शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

एक क्विंटल धानासाठी खर्च २५०० रुपये अन् हमी भाव मिळतो केवळ १८६८ रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा तुडतुड्याने उध्वस्त केले आहे. उत्पन्नापेक्षा ...

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : ७०० रुपये बोनस धान उत्पादकांना दिलासा देणार

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाच्या अवकृपेचा सामना करणाऱ्या धान उत्पादक शेतकऱ्यांना यंदा तुडतुड्याने उध्वस्त केले आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी अवस्था झाली आहे. मशागत, बियाणे, रोवणी, फवारणी, कापणी, बांधणी, मळणी यावर साधारण २२ हजार रुपये खर्च होतो. २० ते २५ क्विंटल धानाचे उत्पादक अपेक्षित असते. मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांना एकरी ७ ते १० क्विंटल धानाचा उतारा येत आहे. एक क्विंटल  धान उत्पादनासाठी सरासरी २५०० रुपये खर्च येतो. मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाही. धानाचे हमीभाव १८६८ रुपये आहे. शेतकऱ्यांना गत काही वर्षांपासून बोनस मिळत असल्याने थोडा दिलासा मिळतो. यंदाही धानाला ७०० रुपये बोनस मिळण्याची आशा आहे. जिल्ह्यात  आधारभूत धान खरेदीला प्रारंभ झाला आहे. शेतकरी धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर येत आहे. मात्र गत काही वर्षाचा अनुभव पाहता यंदाही शेतकऱ्यांना घाटाच सहन करावा लागत आहे.

बोनसची प्रतीक्षाधान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळत असल्याने कशीतरी खर्चाची तजवीज होते. यंदा ७०० रुपये बोनसच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.

उत्पादन खर्च भरमसाठगत काही दिवसात मजुरीच्या खर्चासह बियाणे,  कीटकनाशक आणि खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एकरी साधारणत: २२ हजार रुपये खर्च होत आहे. मशागतीसाठी सात हजार, बियाणे दोन हजार, कीटकनाशक व रासायनिक खतासाठी पाच हजार कापणी व बांधणीसाठी ३५००, मळणीसाठी २५०० रुपये व इतर खर्च येतो. 

कीटकनाशक किमती

गत काही वर्षांपासून सर्वसाधारण प्रतीच्या धानावर कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. यंदा तुडतुड्याने शेतकऱ्यांना उध्दवस्त केले. तुडतुडा नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना साधारणत: एकरी तीन ते पाच हजार रुपये खर्च आल्याचे सांगत आहे.

वातावरणातील बदलाने धान पीक सुरूवातीपासूनच कीडीच्या अधिन झाले. गादमाशीचा त्रास वाढल्याने नियंत्रणाचा खर्च मोठा झाला. गर्भावस्थेत धान असताना तुडतुडा आला. एकदा नव्हे पाचदा कीटकनाशकांची फवारणी करूनही उपयोग झाला नाही. गतीवर्षीपेक्षा यंदा निम्मे उत्पन्नही होते की नाही, अशी शंका आहे. - आनंदराव हटवारशेतकरी 

उत्पादन खर्च व हाती येणारे उत्पन्न यात बरीच तफावत यंदा जाणवणार आहे. खताच्या कीटकनाशकाच्या व मजुरीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तुलनेत गतवर्षीपेक्षा हमीभावात केवळ ५३ रुपयेच वाढ झाली. १८३८ रुपये हमीभाव मिळत आहे. आता धानाची शेती तोट्याची झाली असून सरकारने यावर विचार करणे गरजेचे आहे. तरच शेतकरी तरेल.- प्रशांत खागरशेतकरी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती