शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
4
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
6
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
7
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
8
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
9
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
10
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
11
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
12
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
13
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
14
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
15
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
16
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
17
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
18
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
19
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
20
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 

प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

भंडारा : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. काेरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आठवड्याभरात दररोज सरासरी ५५० रूग्ण ...

भंडारा : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. काेरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आठवड्याभरात दररोज सरासरी ५५० रूग्ण आढळत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची संकेत देणारी आहेत. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या परीने सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी नागरिकांनीही आपले कर्तव्य ओळखून प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्ष व खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे. रविवारी आयोिजत पत्रकार परीषदेत ते बोलत होते. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आणि नियमांचे पालन करणे हेच उपाय प्रभावी ठरू शकतात, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. उल्हास फडके उपस्थित होते.

सध्याच्या घडीला विदर्भात नागपूर नंतर भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात तपासण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर रुग्ण संख्या ही विक्रमी वाढली आहे. आठशेचा आकडा पार केल्याने आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच रुग्ण संख्या रोज वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन त्याचे विपरीत परिणाम रुग्णांना भोगावे लागू शकतात. वाढती रुग्ण संख्या ही ‘कम्युनिटी स्प्रेड’ चे संकेत असू शकतात. त्यामुळे आता प्रत्येकाला काळजी घेण्याची गरज असून प्रशासनाला सहकार्य करण्याची वेळ आली आहे.

ही रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास एका ठिकाणी प्रशासनही हतबल होण्याची शक्यता आहे. ही वेळ येऊ नये म्हणून आत्ताच नागरिकांनी सावध व्हावे. अनावश्यक आणि महत्त्वाची कामे नसतील तर घराबाहेर पडू नये. पान टपरी, चहाची दुकाने अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून कोरोना घरोघरी पोहोचण्याची शक्यता आहे.

बॉक्स

लसीकरण महत्वाचे

एकीकडे काळजी घेताना दुसरीकडे लसीकरण सुद्धा महत्त्वाचे आहे. वयाची ४५ वर्ष पूर्ण केलेल्या सर्वांनी लस टोचून घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून खाजगी रुग्णालयात पर्यंत सर्व ठिकाणी लसीकरण केंद्र शासनाने सुरू केली आहेत. मनात कोणतीही भीती न ठेवता. लस टोचून घेणे या संसर्गाची लढण्यासाठी स्वतःला तयार करावे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना लसीकरणासाठी उद्युक्त करावे. लसीकरण केंद्रावर यंत्र कसे जाता येईल, याची व्यवस्था लावून देत जास्तीत जास्त लसीकरण होईल असा प्रयत्न करावा, असेही खा.मेंढे म्हणाले.

बॉक्स

पात्र व्यक्तींनी रक्तदान करावे

तसेच दुसऱ्या लसिकरनानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नसल्याने व सध्या उन्हाळा ऋतू सुरु असल्याने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून खा.सुनील मेंढे यांनी युवा वर्ग व पात्र व्यक्तींनी स्वइच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन सुद्धा याप्रसंगी केले.