शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

एका गंभीर क्षणी जनता दरबार स्तब्ध

By admin | Updated: March 5, 2017 00:29 IST

सुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, ....

नाना पटोले म्हणाले, शेवटच्या व्यक्तीला प्रवाहात आणा : मोहाडीतील जनता दरबारात अधिकाऱ्यांना समजराजू बांते मोहाडीसुभाष वॉर्ड येथे पाण्याची टाकी आहे. त्या पाण्याच्या छायेखाली नगरधने नावाचा कुटूंब राहते. त्या कुटूंबातील शाळेत शिकणाऱ्या मुलींने कैफियत मांडली, सर, आम्ही केव्हाही मरु शकतो. हे एक वाक्य नानाभाऊच्या काळजाला भेदून गेले. त्यावेळी संपूर्ण जनतादरबार धीरगंभीर झाला होता. मोहाडीत अशी हेलवणारी बाब गंभीरतेने घेणारी संवेदनशील माणसे मोहाडीत नाहीत का? असा प्रश्न करुन मार्ग काढण्याचे निर्देश खासदार नाना पटोले यांनी दिले.मोहाडीत तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित जनता दरबारात खासदार नाना पटोले बोलत होते. मंचावर आमदार चरण वाघमारे, तहसिलदार धनंजय देशमुख, सभापती हरिश्चंद्र बंधाटे, नगराध्यक्ष स्वाती निमजे, उपसभापती विलास गोबाडे, बाबू ठवकर, युवराज जमईवार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर पंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी नाना पटोले म्हणाले, आम्ही जनतेचे सेवक आहोत. उणीदुणी काढण्यासाठी जनता दरबार नाही. प्रशासनात काम करताना अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करावा. प्रत्येक काम माझे आहे. या दृष्टीने बघा. नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडा. लोकशाही सक्षम करण्यासाठी शेवटचा व्यक्तीला प्रवाहात आणा. जबाबदारी झटकू नका, अशी समज खासदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली.प्रशासनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना कशी करावी यासाठी यावेळी नाना पटोले यांनी अधिकाऱ्यांना भावनिक साद घातली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या चुकीच्या पध्दतीने तयार झाल्याचा आरोप झाला. महसुल विभागाचे प्रतिनिधीत्व करणारे तहसिलदार धंनजय देशमुख यांच्यावर प्रश्नांची सरबती झाली. हे साहेब, कार्यालयात कमी अन् बाहेर अधिक राहतात. ग्रामीण जनतेशी इंग्रजीतून संवाद साधतात. अशी समस्या अनेकांनी मांडली. अनेक गावात बनावट शिधापत्रिकाधारक आहेत. वरठी येथे तब्बल २६५ शिधापत्रिका बनावट असल्याची तक्रार करण्यात आली. गरीबांच्या घरातील धान्य बाजारात जाते अन् काहींना अन्न मिळत नाही. हा प्रश्न गंभीर असून याची चौकशी सात दिवसात करा, याशिवाय गरज पडली तर मुंबईची टीम पाठवून आकस्मिक चौकशी करणार असल्याचे खासदारांनी खडसावले.अतिक्रमणासंबंधी दंड करु नका. फेरफार केले जात नाही. गॅस धारकाला रॉकेल मिळतो. संजय गांधी, श्रावण बाळ योजनेत घोळ आहे. अन्न सुरक्षा यादीत गरजू लाभार्थी सुटले. शौचालय, घरकूल, नाल्या, रस्ते समाज मंदिर आदी शासकीय योजनेसाठी रेती कशी मिळेल यातून मार्ग काढला जावा. रेतीचे क्षमता अधिक असलेले ट्रक रस्त्याने जातात, रस्ते खराब होतात. त्यासाठी रेती घाट बंद करण्याचा मानस खासदारांनी बोलून दाखविला. महसूलशिवाय प्रधानमंत्री विमा योजनेसाठी लाभार्थ्यांचे वेळेत प्रिमियम कापले जात नाही. यामुळे बँकेच्या चुकीमुळे वरठी येथील क्षिरसागर कुटूंबाला विमा कंपनीने लाभ दिला नाही. वनहक्काचे दावे २,४३२ अपात्र आहेत. हे दावे निकालात काढण्यासाठी वनहक्क समिती, तलाठी यांना एकत्र बोलावून प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना तहसिलदारांना दिल्या. तालुक्यात किती डी.पी. लागतात याची माहिती घेऊन कळवा, असे सांगितले.धापेवाड्याचे पाणी मोहाडीच्या शेतीपर्यंत लवकरच पोहचणार आहे. विकासासाठी भांडण करु नका. प्रत्येकांच्या घरी योजना जावी, अशी माझी तळमळ आहे. सगळ्यांनी एकजुटीने कामाला लागा. भंडारा जिल्हा गरीबीतून बाहेर काढायचा आहे. विकासासाठी शेवटचा व्यक्ती प्रवाहात आणा. त्यांच्या तोंडातील घास हिसकावू नका. अधिकारी जनतेचे काम तळमळीने करीत नसल्याने संताप येतो. गरीबांचे अतिक्रमण नियमित करा. अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. पण, ज्यांनी व्यवस्थित काम केले नाही. जनतेला त्रास दिले तर त्याचे पोस्टमार्टमही केले जाईल, असे बजावून सांगितले. जनता दरबारात समस्या मांडण्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.