शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST

भंडारा : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. काेरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आठवड्याभरात दररोज सरासरी ५५० रूग्ण ...

भंडारा : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. काेरोना रूग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आठवड्याभरात दररोज सरासरी ५५० रूग्ण आढळत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची संकेत देणारी आहेत. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या परीने सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी नागरिकांनीही आपले कर्तव्य ओळखून प्रशासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन नगराध्यक्ष व खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे. रविवारी आयोिजत पत्रकार परीषदेत ते बोलत होते. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे आणि नियमांचे पालन करणे हेच उपाय प्रभावी ठरू शकतात, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. उल्हास फडके उपस्थित होते.

सध्याच्या घडीला विदर्भात नागपूर नंतर भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात तपासण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर रुग्ण संख्या ही विक्रमी वाढली आहे. आठशेचा आकडा पार केल्याने आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच रुग्ण संख्या रोज वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन त्याचे विपरीत परिणाम रुग्णांना भोगावे लागू शकतात. वाढती रुग्ण संख्या ही ‘कम्युनिटी स्प्रेड’ चे संकेत असू शकतात. त्यामुळे आता प्रत्येकाला काळजी घेण्याची गरज असून प्रशासनाला सहकार्य करण्याची वेळ आली आहे.

ही रुग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास एका ठिकाणी प्रशासनही हतबल होण्याची शक्यता आहे. ही वेळ येऊ नये म्हणून आत्ताच नागरिकांनी सावध व्हावे. अनावश्यक आणि महत्त्वाची कामे नसतील तर घराबाहेर पडू नये. पान टपरी, चहाची दुकाने अशा ठिकाणी होणाऱ्या गर्दीतून कोरोना घरोघरी पोहोचण्याची शक्यता आहे.

बॉक्स

लसीकरण महत्वाचे

एकीकडे काळजी घेताना दुसरीकडे लसीकरण सुद्धा महत्त्वाचे आहे. वयाची ४५ वर्ष पूर्ण केलेल्या सर्वांनी लस टोचून घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून खाजगी रुग्णालयात पर्यंत सर्व ठिकाणी लसीकरण केंद्र शासनाने सुरू केली आहेत. मनात कोणतीही भीती न ठेवता. लस टोचून घेणे या संसर्गाची लढण्यासाठी स्वतःला तयार करावे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना लसीकरणासाठी उद्युक्त करावे. लसीकरण केंद्रावर यंत्र कसे जाता येईल, याची व्यवस्था लावून देत जास्तीत जास्त लसीकरण होईल असा प्रयत्न करावा, असेही खा.मेंढे म्हणाले.

बॉक्स

पात्र व्यक्तींनी रक्तदान करावे

तसेच दुसऱ्या लसिकरनानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नसल्याने व सध्या उन्हाळा ऋतू सुरु असल्याने जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये म्हणून खा.सुनील मेंढे यांनी युवा वर्ग व पात्र व्यक्तींनी स्वइच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन सुद्धा याप्रसंगी केले.