्तीला प्रवाहात आणा. जबाबदारी झटकू नका, अशी समज खासदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.प्रशासनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना कशी करावी यासाठी यावेळी नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांना भावनिक साद घातली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या चुकीच्या पध्दतीने तयार झाल्याचा आरोप झाला. महसुल विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे तहसिलदार धंनजय देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबती झाली. हे साहेब, कार्यालयात कमी अन् बाहेर अधिक राहतात. ग्रामीण जनतेशी इंग्रजीतून संवाद साधतात. अशी समस्या अनेकांनी मांडली. अनेक गावात बनावट शिधापत्रिकाधारक आहेत. वरठी येथे तब्बल २६५ शिधापत्रिका बनावट असल्याची तक्रार करण्यात आली. गरीबांच्या घरातील धान्य बाजारात जाते अन् काहींना अन्न मिळत नाही. हा प्रश्न गंभीर असून याची चौकशी सात दिवसात करा, याशिवाय गरज पडली तर मुंबईची टीम पाठवून आकस्मिक चौकशी करणार असल्याचे खासदारांनी खडसावले.अतिक्रमणासंबंधी दंड करु नका. फेरफार केले जात नाही. गॅस धारकाला रॉकेल मिळतो. संजय गांधी, श्रावण बाळ योजनेत घोळ आहे. अन्न सुरक्षा यादीत गरजू लाभार्थी सुटले. शौचालय, घरकूल, नाल्या, रस्ते समाज मंदिर आदी शासकीय योजनेसाठी रेती कशी मिळेल यातून मार्ग काढला जावा. रेतीचे क्षमता अधिक असलेले ट्रक रस्त्याने जातात, रस्ते खराब होतात. त्यासाठी रेती घाट बंद करण्याचा मानस खासदारांनी बोलून दाखविला. महसूलशिवाय प्रधानमंत्री विमा योजनेसाठी लाभार्थ्यांचे वेळेत प्रिमियम कापले जात नाही. यामुळे बँकेच्या चुकीमुळे वरठी येथील क्षिरसागर कुटूंबाला विमा कंपनीने लाभ दिला नाही. वनहक्काचे दावे २,४३२ अपात्र आहेत. हे दावे निकालात काढण्यासाठी वनहक्क समिती, तलाठी यांना एकत्र बोलावून प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या. तालुक्यात किती डी.पी. लागतात याची माहिती घेऊन कळवा, असे सांगितले.धापेवाड्याचे पाणी मोहाडीच्या शेतीपर्यंत लवकरच पोहचणार आहे. विकासासाठी भांडण करु नका. प्रत्येकांच्या घरी योजना जावी, अशी माझी तळमळ आहे. सगळ्यांनी एकजुटीने कामाला लागा. भंडारा जिल्हा गरीबीतून बाहेर काढायचा आहे. विकासासाठी शेवटचा व्यक्ती प्रवाहात आणा. त्यांच्या तोंडातील घास हिसकावू नका. अधिकारी जनतेचे काम तळमळीने करीत नसल्याने संताप येतो. गरीबांचे अतिक्रमण नियमित करा. अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. पण, ज्यांनी व्यवस्थित काम केले नाही. जनतेला त्रास दिले तर त्याचे पोस्टमार्टमही केले जाईल, असे बजावून सांगितले. जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.