शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

फायनान्स कंपनीला ग्राहक मंचाची चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 5:00 AM

भंडारा जिल्ह्यातील मौजा ढोरप येथील एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतलेला युवक रूपचंद अंबादास मेश्राम याने स्वयं रोजगाराच्या हेतूने शेतीची मशागत करण्यासाठी भंडारा येथील लक्ष्मी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या महिंद्रा कंपनीच्या डिलर मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासाठी डिलर मार्फत महिंद्रा फायनान्स कंपनी कडून ४,८०,००० रुपये कर्ज घेतले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : सुशिक्षित बेरोजगाराने स्वयं रोजगाराच्या हेतूने महिंद्रा फायनान्स कंपनीकडून डिलर मार्फत घेतलेल्या कर्जाची परतफेड करून देखील बेकायदेशीरपणे ट्रॅक्टर जप्त करणाऱ्या फायनान्स कंपनीला व ट्रॅक्टर डिलरला भंडारा ग्राहक मंचाने दणका दिला आहे. कर्जापोटी जमा केलेली रक्कम व्याजासह अदा करण्याचे आदेशही मंचाने दिले आहेत.भंडारा जिल्ह्यातील मौजा ढोरप येथील एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतलेला युवक रूपचंद अंबादास मेश्राम याने स्वयं रोजगाराच्या हेतूने शेतीची मशागत करण्यासाठी भंडारा येथील लक्ष्मी अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या महिंद्रा कंपनीच्या डिलर मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासाठी डिलर मार्फत महिंद्रा फायनान्स कंपनी कडून ४,८०,००० रुपये कर्ज घेतले होते.२० सप्टेंबर २०१३ ला ट्रॅक्टर खरेदी करून देखील व वारंवार विनंती करूनही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करून देण्यात आली नाही. या दरम्यान मात्र रुपए चार लाख ४२ हजार एवढी रक्कम कर्जापोटी त्याच्याकडून वसूल करण्यात आली.एवढे असताना देखील सदर इंडस्ट्रीज व महिंद्रा फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी १३ जुलै २०१४ ला रूपचंद मेश्राम यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर बळजबरीने जप्त केला. त्यानंतर वारंवार ट्रॅक्टर ची मागणी करून देखील ट्रॅक्टर त्याला परत न मिळाल्याने त्याने अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांच्या मार्फत भंडारा जिल्हा ग्राहक न्यायालयात प्रकरण दाखल केले. नोटिस बजावण्यात आल्यावर दोन्ही कंपनीने आपल्या वकीलामार्फत लेखी उत्तर दाखल करून आक्षेप घेतला. कर्जाची परतफेड केली नाही म्हणून नोंदणी करून देण्यात आली नाही व ट्रॅक्टर रूपचंद मेश्राम यांच्याच ताब्यात आहे, असा पवित्रा घेतला. त्यामुळे तक्रारदार रूपचंद मेश्राम यांनी आर टी ओ कार्यालयात जाऊन चौकशी केली असता खरेदीच्या एक वर्ष आठ महिण्यानंतर १ जुन २०१५ ला ट्रॅक्टरची नोंदणी केल्याचे दिसून आले. तसेच तक्रारदाराने महिंद्रा फायनान्स कंपनीच्या वडधामना,नागपूर येथील यॉर्डमधील वाहनांची तपासणी केली असता त्याचा ट्रॅक्टर तिथे आढळून आला.या प्रकरणी सखोल युक्तिवाद करून राष्ट्रीय आयोगाने पारित केलेल्या न्याय निर्णयाचे दाखले देवून ७० टक्के कर्ज रक्कमेचा भरणा केल्यावर वाहन जप्त करता येत नाही. ट्रॅक्टरची नोंदणी वेळीच करून दिली नाही, त्यामुळे तक्रारदाराने कर्जापोटी भरलेली रक्कम व्याजासह परत द्यावी, अशी मागणी अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांनी केली.या प्रकरणी ग्राहक तक्रार मंच भंडाराचे अध्यक्ष न्यायाधीश भास्कर योगी व सदस्य वृषाली जागीरदार यांनी चौकशी करून व कागदपत्रासह दिलेल्या पुराव्याचे अवलोकन करून तक्रारदाराची तक्रार मंजूर केली. सदर दोन्ही कंपनीने चार लाख ४२ हजार रुपयांची रक्कम ९ टक्के व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले. तसेच मानसिक व आर्थिक नुकसान भरपाई रुपये २० हजार व प्रकरण खर्चाचे रुपए १० हजार तक्रारदार मेश्राम यांना द्यावेत, असे देखील आदेश दिले आहेत.

टॅग्स :businessव्यवसाय