शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

न.पं.चे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

सडक-अर्जुनी : नगरपंचायतला ६ वर्षांचा कालावधी झाला असूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास होऊ शकला नाही. सध्या करोडो रुपयांची ...

सडक-अर्जुनी : नगरपंचायतला ६ वर्षांचा कालावधी झाला असूनही पाहिजे त्या प्रमाणात शहराचा विकास होऊ शकला नाही. सध्या करोडो रुपयांची कामे नगरपंचायत करीत असून, कामाचा दर्जा मात्र निकृष्ट स्वरूपाचा असल्याची चर्चा गावकरी करीत असून, त्यांची तक्रारही विनोद बारसागडे यांनी मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांच्याकडे केली आहे.

शहरात १७ वाॅर्ड असून, ते वाॅर्ड नवीन लोकवस्तीचे आहेत. अशा ठिकाणी सिमेंट-काँक्रिटचे रस्ते व नाल्यांचे काम मंजूर झाले आहे. कंत्राटदारांनी लागणारे साहित्य आपल्या कार्यस्थळी टाकले आहे. ते साहित्य पाहून जाणकार नागरिक चर्चा करून लागले की, रेती आणि मातीमिश्रित आहे. गिट्टी ही पाचगावची सोडून अड्याल पहाडीची वापरण्यात येत आहे. काही ठिकाणी ४० एमएम काही ठिकाणी २० एमएम यांचेतर संयुक्तीकरण जमत नाही.

सिमेंट काँक्रिटच्या पहिल्या थरामध्ये रेती जास्त व सिमेंट अगदी कमी वापरण्यात येत आहे. त्यामुळे सिमेंट रस्त्यांच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असला तर पुढे त्या रस्त्याची मर्यादा अतिशय कमी होईल. त्याकरिता बांधकामाचा दर्जा चांगला असावा, अशी मागणी होत आहे. सिमेंट रस्ते हे मशीनद्वारे करण्यात यावेत, अशीही मागणी नागरिक करीत आहेत. नगरपंचायतमध्ये चांगले दर्जेदार काम करायचे असेल, तर काँक्रिट मशीनद्वारेच रस्ते बनिवणे गरजेचे आहे; परंतु एकही सिमेंट रस्ता मशीनद्वारे करण्यात येत नसेल, तर त्या कामाची गुणवत्ता फार काळ टिकणारी नसेल. याकडे नगरपंचायतने लक्ष देण्याची गरज आहे.

अधिकाऱ्यांचे मौन

बांधकामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे दर्जा सुधारण्यात यावा, अशी तक्रार करूनही नगरपंचायतचे अधिकारी मौन धारण करून बसले आहेत. यामुळे गावकऱ्यांत चर्चेला उधाण आले आहे. कदाचित नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे नगरसेवकांचे वर्चस्व नाही. त्यामुळेच दर्जा खालावला असेल.