शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

कोरोनाने हिरावले ४६६ महिलांच्या कपाळावरील कुंकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:24 IST

शासनाने मंत्रालयीन स्तरावर जरी बालकांना बालसंगोपन योजनेसाठी मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय निघालेला ...

शासनाने मंत्रालयीन स्तरावर जरी बालकांना बालसंगोपन योजनेसाठी मदत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप यासंदर्भात कोणताही शासन निर्णय निघालेला नाही. जिल्ह्यात ५०७ बालकांनी आपल्या पालकांना गमावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र कोरोनाने जीव गमावलेल्या त्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. सर्वाधिक नुकसान दोन्ही पालक गमावलेल्या बालकांचे झाले आहे. ज्या बालकांची काळजी घेणारी कोणीही नाहीत अशा बालकांना शासन मदतीचा हात मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी दिली. शोधमोहीम सुरूच असून अजूनही अशा बालकांसह कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांचाही शोध घेतला जात आहे.

बॉक्स

कोरोनाने ४६६ महिलांना केले निराधार

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट महाभयंकर होती. यामध्ये वर्षभरात झाले नाहीत एवढे मृत्यू एप्रिल २०२१ या महिन्यात झाले होते. त्यामुळे सर्वजणच धास्तावले होते. आता कोरोनाची करू ना रुग्णांचा आकडा कमी होऊ लागला आहे, मात्र एप्रिल महिन्यात घेतलेल्यां मध्ये जिल्ह्यातील ४६६ महिलांना निराधार केले आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातर्फे शोधमोहीम सर्वेक्षण सुरू आहे, अशा महिलांना भेटून मार्गदर्शन व शासनाची मदत देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

बॉक्स

येथे मिळेल बालसंगोपन योजनेचे अर्ज

कोरोनाच्या संसर्गाने ०१ मार्च २०२०पासून आजपर्यंत एक पालक गमावलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांसाठी बालसंगोपन योजनेचे अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय येथे वितरित करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत कोरोनाने पालकांना गमावलेल्या या बालकांना बाल संगोपनाकरिता ११०० रुपये प्रतिमाह प्रस्तावित आहे. १० जूनपर्यंत प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात आई-वडील दोन्ही मृत पावलेले ६ बालके आहेत, तर एक पालक गमावलेले एकूण ५१५ बालक असून, यामध्ये आई मृत पावलेली ४६ बालके तर वडील मृत पावलेले ३६९ बालके असून, या संबंधातून माहिती संकलित करण्याचे काम अजूनही सुरूच असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी दिली.

बॉक्स

असा करा अर्ज

जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे काही महिलांचा पती हिरावला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ४६६ महिला या विधवा झाल्या आहेत. या महिलांना जिल्हा महिला बालविकास कार्यालयातर्फे बाल संगोपनासाठी मदत मिळते. मात्र या महिलांना जिल्हा महिला बालकल्याण कार्यालयात येऊन अर्ज करावा लागणार आहे. यासोबतच लागणारी कागदपत्रे व अन्य गोष्टींबाबत कार्यालयात मार्गदर्शन केले जात आहे. पूर्वी बालसंगोपनासाठी ४२५ रुपये महिना मदत मिळत होती. आता हीच मदत ११०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे गरजू व पात्र महिलांनी शिवाजी स्टेडिअम भंडारासमोरील जिल्हा महिला बाल कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.