शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शेतशिवार चोरांच्या निशाण्यावर

By admin | Updated: November 4, 2015 00:40 IST

कास्तकारांच्या उघड्या शिवारातल्या मालावर पाखरांची नेहमीच वक्रदृष्टी असते.

कास्तकार बेजार : वीज वितरणचा अंधार ठरला सुकाळतुमसर : कास्तकारांच्या उघड्या शिवारातल्या मालावर पाखरांची नेहमीच वक्रदृष्टी असते. पण गेल्या वर्षभरापासून उघड्या वावरातून कृषिपयोगी साहित्य चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. प्रामुख्याने कृषिपंप उखडून नेण्याच्या घटना लक्षणीय आहेत. एकीकडे नापिकीशी झुंज द्यायची आणि दुसरीकडे चोरट्यांचा जाच सोसायचा, अशा दुष्टचक्रात कास्तकार सापडले आहेत. विशेष कृषिपंप चोरीची प्रकरणे पोलीस प्रशासनाकडूनही दुर्लक्षित आहेत.बेभरवशाच्या पावसाला तोंड देऊन उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय करण्यासाठी जिवाचा आटापिटा चालविला आहे. पदरमोड करून प्रसंगी घरातील भांडीकुंडी विकून अल्पभूधारक शेतकऱ्यांनी शेतात पाण्याची सोय केली. विहिरीवर कृषिपंप बसविले. शासनानेही पुढाकार घेत अनेकांना सिंचन विहिरी मंजूर केल्या. बऱ्याच ठिकाणी पाणीही चांगले लागले. मात्र, या पाण्याचा प्रत्यक्ष ओलिताकरिता लाभ होण्यासाठी शेतात २४ तास सुरळीत विजपुरवठा असण्याची नितांत गरज आहे. असे असताना भारनियमनाच्या फेऱ्यातून शेतकऱ्यांची सुटका होताना दिसत नाही. त्यामुळे पाणी असूनही वीजच नसल्याने पाण्याने भरलेल्या विहिरी आणि त्यावर बसविलेले कृषिपंप बेवारस स्थितीत असल्यासारखे आढळतात. अशा शेतांवर गावातील चोराचपाट्यांची वक्रदृष्टी वळली आहे. वीजपुरवठा नसल्याने ज्या ओलिताविना पडून असलेले कृषिपंप म्हणजे चोरट्यांसाठी आयते कुरणच ठरत आहे. रात्रीच्या वेळेस पाना पेचकस घेऊन हे चोरटे शिवारात फिरत आहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात हजारो कृषिपंपांची चोरट्यांनी वाट लावली आहे. विशेष म्हणजे, कृषिपंपाची चोरी झाल्यानंतर संबंधित कास्तकारही सहसा पोलीस ठाण्यापर्यंत तक्रार दाखल करण्यासाठी जात नाही. ही बाब चोर आणि पोलिसांच्याही पथ्यावर पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)