शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या विकासात हातभार लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 21:00 IST

राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

ठळक मुद्देहंसराज अहीर : साकोली येथे शामरावबापू कापगते जन्मशताब्दी महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राजकारणापेक्षा समाजकारण करा. राजकीय मंडळीनी राजकीय म्हणण्यापेक्षा समाजसेवक, प्रधानसेवक समजून देशाच्या विकासात हातभार लावावा, त्यासाठी संस्काराची गरज असते, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.शामरावबापू कापगते जन्म शताब्दी महोत्सवानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा व शामरावबापू सोबत काम केलेल्या निवडक ज्येष्ठ २० कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा रविवारला साकोली येथे पार पडला. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत संघचालक रामजी हरकरे होते. यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, आमदार बाळा काशिवार, नगराध्यक्ष धनंवता राऊत, माजी आमदार हेमंत पटले, डॉ. राधेश्याम अग्रवाल, मोहन अग्रवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, श्यामजी झिंगरे, दादासाहेब टिचकुले, शिवराम गिºहेपुंजे, नेपाल रंगारी, होमराज पाटील कापगते, डॉ. शंकुतला कापगते आदी उपस्थित होते.ना. हंसराज अहीर यांनी शामरावबापू यांच्या जीवनावर भर घातला. त्यांच्या शेतीविषयक समस्याची जाण, शेती विकासाचे प्रयत्न, बालपणापासून संघाचे निष्ठावान प्रथम स्वंयसेवक, संघबंदीच्या काळात कारावास, कुळकायदा विरोधी आंदोलनात सहभाग, सामाजिक कुप्रथा नष्ट करण्यासाठी समाजात जनजागृती, समाजोन्नतीसाठी सतत प्रयत्नशील, महाराष्ट्र विधानसभेवर जनसंघाचे विधानसभेतील पहिले आमदार, आणिबाणीच्या काळात नागपूर येथे कारावास, अज्ञातशत्रू व्यक्तिमत्व, अशा अनेक कार्याची आठवण केली.ते म्हणाले, भारत देश लोकशाहीला मानणारा आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे सुसंकारीत चहावाला देशाचा प्रधानमंत्री बनु शकला. देशात आंतकवादी, नक्षलवादी हल्ले होत आहे. यावर आळा बसण्यासाठी जागतीक स्तरावर प्रयत्न सुरु झाले आहे. देशात शांतता व सुव्यस्थेसाठी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. हेमकृष्ण कागपते यांनी केले. त्यांनी प्रतिष्ठान केलेल्या कार्याची माहिती दिली. आभार नगरसेवक अ‍ॅड.़ मनिष कागपते यांनी मानले. याप्रसंगी साकोली तालुक्यासह परजिल्ह्यातील नागरीक व शामरावबापू कागपते प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर