शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

नद्यांच्या काठावरील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:05 IST

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या ...

तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेला जलशुद्धीकरण केंद्राची सोय नसल्याने नदी पात्रातून थेट उपसा करण्यात आलेले पाणी नागरिकांना उपलब्ध केले जात आहे. लालसर आणि गढूळ पाणी असल्याने नागरिक पिण्यासाठी याचा उपयोग करीत नाहीत. या पाण्याचा वापर आंघोळीसाठी करण्यात येत आहे. नद्यांच्या काठावरील गावे असताना शुद्ध पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. यामुळे अनेक कुटुंब गढूळ व लालसर पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करीत आहेत. वैनगंगा नदीवर कवलेवाडा गावाच्या शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आल्याने गढूळ व दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या धरणात पाणी अडविण्यात आले आहे. दरम्यान, नदीच्या काठावरील गावातील नळ योजनांना मिनी जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्यात आले नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट या गावात निर्माण होत आहे. चुल्हाड, सुकळी नकुल, देवरी देव, गोंडीटोला, बपेरा गावात ही समस्या वाढत आहे. या गावात गढूळ व दूषित पाणी पुरवठा होत असल्याने अनेक आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. परंतु कधी या पाण्याची चौकशी करण्यात येत नाही. याच गावांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी नकुल प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. अडीच लाख लीटर पाणी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. परंतु ही महत्त्वाकांक्षी योजना भंगारात निघाली आहे. या योजनेचे संचालन योग्य रितीने करण्यात आले नाही. पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करताना यंत्रणा गंभीर झाली नाही. धरणातील पाणी नियमित विसर्ग होत नसल्याने क्षारयुक्त पाणीच नागरिकांना पुरवठा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात नागरिकांची स्थिती सधन नसल्याने फिल्टर घरी कुणी लावत नाही. यामुळे गावकरी चिंतेत आहेत. गावांत पिण्याच्या पाण्याचे संकट नसल्याची नोंद शासकीय दस्तऐवजमध्ये आहे. परंतु नळयोजनेअंतर्गत उपलब्ध होणारे पाणी प्रत्यक्षात कुणीही पिण्यासाठी वापरत नाहीत. गावातील बोअरवेल्स बंद होताच गावकरी बोंबाबोंब ठोकत आहेत. गोंडीटोला गावात सौरऊर्जेवरील पंपगृह मंजूर करण्यात आले नाहीत. या गावातील निम्म्याहून अधिक नागरिकांना नळयोजनेचे पाणी मिळत नाही. जिल्हा परिषदमध्ये पाणी पुरवठा विभागात नियोजन करण्यात आले नाही. यामुळे ग्रामस्थ शासनाच्या योजनांपासून वंचित राहात आहेत.

काविळच्या रुग्णांची आयुर्वेदिक उपचाराकडे धाव

गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नद्यांच्या काठावरील गावांत काविळच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. या आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात नाहीत. गावात प्राप्त होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारासाठी धाव घेत आहेत. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना या आजाराचा गावात प्रसार झाला असल्याची पुसटही कल्पना येत नाही. आयुर्वेदिक औषध उपचाराने काविळ आजार बरा होतो, असा आत्मविश्वास नागरिकांत आहे. यामुळे शासन स्तरावर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोट

गोंडीटोला गावात नळ योजनेने नागरिकांना पाणी पुरवठा होत असले तरी वाॅर्ड क्रमांक २ आणि ३ मध्ये योजनेचे पाणी पोहोचत नाही. जिल्हा परिषद अंतर्गत सौरऊर्जेवरील नळ योजना मंजूर करण्याची गरज असून, नद्यांच्या काठावरील गावांत मिनी जलशुद्धीकरण केंद्राची आवश्यकता आहे.

शीतल चिंचखेडे, वैशाली पटले, सदस्या, ग्रामपंचायत, गोंडीटोला