शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
4
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
5
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
6
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
7
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
8
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
9
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
10
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
11
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
12
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
13
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
14
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
15
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
16
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
17
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
18
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
19
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
20
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ

न.पं.चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

सडक-अर्जुनी : नगरपंचायतला ६ वर्षांचा कालावधी झाला असूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास होऊ शकला नाही. सध्या करोडो रुपयांची ...

सडक-अर्जुनी : नगरपंचायतला ६ वर्षांचा कालावधी झाला असूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास होऊ शकला नाही. सध्या करोडो रुपयांची कामे नगरपंचायत करीत असून, कामाचा दर्जा मात्र निकृष्ट स्वरूपाचा असल्याची चर्चा गावकरी करीत असून, त्यांची तक्रारही विनोद बारसागडे यांनी मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांच्याकडे केली आहे.

शहरात १७ वाॅर्ड असून, ते वाॅर्ड नवीन लोकवस्तीचे आहेत. अशा ठिकाणी सिमेंट-काँक्रिटचे रस्ते व नाल्यांचे काम मंजूर झाले आहे. कंत्राटदारांनी लागणारे साहित्य आपल्या कार्यस्थळी टाकले आहे. ते साहित्य पाहून जाणकार नागरिक चर्चा करून लागले की, रेती आणि मातीमिश्रित आहे. गिट्टी ही पाचगावची सोडून अड्याल पहाडीची वापरण्यात येत आहे. काही ठिकाणी ४० एमएम काही ठिकाणी २० एमएम यांचेतर संयुक्तीकरण जमत नाही.

सिमेंट काँक्रिटच्या पहिल्या थरामध्ये रेती जास्त व सिमेंट अगदी कमी वापरण्यात येत आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असला तर पुढे त्या रस्त्याची मर्यादा अतिशय कमी होईल. त्याकरिता बांधकामाचा दर्जा चांगला असावा, अशी मागणी होत आहे. सिमेंट रस्ते हे मशीनद्वारे करण्यात यावेत, अशीही मागणी नागरिक करीत आहेत. नगरपंचायतमध्ये चांगले दर्जेदार काम करायचे असेल, तर काँक्रिट मशीनद्वारेच रस्ते बनिवणे गरजेचे आहे; परंतु एकही सिमेंट रस्ता मशीनद्वारे करण्यात येत नसेल, तर त्या कामाची गुणवत्ता फार काळ टिकणारी नसेल. याकडे नगरपंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.

अधिकाऱ्यांचे मौन

बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे दर्जा सुधारण्यात यावा, अशी तक्रार करूनही नगरपंचायतचे अधिकारी मौन धारण करून बसले आहेत. यामुळे गावकऱ्यांत चर्चेला उधाण आले आहे. कदाचित नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे नगरसेवकांचे वर्चस्व नाही. त्यामुळेच दर्जा खालावला असेल.