शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:30 IST

जलयुक्त शिवार अभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्हयातील ५६ गावे निवडण्यात आली.

जिल्हाधिकारी चौधरी : जलयुक्त शिवार अभियान कार्यशाळाभंडारा : जलयुक्त शिवार अभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्हयातील ५६ गावे निवडण्यात आली. असून लोकसहभागातून शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केल्या.जलयुक्त शिवार सन २०१७-१८ चा गाव आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्हयातील सर्व यंत्रणांची कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपवन संरक्षक उमेश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, अभियान राबवितांना जास्तीत जास्त लोकसहभागावर भर देण्यात यावा. गावातील शिवार फेरी आटोपलेली तसेच अजून बाकी आहे. त्या गावांचा शास्त्रोक्त पध्दतीने आराखडा तयार करा. पाण्याचा ताळेबंद तयार करा. अडचणी आल्यास तालुका कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. सर्वांनी गाव पातळीवर चमू तयार करावी. या ५६ गावांमध्ये जी जलयुक्त शिवारची कामे होणार आहे. त्यांची पाहणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या कामांसाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करावे व जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा, जी गावे चांगली कामे करतील त्या गावांना पारितोषिक देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी रब्बीमध्ये चांगले नियोजन केले तर चांगले उत्पादन येऊ शकते. शिवार फेरी ज्या गावात झाले नसतील तर ते करावे. जलयुक्त शिवार अभियानाचे आराखडे १० मार्चपर्यंत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात डॉ. नलिनी भोयर यांनी भू-गभार्तील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पाणी उपलब्ध करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे या बाबत माहिती दिली. तसेच अस्तित्वात असलेले व निकामी असलेले पाण्याचे स्त्रोत याबाबत जाणीव जागृती करणे, पाणलोट विकासाची कामे सिनाबां, विहिर पुनर्भरण, कालवा दुरुस्तीची कामे करावयाची असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान तंत्रशुध्द पध्दतीने राबविण्यासाठी पाण्याचा ताळेबंद तयार करणे आवश्यक आहे. तसेच नव्याने कामे हाती घेवून ते आराखडयात घ्यावे, दुरुस्तीची कामे सुध्दा यात घ्यावे, असे त्या म्हणाल्या. जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५-१६ मध्ये वर्षी ८६ गावे तर सन २०१६-१७ मध्ये ५९ गावे निवडली होती. तसेच सन२०१७-१८ मध्ये ५६ गावे निवडण्यात आली असून आतापर्यंत एकूण ३७ हजार ७५५ टिसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे व १६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत तांत्रिक पध्दतीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे व्हावीत यादृष्टीने तालुका कृषि अधिकारी किशोर पात्रीकर व वरीष्ठ भूवैज्ञानिक श्री. भुसारी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. उपस्थित सरपंचांनी त्यांच्या समस्या मांडल्या, त्यांचे निराकरण करण्यात आले. या कार्यशाळेकरीता वनपाल, ग्रामसेवक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शाखा अभियंता, सरपंच उपस्थित होते. (प्रतिनिधी)