शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीसाठी समन्वय महत्त्वाचा

By admin | Updated: May 20, 2014 23:26 IST

गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सुरूच राहणार असल्याने तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावात मिटवीत राहावे.

भंडारा : गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सुरूच राहणार असल्याने तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावात मिटवीत राहावे. आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घ्यावी. महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी गावभेटी दौर्‍याचे वेळी तंटामुक्त गाव समित्यांना पुरेपुर मार्गदर्शन करून तंटे मिळविण्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी केले आहे. मालमत्ता आणि शरीर संबंधातील गुन्हेगारीवर आळा बसेल यादृष्टीने ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांनी चोखपणे कार्य करीत राहावे. गावपातळी वरील समितीमध्ये सर्व प्रकारचे सदस्यांचा समावेश असल्याने सर्वांनी व्यवस्थित कर्तव्य बजावल्यास मोहिमेला निश्चितच गती येऊ शकेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गावपातळीवर छोट्याछोट्या कारणावरून निर्माण होणार्‍या तंट्यांचे पर्यावसन मोठ्या तंट्यात होवू नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होवू नये कुटुंबाची समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, यादृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून समारोपचारोन आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याचे व्यवस्था निर्माण व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाने १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात अंर्तभूत होणार ७ तालुके १५ पोलीस स्टेशन व त्यामधील ५४२ ग्रामपंचायती असून सर्वच ग्रामपंचायतीनी मोहिमेत सहभाग घेतला होता. गावपातळीवर पोलीस ठाणे पातळीवर, तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापना करून गावपातळीवर समितीमध्ये समाजात ज्याचा प्रभाव आहे अशा प्रतिष्ठीत, प्रामाणिक, समजुतदार आणि निस्वार्थी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. तंटामुक्त गाव समितीमध्ये पोलीस पाटील ग्रामसेवक तलाठी व पोलीस बिट अंमलदार यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. भंडारा जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यानी मोहिम सुरू झाल्यापासून उत्कृष्ट कामगिरी केल्याने जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायती तंटामुक्त होवून भंडारा जिल्हा तंटामुक्त जिल्हा झाला आहे. जिल्ह्यात १२ कोटी १७ लक्ष ५० हजार रूपयेचे बक्षीस मिळालेले आहे. अजुनही २२ ग्रामपंचायतींना शासनाकडून पुरस्काराची रक्कम मिळावयास आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)