शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरोनाने हिरावले ४६६ महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST

शासनाने मंत्रालयीन स्तरावर जरी बालकांना बालसंगोपन योजनेसाठी मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय निघालेला ...

शासनाने मंत्रालयीन स्तरावर जरी बालकांना बालसंगोपन योजनेसाठी मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय निघालेला नाही. जिल्ह्यात ५०७ बालकांनी आपल्या पालकांना गमावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र कोरोनाने जीव गमावलेल्या त्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. सर्वाधिक नुकसान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे झाले आहे. ज्या बालकांची काळजी घेणारी कोणीही नाहीत अशा बालकांना शासन मदतीचा हात मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी दिली. शोधमोहीम सुरूच असून अजूनही अशा बालकांसह कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचाही शोध घेतला जात आहे.

बॉक्स

कोरोनाने ४६६ महिलांना केले निराधार

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट महाभयंकर होती. यामध्ये वर्षभरात झाले नाहीत एवढे मृत्यू एप्रिल २०२१ या महिन्यात झाले होते. त्यामुळे सर्वजणच धास्तावले होते. आता कोरोनाची करू ना रुग्णांचा आकडा कमी होऊ लागला आहे, मात्र एप्रिल महिन्यात घेतलेल्यां मध्ये जिल्ह्यातील ४६६ महिलांना निराधार केले आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे शोधमोहीम सर्वेक्षण सुरू आहे, अशा महिलांना भेटून मार्गदर्शन व शासनाची मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बॉक्स

येथे मिळेल बालसंगोपन योजनेचे अर्ज

कोरोनाच्या संसर्गाने ०१ मार्च २०२०पासून आजपर्यंत एक पालक गमावलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी बालसंगोपन योजनेचे अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे वितरित करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत कोरोनाने पालकांना गमावलेल्या या बालकांना बाल संगोपनाकरिता ११०० रुपये प्रतिमाह प्रस्तावित आहे. १० जूनपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात आई-वडील दोन्ही मृत पावलेले ६ बालके आहेत, तर एक पालक गमावलेले एकूण ५१५ बालक असून, यामध्ये आई मृत पावलेली ४६ बालके तर वडील मृत पावलेले ३६९ बालके असून, या संबंधातून माहिती संकलित करण्याचे काम अजूनही सुरूच असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी दिली.

बॉक्स

असा करा अर्ज

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे काही महिलांचा पती हिरावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४६६ महिला या विधवा झाल्या आहेत. या महिलांना जिल्हा महिला बालविकास कार्यालयातर्फे बाल संगोपनासाठी मदत मिळते. मात्र या महिलांना जिल्हा महिला बालकल्याण कार्यालयात येऊन अर्ज करावा लागणार आहे. यासोबतच लागणारी कागदपत्रे व अन्य गोष्टींबाबत कार्यालयात मार्गदर्शन केले जात आहे. पूर्वी बालसंगोपनासाठी ४२५ रुपये महिना मदत मिळत होती. आता हीच मदत ११०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे गरजू व पात्र महिलांनी शिवाजी स्टेडिअम भंडारासमोरील जिल्हा महिला बाल कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.