शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या काठावरील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या ...

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेला जलशुद्धीकरण केंद्राची सोय नसल्याने नदी पात्रातून थेट उपसा करण्यात आलेले पाणी नागरिकांना उपलब्ध केले जात आहे. लालसर आणि गढूळ पाणी असल्याने नागरिक पिण्यासाठी याचा उपयोग करीत नाहीत. या पाण्याचा वापर आंघोळीसाठी करण्यात येत आहे. नद्यांच्या काठावरील गावे असताना शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे अनेक कुटुंब गढूळ व लालसर पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करीत आहेत. वैनगंगा नदीवर कवलेवाडा गावाच्या शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आल्याने गढूळ व दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या धरणात पाणी अडविण्यात आले आहे. दरम्यान, नदीच्या काठावरील गावातील नळ योजनांना मिनी जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्यात आले नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट या गावात निर्माण होत आहे. चुल्हाड, सुकळी नकुल, देवरी देव, गोंडीटोला, बपेरा गावात ही समस्या वाढत आहे. या गावात गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. परंतु कधी या पाण्याची चौकशी करण्यात येत नाही. याच गावांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. अडीच लाख लीटर पाणी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना भंगारात निघाली आहे. या योजनेचे संचालन योग्य रितीने करण्यात आले नाही. पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करताना यंत्रणा गंभीर झाली नाही. धरणातील पाणी नियमित विसर्ग होत नसल्याने क्षारयुक्त पाणीच नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात नागरिकांची स्थिती सधन नसल्याने फिल्टर घरी कुणी लावत नाही. यामुळे गावकरी चिंतेत आहेत. गावांत पिण्याच्या पाण्याचे संकट नसल्याची नोंद शासकीय दस्तऐवजमध्ये आहे. परंतु नळयोजनेअंतर्गत उपलब्ध होणारे पाणी प्रत्यक्षात कुणीही पिण्यासाठी वापरत नाहीत. गावातील बोअरवेल्स बंद होताच गावकरी बोंबाबोंब ठोकत आहेत. गोंडीटोला गावात सौरऊर्जेवरील पंपगृह मंजूर करण्यात आले नाहीत. या गावातील निम्म्याहून अधिक नागरिकांना नळयोजनेचे पाणी मिळत नाही. जिल्हा परिषदमध्ये पाणी पुरवठा विभागात नियोजन करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थ शासनाच्या योजनांपासून वंचित राहात आहेत.

काविळच्या रुग्णांची आयुर्वेदिक उपचाराकडे धाव

गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नद्यांच्या काठावरील गावांत काविळच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. या आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात नाहीत. गावात प्राप्त होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारासाठी धाव घेत आहेत. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना या आजाराचा गावात प्रसार झाला असल्याची पुसटही कल्पना येत नाही. आयुर्वेदिक औषध उपचाराने काविळ आजार बरा होतो, असा आत्मविश्वास नागरिकांत आहे. यामुळे शासन स्तरावर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोट

गोंडीटोला गावात नळ योजनेने नागरिकांना पाणी पुरवठा होत असले तरी वाॅर्ड क्रमांक २ आणि ३ मध्ये योजनेचे पाणी पोहोचत नाही. जिल्हा परिषद अंतर्गत सौरऊर्जेवरील नळ योजना मंजूर करण्याची गरज असून, नद्यांच्या काठावरील गावांत मिनी जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता आहे.

शीतल चिंचखेडे, वैशाली पटले, सदस्या, ग्रामपंचायत, गोंडीटोला