शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:33 IST

वाकेश्वर : अलीकडच्या काळात निसर्ग बदलत चालला आहे. ऋतुचक्र बदलत चालल्याने वातावरण, हवामान, पर्यावरण बदलावर परिणाम होत आहे. आज ...

वाकेश्वर : अलीकडच्या काळात निसर्ग बदलत चालला आहे. ऋतुचक्र बदलत चालल्याने वातावरण, हवामान, पर्यावरण बदलावर परिणाम होत आहे. आज कोरोनामुळे सर्वांचीच ऑक्सिजनसाठी धावपळ सुरू आहे. या जागतिक कोरोना महामारीने माणूस पुरता घायाळ झाला आहे. हे कोणामुळे घडतंय आणि का घडतंय, याला जबाबदार कोण याचा प्रत्येकाने विचार करणे खूप गरजेचे झाले आहे. अनेक ठिकाणी डॉक्टरसुद्धा आपल्या औषधांच्या चिठ्ठीवर झाडे लावा, झाडे जगवा, ऑक्सिजन वाढवा असा सल्ला देत आहेत.

राज्यातील वृक्ष अच्छादन क्षेत्र वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्ष लागवड योजना अमलात आणली. १३ कोटी वृक्ष लागवडीची घोषणा शासनाने केली होती. पण लावलेली नेमकी किती रोपे जगली याची नोंद शासनाकडे आजही नाही. डंका पिटून वृक्ष लागवड करण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीला वृक्षाचे महत्त्व पटवून देऊन शासनाने वृक्षाचे जतन व संगोपन करणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री - पुरुष, आबालवृद्ध, लहान-मोठे शाळकरी मुले, मुली प्रत्येकाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने आता बिगरसरकारी संस्था, वृक्षप्रेमी संघटना व गावागावातील सामान्य जनतेचा सहभाग घेऊन वृक्षलागवड योजना ही लोकचळवळ म्हणून उभी करायला पाहिजे, तरच भविष्यातील ऑक्सिजनचे संकट टाळता येणार आहे. सध्या कोरोना संकटात सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. जो तो ऑक्सिजनवर बोलताना दिसून येत आहे. तसेच ऑक्सिजन वाढविण्यासाठी प्रत्येकाची धडपड आहे. ऑक्सिजनची कमतरता अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण ठरत आहे. पृथ्वीवर औषधांचा व ऑक्सिजनचे एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे असतात. मानवावर आलेल्या या कोरोना संकटामुळे आज सर्वांना ऑक्सिजनचे महत्त्व कळू लागले असून, भविष्यात चांगल्या ऑक्सिजसाठी वृक्षारोपण चळवळ उभारण्याची गरज आहे.

मानव प्राणी तसेच पर्यावरणासाठी वरदान असणारे पिंपळाचे झाड दिवसातून २४ तास ऑक्सिजन देतो. तथागत गौतम बुद्धांनी याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली होती आणि म्हणूनच या वृक्षाला बोधिवृक्ष असेही म्हणतात. या झाडांची पाने औषधी गुणांनी युक्त आहेत. जास्त ऑक्सिजन सोडणाऱ्या झाडांमध्ये अशोक वृक्षाचाही समावेश आहे. यासोबतच वडाच्या झाडाचेसुद्धा खूप महत्त्व आहे. या झाडाला अक्षयवृक्ष म्हटले जात असते. भविष्यात नैसर्गिक ऑक्सिजनला कायम ठेवायचे असेल तर वृक्षारोपण करण्यासोबतच त्याचे संगोपन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ही वृक्ष लागवड लोकचळवळ बनेल तेव्हाच आजूबाजूचा संपूर्ण परिसर हिरवागार दिसेल. मुबलक जीवसृष्टी अनुभवायला मिळेल. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक जिवांना निसर्ग दीर्घायुष्य देत असतो.

बॉक्स

एका झाडाचेही आहे अमूल्य योगदान

एक झाड पन्नास वर्षात ३५ लाख रुपये किमतीचे वायुप्रदूषण टाळते. एक झाड १५ लाख रुपये किमतीचे ऑक्सिजन उत्पादित करते. एक झाड एक वर्षात तीन किलो कार्बन-डायऑक्साइड नाश करते. एका झाडावर १०० पक्षी घरटे बांधून राहू शकतात. त्याच्यावर त्याच्या पंचवीस पिढ्या जन्माला येतात आणि मधमाशांचे पोळे झाडावर असल्यास ती संख्या लाखांवर जाते. एक झाड आपल्या पालापाचोळाची भर टाकून जमिनीची कस वाढवते. एक झाड फळ, फूल, बिया आपल्यासाठी देतो. आतातरी वृक्षलागवड करणे आवश्यक झाली आहे. अन्यथा येणारी पिढी आपल्या पाठीवर ऑक्सिजनचे सिलिंडर लावलेली आपल्याला पहायला मिळेल. तासभर ऑक्सिजन विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो, तर आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची आज पूजा करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे झाले आहे. सगळ्यांनी झाडे लावून निसर्गावर प्रेम करणे काळाची गरज बनली आहे. कारण येणाऱ्या काळात निसर्गच आपल्याला जगविणार आहे.

कोट

आम्ही श्रावस्ती सामाजिक संस्थान रावणवाडीच्या माध्यमाने यावर्षी ५० बोधिवृक्षांची झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. जुलै महिन्यात या बोधिवृक्ष लागवडीला प्रारंभ करणार आहोत. निव्वळ झाडेच लावणार नाही तर त्याचे जतन, संगोपनाचाही संकल्प केला आहे. वृक्षांची कोरोनाकाळात खरी गरज जाणवत आहे.

अरुण गोंडाणे, अध्यक्ष, श्रावस्ती सामाजिक संस्थान, रावणवाडी