शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

अनुदानाअभावी रखडले ३२५ घरकुलांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:26 IST

शासनाने घरकुलांची योजना राबविली. मात्र या योजनांचा निधी मार्च २०१६ मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत परत ....

शासनाने परत मागितला निधी : मोहाडी तालुक्यातील लाभार्थी प्रतीक्षेतयुवराज गोमासे मोहाडी शासनाने घरकुलांची योजना राबविली. मात्र या योजनांचा निधी मार्च २०१६ मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत परत मागितल्याने मोहाडी तालुक्यातील ३२५ घरकुलांचे बांधकाम रखडले आहे.अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी इंदिरा आवास योजना, राजीव गांधी आवास योजना, अनुसूचित जाती - जमातीसाठी रमाई व शबरी घरकुलांची योजना राबविली जात आहे. गरीबांना या योजनांमुळे हक्काचा निवारा प्राप्त होत आहे. मात्र मार्च २०१६ पासून सदर योजनेचा निधी मिळाला नसल्याने घरकुलांचे बांधकाम प्रभावित झाली आहेत. शासनाने सदर योजनांचा निधी आॅनलाईन पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात वळता करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरून परत मागितल्याचे अधिकारी स्तरावरून सांगितले जात आहे. परंतु वापस मागितलेला निधी अजूनपर्यंत परत न पाठविल्याने घरकुलांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत रखडले आहेत. निधी अभावी घरकुलांचे बांधकाम प्रभावित झाली असून लाभार्थी पैशासाठी पंचायत समित्यांच्या चकरा काढताना दिसत आहेत. मोहाडी तालुक्यात सन २०१४ मध्ये इंदिरा आवास योजनेअंतर्गत ३७८ घरकुलांचा लक्षांक मिळाला होता. त्यापैकी ३०२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालीत. ७६ घरकुलांचे बांधकाम निधीअभावी अपूर्ण राहिली आहेत. रमाई योजनेअंतर्गत सन २०११-१२ ते २०१४-१५ पर्यंत ८०२ घरकुलांचा लक्षांक मिळाला होता. त्यापैकी ५५३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालीत. निधीअभावी २४९ घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. सदर योजनांना १ लाखाचे अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. तीन टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांना पैसा दिला जातो. पहिला टप्पा ३७ हजार ५०० रुपयांचा दिला जातो. त्यानंतर दुसरा तर तिसरा टप्प्याचा निधी घरकुल व शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चेकद्वारा दिला जातो.शासनाचे पत्र मिळाल्याने ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील घरकुलाचा निधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला मार्च २०१६ मध्ये परत पाठविण्यात आला. आॅनलाईन पद्धतीने पेमेंट करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाभार्थ्यांना पंचायत समितीला येण्याची गरज भासणार नाही. दलाली व पैसे दिल्याशिवाय कामे होत नाही. अशा तक्रारी बंद होतील. कामात पारदर्शकता येऊन लाभार्थ्यांना लाभ मिळेल. - पंकज भोयर, खंडविकास अधिकारी, मोहाडी.सध्या बांधकामाची वेळ आहे. या कालावधीत पैसा मिळाल्यास लाभार्थ्यांची जास्तीत जास्त घरकुले तयार होऊ शकतात. गरीबांना त्यांच्या हक्काचा निवारा उपलब्ध होवू शकतो.- सुरेश मस्के, शाखा अभियंता मोहाडी