शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

कोरोनाने हिरावले ४६६ महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST

शासनाने मंत्रालयीन स्तरावर जरी बालकांना बालसंगोपन योजनेसाठी मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय निघालेला ...

शासनाने मंत्रालयीन स्तरावर जरी बालकांना बालसंगोपन योजनेसाठी मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय निघालेला नाही. जिल्ह्यात ५०७ बालकांनी आपल्या पालकांना गमावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र कोरोनाने जीव गमावलेल्या त्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. सर्वाधिक नुकसान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे झाले आहे. ज्या बालकांची काळजी घेणारी कोणीही नाहीत अशा बालकांना शासन मदतीचा हात मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी दिली. शोधमोहीम सुरूच असून अजूनही अशा बालकांसह कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचाही शोध घेतला जात आहे.

बॉक्स

कोरोनाने ४६६ महिलांना केले निराधार

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट महाभयंकर होती. यामध्ये वर्षभरात झाले नाहीत एवढे मृत्यू एप्रिल २०२१ या महिन्यात झाले होते. त्यामुळे सर्वजणच धास्तावले होते. आता कोरोनाची करू ना रुग्णांचा आकडा कमी होऊ लागला आहे, मात्र एप्रिल महिन्यात घेतलेल्यां मध्ये जिल्ह्यातील ४६६ महिलांना निराधार केले आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे शोधमोहीम सर्वेक्षण सुरू आहे, अशा महिलांना भेटून मार्गदर्शन व शासनाची मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बॉक्स

येथे मिळेल बालसंगोपन योजनेचे अर्ज

कोरोनाच्या संसर्गाने ०१ मार्च २०२०पासून आजपर्यंत एक पालक गमावलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी बालसंगोपन योजनेचे अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे वितरित करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत कोरोनाने पालकांना गमावलेल्या या बालकांना बाल संगोपनाकरिता ११०० रुपये प्रतिमाह प्रस्तावित आहे. १० जूनपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात आई-वडील दोन्ही मृत पावलेले ६ बालके आहेत, तर एक पालक गमावलेले एकूण ५१५ बालक असून, यामध्ये आई मृत पावलेली ४६ बालके तर वडील मृत पावलेले ३६९ बालके असून, या संबंधातून माहिती संकलित करण्याचे काम अजूनही सुरूच असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी दिली.

बॉक्स

असा करा अर्ज

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे काही महिलांचा पती हिरावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४६६ महिला या विधवा झाल्या आहेत. या महिलांना जिल्हा महिला बालविकास कार्यालयातर्फे बाल संगोपनासाठी मदत मिळते. मात्र या महिलांना जिल्हा महिला बालकल्याण कार्यालयात येऊन अर्ज करावा लागणार आहे. यासोबतच लागणारी कागदपत्रे व अन्य गोष्टींबाबत कार्यालयात मार्गदर्शन केले जात आहे. पूर्वी बालसंगोपनासाठी ४२५ रुपये महिना मदत मिळत होती. आता हीच मदत ११०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे गरजू व पात्र महिलांनी शिवाजी स्टेडिअम भंडारासमोरील जिल्हा महिला बाल कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.