शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर कोरोनाचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST

तालुक्यात उन्हाळी धान शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी विविध पीके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकºयांनी उसनवार करीत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकºयांना अपेक्षित फायदा झाला नाही. पण यावर्षी भातशेती तोट्यात आल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली होती.

ठळक मुद्देलॉकडाऊनने आठवडी बाजार बंद । मजुरांअभावी भाजीपाला शेतातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या भीतीने घराबाहेर पडणे अशक्य झाले असल्याने शेतकरी वर्गसह मजूर वर्गावर आर्थिक संकट कोसळले आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व तालुक्यातील आठवडी बाजार बंद केल्यामुळे पिकवलेला भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लॉकडाउनने भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने आता पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणेच भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.तालुक्यात उन्हाळी धान शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी विविध पीके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी उसनवार करीत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा झाला नाही. पण यावर्षी भातशेती तोट्यात आल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली होती. संचारबंदी सुरू असताना घराच्या बाहेर पडणे अशक्य झाल्याने शेतावर जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात ७० टक्के शेतकऱ्यांना कोरोना बंदीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे वीज पुरवठा रात्रीच्या वेळी सुरू आहे तर दुसरीकडे शेतीची कामे लांबणीवर जात असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शेतातील उन्हाळी धान पिकाची निंदण करण्यासाठी जाणाऱ्या मजूर लोकांना आता पाच पेक्ष्या जास्त मजूर घेवून शेतावर जाता येत नाही. बी बियाणे, खते, औषधे व मजुरी महागली आहे. यावर्षी ढगाळ हवामानामुळे शेतीच्या खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली असली तरी बाजारात मागणी नसल्याने रस्त्यावर भाजीपाला फेकण्याची वेळ आल्याचे अनेकांनी सांगितले. भाजीपाला पीकावर कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव झाल्याने परदेशात जाणारा माल बंद करण्यात आला आहे. टोमॅटोचे दरही कमी झाले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व आठवडे बाजार बंद केल्याने आता हातात आलेल्या धान पिकांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. त्यामुळे आता शेतकºयावर कोरोनाचा फटका बसला आहे.शेतकऱ्याना आर्थिक फटकाशहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणासह आठवडी बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या काढणीवर आलेला भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत आहे. भाजीपाला पीक कमी वेळात होणार असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकतर संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे बंद आहे. त्यामुळे रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.