शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:48 IST

आजपर्यंत ज्यांना काहीच मिळाले नाही. मूलभूत गरजाही त्यांच्या समोर सातत्याने समस्या होऊन उभ्या असतात. सगळ्यात मागास असणारे भटके विमुक्त समाज विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादासाहेब इदाते यांनी केले.

ठळक मुद्देदादासाहेब इदाते : साकोली येथे मासेमारांचा महामेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : आजपर्यंत ज्यांना काहीच मिळाले नाही. मूलभूत गरजाही त्यांच्या समोर सातत्याने समस्या होऊन उभ्या असतात. सगळ्यात मागास असणारे भटके विमुक्त समाज विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादासाहेब इदाते यांनी केले.साकोली येथे रविवारला परेड ग्राऊंड मैदानावर मत्स्य सहकार महर्षी खासदार स्व. जतिरामजी बर्वे यांचा जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त मासेमारांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्टीजन वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव हिवलेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून बर्वे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक बर्वे, प्रमोद काळबांधे, दीनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, भंडारा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जेष्ठ साहित्यिक माणिक गेडाम, कृष्णाजी नागपूरे, के. एन. नान्हे, राजेंद्र बढीये, धर्मपाल शेंडे, टेकचंद मारबदे, चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे यशवंत दिघोरे, संजय केवट आदी उपस्थित होते.दादासाहेब इदाते म्हणाले, शेवटच्या घटकांत मोडणाऱ्या विमुक्त भटके मासेमार समाजाला शासनाकडून सर्व सोयीसवलती देऊन प्रगत समाजाच्या बरोबरीने आणावे लागेल. भटक्या-विमुक्तांसाठीही कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यात यावा. आदिवासींसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय आहे. त्याच धर्तीवर या समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करावे. भटक्या विमुक्त जातीत येणाºया हा मासेमार समाज प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात आहे. त्यामुळे एका समाजाला देशभर एकाच प्रवर्गाचा दर्जा देण्यात यावा, गत तीन वर्षांत ३६ राज्यातील एक हजार ६५८ जातीच्या लोकांना भेटलो. त्यांच्या सामाजिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास केल्यावर त्या आधारे इदाते आयोग तयार करून २० ठळक मागण्या केल्या आहेत. भटके, विमुक्त, मच्छिमार, विशेष मागासवर्गीय अशा उपेक्षित व वंचित जमातीच्या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाही तर, पुढच्या निवडणुकीत आम्ही आमचे काम करू, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.सदाशिव हिवलेकर यांनी भारत सरकारने इदाते आयोग लागू करावा, भटक्या-विमुक्तांना घटनात्मक संरक्षण द्यावे, मासेमारांसाठी कल्याणकारी धोरण लागू करावे, स्थानिक स्वराज्य संस्थांत स्वतंत्र आरक्षण द्यावे, तलावांची लीज पूर्ववत करावी या मागण्या केल्या.यावेळी दीनानाथ वाघमारे, डॉ. योगेश दुधपचारे यांनी मार्गदर्शन केले. महिला कार्यशाळेत महिला संघर्ष वाहिनीतर्फे शिक्षण, रोजगार, बचतगट आदी विषयांवर अर्चना डोंगरे, भाग्यश्री ठाकरे, प्रणिती मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. संचालन डॉ. योगेश दुधपचारे यांनी केले. आभार प्रणिती मेश्राम यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाोसाठी अशोक शेंडे, उमराव मांढरे, हरिश्चंद्र शहारे, यशवंत दिघोरे, राहुल पडाळ, मनोज केवट, अमोल बावणे, वासुदेव खेडकर, मनिराम मौजे, हर्षल वाघमारे, सूनिता मोहनकर यांनी सहकार्य केले.