शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

देशाच्या विकासात हातभार लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:00 IST

राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : साकोली येथे शामरावबापू कापगते जन्मशताब्दी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.शामरावबापू कापगते जन्म शताब्दी महोत्सवानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा व शामरावबापू सोबत काम केलेल्या निवडक ज्येष्ठ २० कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा रविवारला साकोली येथे पार पडला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत संघचालक रामजी हरकरे होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशिवार, नगराध्यक्ष धनंवता राऊत, माजी आमदार हेमंत पटले, डॉ. राधेश्याम अग्रवाल, मोहन अग्रवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, श्यामजी झिंगरे, दादासाहेब टिचकुले, शिवराम गिºहेपुंजे, नेपाल रंगारी, होमराज पाटील कापगते, डॉ. शंकुतला कापगते आदी उपस्थित होते.ना. हंसराज अहीर यांनी शामरावबापू यांच्या जीवनावर भर घातला. त्यांच्या शेतीविषयक समस्याची जाण, शेती विकासाचे प्रयत्न, बालपणापासून संघाचे निष्ठावान प्रथम स्वंयसेवक, संघबंदीच्या काळात कारावास, कुळकायदा विरोधी आंदोलनात सहभाग, सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी समाजात जनजागृती, समाजोन्नतीसाठी सतत प्रयत्नशील, महाराष्ट्र विधानसभेवर जनसंघाचे विधानसभेतील पहिले आमदार, आणिबाणीच्या काळात नागपूर येथे कारावास, अज्ञातशत्रू व्यक्तिमत्व, अशा अनेक कार्याची आठवण केली.ते म्हणाले, भारत देश लोकशाहीला मानणारा आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुसंकारीत चहावाला देशाचा प्रधानमंत्री बनु शकला. देशात आंतकवादी, नक्षलवादी हल्ले होत आहे. यावर आळा बसण्यासाठी जागतीक स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. देशात शांतता व सुव्यस्थेसाठी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. हेमकृष्ण कागपते यांनी केले. त्यांनी प्रतिष्ठान केलेल्या कार्याची माहिती दिली. आभार नगरसेवक अ‍ॅड.़ मनिष कागपते यांनी मानले. याप्रसंगी साकोली तालुक्यासह परजिल्ह्यातील नागरीक व शामरावबापू कागपते प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर