शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांचे आवाहन : पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक पालांदूर : समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था ...

पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांचे आवाहन : पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक

पालांदूर : समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीचे भान ठेवत सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी केले. ते पोलीस स्टेशन पालांदूर येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

या वेळी नायब तहसीलदार दोनोडे लाखनी, मंडळ निरीक्षक सोनावणे, ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, सरपंच पंकज रामटेके, तु. रा. भुसारी, माजी जि. प. सदस्य भरत खंडाईत, उद्योगपती इद्रिस लद्धानी, उपसरपंच स्वप्निल खंडाईत कवलेवाडा, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे, प्राध्यापक आनंदराव मदनगर, पोलीस पाटील रमेश कापसे, पो.पा. गुणीराम बोरकर कवडसी, माजी सरपंच गुनाबाई बेलखोडे मेंगापूर, माजी सरपंच वैशाली खंडाईत, तंटामुक्त अध्यक्ष केवळराम कापसे, सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे, रत्नाकर नागलवाडे, मंगेश येवले, त्रिरत्न बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष दिलीप बडोले, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते राघो फुल्लुके गुरुजी, एन. व्ही. साखरे गुरुजी, गजेंद्र गजभिये गुरुजी, अविनाश बडोले, जिल्हा पत्रकार संघाचे डी. एफ. कोचे, राजू आगलावे, मिलिंद हळवे, ‘सकाळ’ वृत्तपत्राचे प्रतिनिधी मुरलीधर नंदुरकर, तथा ग्रामपंचायत कवलेवाडाचे पदाधिकारी गण व त्रिरत्न बुद्ध विहार समितीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

पुढे सण-उत्सव असल्याने समाजामध्ये जातीय, राजकीय, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, प्रत्येकाने कायद्याच्या चाकोरीत राहून समाजात शांतता व सुव्यवस्था निर्माण करावी, समाज माझा मी समाजाचा, गाव माझा मी गावाचा या नात्याने प्रत्येकाने सलोख्याचे संबंध ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले.

त्याचप्रमाणे कवलेवाडा ग्रामपंचायत व त्रिरत्न बुद्ध विहार पालांदूर यांच्यात असलेला वाद चर्चेतून शांततेच्या मार्गाने सोडविण्याकरिता प्रत्येकाने चर्चेत सहभागी व्हावे.

समता सैनिक दलाचे फलक काढण्याच्या विषयातून निर्माण झालेला वाद आपसात बसून सोडविता येईल. या विषयात प्राथमिक माहिती घेतलेली आहे. त्यावर योग्य ती काय कारवाई करायची याकरिता वरिष्ठांना मार्गदर्शन मागितले आहे. तेव्हा प्राथमिक तपासणीत जे निष्पन्न झाले त्यातून एवढेच पुढे आले आहे की, त्रिरत्न बुद्ध विहारासमोरील व व्यापारी गाड्याला लागून असलेली मोकळी जागा ही सार्वजनिक आहे. ग्रामपंचायत कवलेवाडा यांची त्यावर देखरेख आहे. त्या जागेवर कुणीही अतिक्रमण अथवा मालकी गाजवू नये. ती जागा आठवडी बाजार, सामाजिक, धार्मिक व इतर कामाकरिता वापरण्याची मुभा आहे. त्यामुळे सदर विषयाला कोणतेही वादग्रस्त वळण न देता लोकशाही मार्गाने विषयाला न्याय देता येईल. तेव्हा प्रत्येकाने विषयाचे गांभीर्य समजत आपापसांत न भांडता शांततापूर्ण मार्गाने प्रत्येकाला स्वतःच्या अधिकारात राहून सहकार्य करणे अपेक्षित आहे, असे विचार सभास्थळी पोलीस निरीक्षक मनोज मडावी, नायब तहसीलदार दोनोडे यांनी मांडले.

दिलीप बडोले, डी. एफ. कोचे, भरत खंडाईत, तु. रा. भुसारी, दामाजी खंडाईत यांनीसुद्धा वादग्रस्त विषयावर आपापली मते मांडत कायद्याच्या चाकोरीतून जाण्याचे व आपापल्या अधिकारात राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले. शांतता समितीच्या बैठकीला पोलीस हवालदार कचरू शेंडे, नावेद पठाण, प्रतीक बोरकर आदींनी सहकार्य केले.