शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काँग्रेसच्या धोरणांमुळे देश उभा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 01:17 IST

काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणांमुळे देश उभा झाला आहे, मात्र आता सत्ता प्राप्तीसाठी ईव्हीएमचा गैरवापर होत आहे, त्याविरुद्ध राज्यात रान उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या राज्य निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.पवनी येथील गांधी भवनात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, वरिष्ठ नेते जिल्हा परिषद माजी सभापती विकास राऊत, आॅल इंडिया फिशरमेन काँग्रेस सेक्रेटरी प्रकाश पचारे, असफाक भाई पटेल, जिल्हा परिषद माजी सभापती हंसा खोब्रागडे, पंचायत समिती सभापती बंडु ढेंगरे उपस्थित होते.पटोले म्हणाले, राज्यावर पूर्वी दीड लाख कोटीचे कर्ज होते, ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत. १९७२ साली जनतेने अनुभवलेल्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी भाजप प्रणित सरकारने नाकारल्या. उलट जीएसटी जुलमी कायदा आणला, उद्योगपतींना त्यांचा फायदा होत आहे. केंद्रीय अंदाजपत्रक गोंधळात मंजूर करुवून घेतला. यात मनी बील मंजूर करण्यात आले. चर्चा करू दिली नाही. पंतप्रधान पीक विमा योजना फसवी असून राज्य शासनाने सुरू केलेली एसटी बस प्रवाशांसाठी सुरू असलेल्या अपघात विमा योजनेत प्रत्येक प्रवाशांकडून एक रुपया घेतला जातो. त्यातून दर दिवशी ६७ लाख रुपये प्रवाशांकडून जमा केले जात आहे, हा प्रवाशांवर असेलेला आर्थिक भुर्दंड होय. ह पैसा सरकारला मिळत नसून तो विमा कंपनीच्या खात्यात जातो, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारतात गरिबी नाही असा अहवाल दिला आहे. उज्वला गॅस योजना खेड्यापाड्यात यशस्वी झाली नाही. उलट त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब श्रीमंतांच्या यादीत आले. यामुळे अनेक कुटुंब शासकीय योजनांना मुकणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने ११ अरब ९८ कोटी रुपये प्रसार व प्रचारावर खर्च केले. पुढील महिन्यात होत असलेली महाविद्यालयाच्या निवडणूका काँग्रेस पक्षाची युवा संघटना कामाला लागणार आहे. त्याकरिता तयारीचे निर्देश त्यांनी दिले.या मेळाव्याल नगरपरिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, तालुका शेतकी खरेदी विक्री संस्था अध्यक्ष माणिकराव ब्राह्मणकर, विजय सावरबांधे, नगरसेवक राकेश बिसने, नगरसेवक गोपाल नंदरधने, नीलकंठ टेकाम, पवनी तालुका सेवादल अध्यक्ष भगवान नवघरे, धर्मेंद्र नंदरधने, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले उपस्थित होते. संचालन तालुकाध्यक्ष शंकरराव तेलमासरे यांनी तर, आभार शहर अध्यक्ष मनोहर उरकुडकर यांनी मानले. बैठकीला शहर व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले