शहरं
Join us  
Trending Stories
1
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
2
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
3
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
5
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
6
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
7
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
8
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
9
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
10
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
11
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
12
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
13
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
14
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
15
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
16
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
17
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
18
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
19
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
20
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?

पुलाच्या बांधकामामुळे रहदारीचा मार्ग अडला

By admin | Updated: June 22, 2017 00:27 IST

दोन गावांना जोडण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात येते. मात्र कालावधी लोटल्यानंतरही पुलाचे काम सुरू आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल.

कोरंभी मार्गावरील पुल : काम कासवगतीने सुरू, शिवसेनेने दिला रस्ता दुरूस्तीचा अल्टिमेटम, अनेक नागरिक जखमीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन गावांना जोडण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात येते. मात्र कालावधी लोटल्यानंतरही पुलाचे काम सुरू आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र ही परिस्थिती आहे. गणेशपूर-कोरंभी मार्गावरील वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची सध्या पडझड सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.१८ महिने कालावधीत या नदीपात्रात पुलाची उभारणी करणे गरजेचे होते. गोसीखुर्द पुनर्वसन कार्यालयाच्या माध्यमातून या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. याचे कंत्राट नागपूर येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. सुमारे तीन कोटी रूपये खर्चातून या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही पुलाची अपूर्णावस्था असल्याचा आरोप शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी केला आहे.गणेशपूर येथून पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी, खैरी, कवडसी, सावली, पिपरी आदी गावांना जोडणाऱ्या या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. गणेशपूर-कोरंभी मार्गावर जुना पुल असून तो पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्यामुळे येथील वाहतूक पुर्णपणे ठप्प राहते. त्यामुळे या मार्गावर नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. उन्हाळ्यातील दिवसात या पुलाच्या बांधकामाचे काम पुर्णत्वास नेण्याऐवजी ते बंद ठेवण्यात आले होते आणि आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सदर कंत्राटदाराने येथील काम पुर्ववत सुरू केले आहे. जुन्या पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कंत्राटदाराने येथे मातीचे भरण करून पर्यायी मार्ग सुरू केला आहे. यावरून परिसरातील नागरिक दळणवळण करीत आहेत. मात्र पावसाचे दिवस असल्याने येथून जाणे जिकरीचे होत आहे. येथून जाताना अनेक जण जमिनीवर येथून मार्गक्रमण करताना दुखापतग्रस्त झाले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे. या कामाची पाहणी करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची असतानाही या अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. वारंवार तक्रारी करूनही गोसीखुर्द पुनर्वसन विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना होणारा त्रास व सुरू असलेले संतगतीचे काम हे त्वरीत बंद करावे, असा निर्वानीचा इशारा जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी कंत्राटदाराला दिला आहे. २४ तासाच्या आत कंत्राटदारांनी नागरिकांना योग्य पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.अफरातफर करण्याचा प्रकारनिर्माणाधीन पुलाच्या कामामुळे जुन्या पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी किंवा नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी यासाठी अंदाजपत्रकात पर्यायी मार्गाची तरतूद केली आहे. यासाठी खडीकरण करून नागरिकांना सुविधा द्यावी, असे असताना यावर होणाऱ्या खर्चाची अफरातफर करण्याच्या दृष्टीने कंत्राटदाराने येथे केवळ माती काम केले. नागरिकांना दळणवळणाची सुविधा व्हावी यासाठी कंत्राटदाराने पर्यायी मार्ग तयार करावा. कामात होत असलेली दिरंगाई खपवून घेणार नाही. २४ तासाच्या आत सुविधा न दिल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल.- जया सोनकुसरे, जि.प. सदस्य भंडारा.पूलाचे काम पूर्ण झत्तलेले आहे. त्याला लागून पर्यायी रस्ता व नागरीकांची असूविधा होऊ नये यासाठी काही कामे करण्यात येत आहे. पाऊस पडल्याने पाणी साचलेले असल्याने चिखल झाले आहे. पावसामुळे व्यत्यय आला आहे. सकाळपर्यंत काम पूर्ण होईल.- टी. एस. खडके, कार्यकारी अभियंता.