शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पुलाच्या बांधकामामुळे रहदारीचा मार्ग अडला

By admin | Updated: June 22, 2017 00:27 IST

दोन गावांना जोडण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात येते. मात्र कालावधी लोटल्यानंतरही पुलाचे काम सुरू आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल.

कोरंभी मार्गावरील पुल : काम कासवगतीने सुरू, शिवसेनेने दिला रस्ता दुरूस्तीचा अल्टिमेटम, अनेक नागरिक जखमीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दोन गावांना जोडण्यासाठी पुलाची निर्मिती करण्यात येते. मात्र कालावधी लोटल्यानंतरही पुलाचे काम सुरू आहे, असे म्हटल्यास आश्चर्य वाटेल. मात्र ही परिस्थिती आहे. गणेशपूर-कोरंभी मार्गावरील वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने येथून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची सध्या पडझड सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.१८ महिने कालावधीत या नदीपात्रात पुलाची उभारणी करणे गरजेचे होते. गोसीखुर्द पुनर्वसन कार्यालयाच्या माध्यमातून या पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. याचे कंत्राट नागपूर येथील एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. सुमारे तीन कोटी रूपये खर्चातून या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र तीन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही पुलाची अपूर्णावस्था असल्याचा आरोप शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी केला आहे.गणेशपूर येथून पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी, खैरी, कवडसी, सावली, पिपरी आदी गावांना जोडणाऱ्या या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. गणेशपूर-कोरंभी मार्गावर जुना पुल असून तो पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्यामुळे येथील वाहतूक पुर्णपणे ठप्प राहते. त्यामुळे या मार्गावर नवीन पुलाची निर्मिती करण्यात येत आहे. उन्हाळ्यातील दिवसात या पुलाच्या बांधकामाचे काम पुर्णत्वास नेण्याऐवजी ते बंद ठेवण्यात आले होते आणि आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सदर कंत्राटदाराने येथील काम पुर्ववत सुरू केले आहे. जुन्या पुलावरून मार्गक्रमण करण्यासाठी नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून कंत्राटदाराने येथे मातीचे भरण करून पर्यायी मार्ग सुरू केला आहे. यावरून परिसरातील नागरिक दळणवळण करीत आहेत. मात्र पावसाचे दिवस असल्याने येथून जाणे जिकरीचे होत आहे. येथून जाताना अनेक जण जमिनीवर येथून मार्गक्रमण करताना दुखापतग्रस्त झाले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे. या कामाची पाहणी करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांची असतानाही या अधिकाऱ्यांनी या कामाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. वारंवार तक्रारी करूनही गोसीखुर्द पुनर्वसन विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना होणारा त्रास व सुरू असलेले संतगतीचे काम हे त्वरीत बंद करावे, असा निर्वानीचा इशारा जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी कंत्राटदाराला दिला आहे. २४ तासाच्या आत कंत्राटदारांनी नागरिकांना योग्य पर्यायी रस्ता तयार करून द्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.अफरातफर करण्याचा प्रकारनिर्माणाधीन पुलाच्या कामामुळे जुन्या पुलावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी किंवा नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी यासाठी अंदाजपत्रकात पर्यायी मार्गाची तरतूद केली आहे. यासाठी खडीकरण करून नागरिकांना सुविधा द्यावी, असे असताना यावर होणाऱ्या खर्चाची अफरातफर करण्याच्या दृष्टीने कंत्राटदाराने येथे केवळ माती काम केले. नागरिकांना दळणवळणाची सुविधा व्हावी यासाठी कंत्राटदाराने पर्यायी मार्ग तयार करावा. कामात होत असलेली दिरंगाई खपवून घेणार नाही. २४ तासाच्या आत सुविधा न दिल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल.- जया सोनकुसरे, जि.प. सदस्य भंडारा.पूलाचे काम पूर्ण झत्तलेले आहे. त्याला लागून पर्यायी रस्ता व नागरीकांची असूविधा होऊ नये यासाठी काही कामे करण्यात येत आहे. पाऊस पडल्याने पाणी साचलेले असल्याने चिखल झाले आहे. पावसामुळे व्यत्यय आला आहे. सकाळपर्यंत काम पूर्ण होईल.- टी. एस. खडके, कार्यकारी अभियंता.