शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

काँग्रेसच्या धोरणांमुळे देश उभा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:17 IST

काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.पवनी येथील गांधी भवनात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, वरिष्ठ नेते जिल्हा परिषद माजी सभापती विकास राऊत, आॅल इंडिया फिशरमेन काँग्रेस सेक्रेटरी प्रकाश पचारे, असफाक भाई पटेल, जिल्हा परिषद माजी सभापती हंसा खोब्रागडे, पंचायत समिती सभापती बंडु ढेंगरे उपस्थित होते.पटोले म्हणाले, राज्यावर पूर्वी दीड लाख कोटीचे कर्ज होते, ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत. १९७२ साली जनतेने अनुभवलेल्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी भाजप प्रणित सरकारने नाकारल्या. उलट जीएसटी जुलमी कायदा आणला, उद्योगपतींना त्यांचा फायदा होत आहे. केंद्रीय अंदाजपत्रक गोंधळात मंजूर करुवून घेतला. यात मनी बील मंजूर करण्यात आले. चर्चा करू दिली नाही. पंतप्रधान पीक विमा योजना फसवी असून राज्य शासनाने सुरू केलेली एसटी बस प्रवाशांसाठी सुरू असलेल्या अपघात विमा योजनेत प्रत्येक प्रवाशांकडून एक रुपया घेतला जातो. त्यातून दर दिवशी ६७ लाख रुपये प्रवाशांकडून जमा केले जात आहे, हा प्रवाशांवर असेलेला आर्थिक भुर्दंड होय. ह पैसा सरकारला मिळत नसून तो विमा कंपनीच्या खात्यात जातो, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारतात गरिबी नाही असा अहवाल दिला आहे. उज्वला गॅस योजना खेड्यापाड्यात यशस्वी झाली नाही. उलट त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब श्रीमंतांच्या यादीत आले. यामुळे अनेक कुटुंब शासकीय योजनांना मुकणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने ११ अरब ९८ कोटी रुपये प्रसार व प्रचारावर खर्च केले. पुढील महिन्यात होत असलेली महाविद्यालयाच्या निवडणूका काँग्रेस पक्षाची युवा संघटना कामाला लागणार आहे. त्याकरिता तयारीचे निर्देश त्यांनी दिले.या मेळाव्याल नगरपरिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, तालुका शेतकी खरेदी विक्री संस्था अध्यक्ष माणिकराव ब्राह्मणकर, विजय सावरबांधे, नगरसेवक राकेश बिसने, नगरसेवक गोपाल नंदरधने, नीलकंठ टेकाम, पवनी तालुका सेवादल अध्यक्ष भगवान नवघरे, धर्मेंद्र नंदरधने, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले उपस्थित होते. संचालन तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे यांनी तर, आभार शहर अध्यक्ष मनोहर उरकुडकर यांनी मानले. बैठकीला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले