शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

एका गंभीर क्षणी जनता दरबार स्तब्ध

By admin | Updated: March 5, 2017 00:29 IST

सुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, ....

नाना पटोले म्हणाले, शेवटच्या व्यक्तीला प्रवाहात आणा : मोहाडीतील जनता दरबारात अधिकाऱ्यांना समजराजू बांते मोहाडीसुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, सर, आम्ही केव्हाही मरु शकतो. हे एक वाक्य नानाभाऊच्या काळजाला भेदून गेले. त्यावेळी संपूर्ण जनतादरबार धीरगंभीर झाला होता. मोहाडीत अशी हेलवणारी बाब गंभीरतेने घेणारी संवेदनशील माणसे मोहाडीत नाहीत का? असा प्रश्न करुन मार्ग काढण्याचे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले.मोहाडीत तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित जनता दरबारात खासदार नाना पटोले बोलत होते. मंचावर आमदार चरण वाघमारे, तहसिलदार धनंजय देशमुख, सभापती हरिश्चंद्र बंधाटे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, उपसभापती विलास गोबाडे, बाबू ठवकर, युवराज जमईवार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, आम्ही जनतेचे सेवक आहोत. उणीदुणी काढण्यासाठी जनता दरबार नाही. प्रशासनात काम करताना अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. प्रत्येक काम माझे आहे. या दृष्टीने बघा. नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडा. लोकशाही सक्षम करण्यासाठी शेवटचा व्यक्तीला प्रवाहात आणा. जबाबदारी झटकू नका, अशी समज खासदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.प्रशासनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना कशी करावी यासाठी यावेळी नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांना भावनिक साद घातली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या चुकीच्या पध्दतीने तयार झाल्याचा आरोप झाला. महसुल विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे तहसिलदार धंनजय देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबती झाली. हे साहेब, कार्यालयात कमी अन् बाहेर अधिक राहतात. ग्रामीण जनतेशी इंग्रजीतून संवाद साधतात. अशी समस्या अनेकांनी मांडली. अनेक गावात बनावट शिधापत्रिकाधारक आहेत. वरठी येथे तब्बल २६५ शिधापत्रिका बनावट असल्याची तक्रार करण्यात आली. गरीबांच्या घरातील धान्य बाजारात जाते अन् काहींना अन्न मिळत नाही. हा प्रश्न गंभीर असून याची चौकशी सात दिवसात करा, याशिवाय गरज पडली तर मुंबईची टीम पाठवून आकस्मिक चौकशी करणार असल्याचे खासदारांनी खडसावले.अतिक्रमणासंबंधी दंड करु नका. फेरफार केले जात नाही. गॅस धारकाला रॉकेल मिळतो. संजय गांधी, श्रावण बाळ योजनेत घोळ आहे. अन्न सुरक्षा यादीत गरजू लाभार्थी सुटले. शौचालय, घरकूल, नाल्या, रस्ते समाज मंदिर आदी शासकीय योजनेसाठी रेती कशी मिळेल यातून मार्ग काढला जावा. रेतीचे क्षमता अधिक असलेले ट्रक रस्त्याने जातात, रस्ते खराब होतात. त्यासाठी रेती घाट बंद करण्याचा मानस खासदारांनी बोलून दाखविला. महसूलशिवाय प्रधानमंत्री विमा योजनेसाठी लाभार्थ्यांचे वेळेत प्रिमियम कापले जात नाही. यामुळे बँकेच्या चुकीमुळे वरठी येथील क्षिरसागर कुटूंबाला विमा कंपनीने लाभ दिला नाही. वनहक्काचे दावे २,४३२ अपात्र आहेत. हे दावे निकालात काढण्यासाठी वनहक्क समिती, तलाठी यांना एकत्र बोलावून प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या. तालुक्यात किती डी.पी. लागतात याची माहिती घेऊन कळवा, असे सांगितले.धापेवाड्याचे पाणी मोहाडीच्या शेतीपर्यंत लवकरच पोहचणार आहे. विकासासाठी भांडण करु नका. प्रत्येकांच्या घरी योजना जावी, अशी माझी तळमळ आहे. सगळ्यांनी एकजुटीने कामाला लागा. भंडारा जिल्हा गरीबीतून बाहेर काढायचा आहे. विकासासाठी शेवटचा व्यक्ती प्रवाहात आणा. त्यांच्या तोंडातील घास हिसकावू नका. अधिकारी जनतेचे काम तळमळीने करीत नसल्याने संताप येतो. गरीबांचे अतिक्रमण नियमित करा. अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. पण, ज्यांनी व्यवस्थित काम केले नाही. जनतेला त्रास दिले तर त्याचे पोस्टमार्टमही केले जाईल, असे बजावून सांगितले. जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.