शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जीवनात प्रेमाचा कारखाना सुरु ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:18 IST

८० टक्के लोक भूतकाळातील घटनांबद्दल विचार करून तणाव वाढवितात. १५ टक्के लोक भविष्य आणि ५ टक्के लोक फक्त वर्तमानकाळात जगतात. यामुळे मानवी जीवन तणावग्रस्त बनते.

ठळक मुद्देप्रभा मिश्रा यांचे प्रतिपादन : वरठीत तणावमुक्त जीवनावर शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : ८० टक्के लोक भूतकाळातील घटनांबद्दल विचार करून तणाव वाढवितात. १५ टक्के लोक भविष्य आणि ५ टक्के लोक फक्त वर्तमानकाळात जगतात. यामुळे मानवी जीवन तणावग्रस्त बनते. वर्तमान परिस्थितीत जगायला शिकले पाहिजे. डोक्यात नेहमी सकारात्मक विचाराचा बर्फ व वाणीत आनंद देणारे गोडवा आणि जीवनात इतरांबद्दल प्रेम आणि करुणा व्यक्त करणारा प्रेमाचा कारखाना सुरु ठेवल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल असे प्रतिपादन प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू च्या डॉ प्रभा मिश्रा यांनी केले.प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वरठी केंद्राच्या वतीने आठवडी बाजारात सुरु असलेल्या यशस्वी होण्याचे कारणे व तणावमुक्त जीवन यावर आयोजित शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्वेता येळणे , डॉ. प्रा. ज्योती पांडे, प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वरठी केंद्राच्या संचालिका ब्राम्हकुमारी उषा ताई, कामठी केंद्राच्या प्रेमलता ताई, व ललिता ताई उपस्थित होते.डॉ प्रभा मिश्रा यांनी माणसाच्या जीवनात येणाºया तणावाची कारणे आणि उपाय याचे सुंदर विवेचन केले. माणसाच्या जीवनात अभाव, प्रभाव व दबाव या तीन गोष्टी खूप महत्वाच्या असून त्यापासून जीवन वेदना देणारे ठरते, असे त्यांनी सांगितले. यासाठी कोणत्याही परिस्थितीत जीवनात अभाव असणाºया गोष्टींचा विचार करू नये, प्रभावात काम केल्यास योग्य तो न्याय देता येत नाही. दबावात काम करणे म्हंणजे मनाविरुद्ध वागणे असे होय. या तिन्ही गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी स्वच्छता व संस्कार यावर मार्गदर्शन करून भारतीय परंपरा जपण्यासाठी मुलांना संस्कार देण्याची गरज असल्याचे सांगितले. युवा पिढी सक्षम व सुशिक्षित होण्यासाठी संस्कारांची खूप जास्त प्रमाणात आवशक्यता आहे. संस्कार रुजवण्यासाठी शालेय जीवनात शिक्षण बरोबर संस्कार आणि मूल्य जोपासण्याची जाणीव त्यांना करून देण्याची काळाची गरज आहे. संचालन प्रेमलता ताई व प्रास्ताविक वरठी केंद्राच्या संचालिका व उषा ताई व आभार प्रकाशभाई यांनी मानले.