शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

जीवनात प्रेमाचा कारखाना सुरु ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:18 IST

८० टक्के लोक भूतकाळातील घटनांबद्दल विचार करून तणाव वाढवितात. १५ टक्के लोक भविष्य आणि ५ टक्के लोक फक्त वर्तमानकाळात जगतात. यामुळे मानवी जीवन तणावग्रस्त बनते.

ठळक मुद्देप्रभा मिश्रा यांचे प्रतिपादन : वरठीत तणावमुक्त जीवनावर शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : ८० टक्के लोक भूतकाळातील घटनांबद्दल विचार करून तणाव वाढवितात. १५ टक्के लोक भविष्य आणि ५ टक्के लोक फक्त वर्तमानकाळात जगतात. यामुळे मानवी जीवन तणावग्रस्त बनते. वर्तमान परिस्थितीत जगायला शिकले पाहिजे. डोक्यात नेहमी सकारात्मक विचाराचा बर्फ व वाणीत आनंद देणारे गोडवा आणि जीवनात इतरांबद्दल प्रेम आणि करुणा व्यक्त करणारा प्रेमाचा कारखाना सुरु ठेवल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल असे प्रतिपादन प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू च्या डॉ प्रभा मिश्रा यांनी केले.प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वरठी केंद्राच्या वतीने आठवडी बाजारात सुरु असलेल्या यशस्वी होण्याचे कारणे व तणावमुक्त जीवन यावर आयोजित शिबिराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्वेता येळणे , डॉ. प्रा. ज्योती पांडे, प्रजापिता ब्राह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वरठी केंद्राच्या संचालिका ब्राम्हकुमारी उषा ताई, कामठी केंद्राच्या प्रेमलता ताई, व ललिता ताई उपस्थित होते.डॉ प्रभा मिश्रा यांनी माणसाच्या जीवनात येणाºया तणावाची कारणे आणि उपाय याचे सुंदर विवेचन केले. माणसाच्या जीवनात अभाव, प्रभाव व दबाव या तीन गोष्टी खूप महत्वाच्या असून त्यापासून जीवन वेदना देणारे ठरते, असे त्यांनी सांगितले. यासाठी कोणत्याही परिस्थितीत जीवनात अभाव असणाºया गोष्टींचा विचार करू नये, प्रभावात काम केल्यास योग्य तो न्याय देता येत नाही. दबावात काम करणे म्हंणजे मनाविरुद्ध वागणे असे होय. या तिन्ही गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी स्वच्छता व संस्कार यावर मार्गदर्शन करून भारतीय परंपरा जपण्यासाठी मुलांना संस्कार देण्याची गरज असल्याचे सांगितले. युवा पिढी सक्षम व सुशिक्षित होण्यासाठी संस्कारांची खूप जास्त प्रमाणात आवशक्यता आहे. संस्कार रुजवण्यासाठी शालेय जीवनात शिक्षण बरोबर संस्कार आणि मूल्य जोपासण्याची जाणीव त्यांना करून देण्याची काळाची गरज आहे. संचालन प्रेमलता ताई व प्रास्ताविक वरठी केंद्राच्या संचालिका व उषा ताई व आभार प्रकाशभाई यांनी मानले.