शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या धोरणांमुळे देश उभा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:17 IST

काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.पवनी येथील गांधी भवनात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, वरिष्ठ नेते जिल्हा परिषद माजी सभापती विकास राऊत, आॅल इंडिया फिशरमेन काँग्रेस सेक्रेटरी प्रकाश पचारे, असफाक भाई पटेल, जिल्हा परिषद माजी सभापती हंसा खोब्रागडे, पंचायत समिती सभापती बंडु ढेंगरे उपस्थित होते.पटोले म्हणाले, राज्यावर पूर्वी दीड लाख कोटीचे कर्ज होते, ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत. १९७२ साली जनतेने अनुभवलेल्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी भाजप प्रणित सरकारने नाकारल्या. उलट जीएसटी जुलमी कायदा आणला, उद्योगपतींना त्यांचा फायदा होत आहे. केंद्रीय अंदाजपत्रक गोंधळात मंजूर करुवून घेतला. यात मनी बील मंजूर करण्यात आले. चर्चा करू दिली नाही. पंतप्रधान पीक विमा योजना फसवी असून राज्य शासनाने सुरू केलेली एसटी बस प्रवाशांसाठी सुरू असलेल्या अपघात विमा योजनेत प्रत्येक प्रवाशांकडून एक रुपया घेतला जातो. त्यातून दर दिवशी ६७ लाख रुपये प्रवाशांकडून जमा केले जात आहे, हा प्रवाशांवर असेलेला आर्थिक भुर्दंड होय. ह पैसा सरकारला मिळत नसून तो विमा कंपनीच्या खात्यात जातो, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारतात गरिबी नाही असा अहवाल दिला आहे. उज्वला गॅस योजना खेड्यापाड्यात यशस्वी झाली नाही. उलट त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब श्रीमंतांच्या यादीत आले. यामुळे अनेक कुटुंब शासकीय योजनांना मुकणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने ११ अरब ९८ कोटी रुपये प्रसार व प्रचारावर खर्च केले. पुढील महिन्यात होत असलेली महाविद्यालयाच्या निवडणूका काँग्रेस पक्षाची युवा संघटना कामाला लागणार आहे. त्याकरिता तयारीचे निर्देश त्यांनी दिले.या मेळाव्याल नगरपरिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, तालुका शेतकी खरेदी विक्री संस्था अध्यक्ष माणिकराव ब्राह्मणकर, विजय सावरबांधे, नगरसेवक राकेश बिसने, नगरसेवक गोपाल नंदरधने, नीलकंठ टेकाम, पवनी तालुका सेवादल अध्यक्ष भगवान नवघरे, धर्मेंद्र नंदरधने, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले उपस्थित होते. संचालन तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे यांनी तर, आभार शहर अध्यक्ष मनोहर उरकुडकर यांनी मानले. बैठकीला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले