शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

एका गंभीर क्षणी जनता दरबार स्तब्ध

By admin | Updated: March 5, 2017 00:29 IST

सुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, ....

नाना पटोले म्हणाले, शेवटच्या व्यक्तीला प्रवाहात आणा : मोहाडीतील जनता दरबारात अधिकाऱ्यांना समजराजू बांते मोहाडीसुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, सर, आम्ही केव्हाही मरु शकतो. हे एक वाक्य नानाभाऊच्या काळजाला भेदून गेले. त्यावेळी संपूर्ण जनतादरबार धीरगंभीर झाला होता. मोहाडीत अशी हेलवणारी बाब गंभीरतेने घेणारी संवेदनशील माणसे मोहाडीत नाहीत का? असा प्रश्न करुन मार्ग काढण्याचे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले.मोहाडीत तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित जनता दरबारात खासदार नाना पटोले बोलत होते. मंचावर आमदार चरण वाघमारे, तहसिलदार धनंजय देशमुख, सभापती हरिश्चंद्र बंधाटे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, उपसभापती विलास गोबाडे, बाबू ठवकर, युवराज जमईवार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, आम्ही जनतेचे सेवक आहोत. उणीदुणी काढण्यासाठी जनता दरबार नाही. प्रशासनात काम करताना अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. प्रत्येक काम माझे आहे. या दृष्टीने बघा. नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडा. लोकशाही सक्षम करण्यासाठी शेवटचा व्यक्तीला प्रवाहात आणा. जबाबदारी झटकू नका, अशी समज खासदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.प्रशासनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना कशी करावी यासाठी यावेळी नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांना भावनिक साद घातली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या चुकीच्या पध्दतीने तयार झाल्याचा आरोप झाला. महसुल विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे तहसिलदार धंनजय देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबती झाली. हे साहेब, कार्यालयात कमी अन् बाहेर अधिक राहतात. ग्रामीण जनतेशी इंग्रजीतून संवाद साधतात. अशी समस्या अनेकांनी मांडली. अनेक गावात बनावट शिधापत्रिकाधारक आहेत. वरठी येथे तब्बल २६५ शिधापत्रिका बनावट असल्याची तक्रार करण्यात आली. गरीबांच्या घरातील धान्य बाजारात जाते अन् काहींना अन्न मिळत नाही. हा प्रश्न गंभीर असून याची चौकशी सात दिवसात करा, याशिवाय गरज पडली तर मुंबईची टीम पाठवून आकस्मिक चौकशी करणार असल्याचे खासदारांनी खडसावले.अतिक्रमणासंबंधी दंड करु नका. फेरफार केले जात नाही. गॅस धारकाला रॉकेल मिळतो. संजय गांधी, श्रावण बाळ योजनेत घोळ आहे. अन्न सुरक्षा यादीत गरजू लाभार्थी सुटले. शौचालय, घरकूल, नाल्या, रस्ते समाज मंदिर आदी शासकीय योजनेसाठी रेती कशी मिळेल यातून मार्ग काढला जावा. रेतीचे क्षमता अधिक असलेले ट्रक रस्त्याने जातात, रस्ते खराब होतात. त्यासाठी रेती घाट बंद करण्याचा मानस खासदारांनी बोलून दाखविला. महसूलशिवाय प्रधानमंत्री विमा योजनेसाठी लाभार्थ्यांचे वेळेत प्रिमियम कापले जात नाही. यामुळे बँकेच्या चुकीमुळे वरठी येथील क्षिरसागर कुटूंबाला विमा कंपनीने लाभ दिला नाही. वनहक्काचे दावे २,४३२ अपात्र आहेत. हे दावे निकालात काढण्यासाठी वनहक्क समिती, तलाठी यांना एकत्र बोलावून प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या. तालुक्यात किती डी.पी. लागतात याची माहिती घेऊन कळवा, असे सांगितले.धापेवाड्याचे पाणी मोहाडीच्या शेतीपर्यंत लवकरच पोहचणार आहे. विकासासाठी भांडण करु नका. प्रत्येकांच्या घरी योजना जावी, अशी माझी तळमळ आहे. सगळ्यांनी एकजुटीने कामाला लागा. भंडारा जिल्हा गरीबीतून बाहेर काढायचा आहे. विकासासाठी शेवटचा व्यक्ती प्रवाहात आणा. त्यांच्या तोंडातील घास हिसकावू नका. अधिकारी जनतेचे काम तळमळीने करीत नसल्याने संताप येतो. गरीबांचे अतिक्रमण नियमित करा. अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. पण, ज्यांनी व्यवस्थित काम केले नाही. जनतेला त्रास दिले तर त्याचे पोस्टमार्टमही केले जाईल, असे बजावून सांगितले. जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.