लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून शुक्रवारीही क्षणभराची उसंत न घेता पाऊस बरसत होता. या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून तलाव तुडुंब भरले आहे. आठ दिवसापुर्वी गुरूवारीच जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती. आता पुन्हा संततधार पाऊस बरसत असल्याने धान पीक धोक्यात आले आहे.जिल्ह्यात गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ९७ मिमी झाला असून येथे अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. तुमसर तालुक्यात ४५.२ मिमी, लाखांदूर ४४.५ मिमी, लाखनी ४२.८ मिमी, मोहाडी ३८.३ मिमी आणि भंडारा तालुक्यात २१.१ मिमी पावसाची नोंद झाली. १ जून ते २८ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०२४.८ मिमी पावसाची नोंद झाली असून प्रत्यक्ष पडणाऱ्या सरासरी पावसाच्या १०१ टक्के आहे.साकोली येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात गत ४८ तासापासून पाऊस सुरू आहे. या पावसाने तालुक्यातील तलाव, बोड्या तुडुंब झाल्या आहेत. साकोली येथील दोन तलाव भरले असून एकोडी मार्गावरील तलावही पूर्ण भरला आहे. गत ४८ तासापासून पाऊस सुरू असल्याने या तलावाची पाळ कमजोर झाली आहे. नगरसेवक मनिष कापगते यांनी प्रशासनाशी संपर्क साधला. उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तेढे, मुख्याधिकारी माधुरी मडावी, पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी तलावावर जावून पाहणी केली. तेथे मलबा टाकण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात या पावसाने कुठेही नुकसानीची माहिती नाही.तुमसर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासापासून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गर्रा बघेडा परिसरात १०३ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याने नाले दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी तहसील कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली. लाखनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील मानेगाव येथील बोडी ओव्हरफ्लो झाल्याने पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. संततधार पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहन आहे. तालुक्यातील पालांदूर परिसरात शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावून चुलबंद खोºयातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. पालांदूर येथे ५१.४ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपडत असून संततधार पावसाने चांगलाच धास्तावला आहे. लाखांदूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
दिवसभर पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST
जिल्ह्यात गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ९७ मिमी झाला असून येथे अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. तुमसर तालुक्यात ४५.२ मिमी, लाखांदूर ४४.५ मिमी, लाखनी ४२.८ मिमी, मोहाडी ३८.३ मिमी आणि भंडारा तालुक्यात २१.१ मिमी पावसाची नोंद झाली.
दिवसभर पावसाची संततधार
ठळक मुद्देतलाव तुडुंब, नदी-नाल्यांना पूर : गत २४ तासात ४३.४ मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत