शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

काँग्रेस कार्यकारिणीत भंडाऱ्याला झुकतेमाप

By admin | Updated: April 17, 2016 00:21 IST

प्रदेश काँगे्रेस कमिटीच्या जम्बो कार्यकारिणीत जिल्ह्याला झुकतेमाप मिळाले असून सहा जणांची वर्णी लागली आहे.

भंडारा : प्रदेश काँगे्रेस कमिटीच्या जम्बो कार्यकारिणीत जिल्ह्याला झुकतेमाप मिळाले असून सहा जणांची वर्णी लागली आहे. परंतु यात काही घटकांना डावलण्यात आल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर माणिकराव ठाकरे यांची उचलबांगडी झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे संघटनेची सूत्रे आली. त्यानंतर वर्षभर कामे सुरू होती. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिक्कामोर्तबानंतर कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रभारी जिल्हाध्यक्ष जिया पटेल यांची महासचिवपदी तर प्रमिला कुटे व प्रमोद तितीरमारे यांची सचिवपदी तर मार्गदर्शक म्हणून माजी खासदार केशवराव पारधी व माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्याला अत्यल्प स्थान मिळत होते. यावेळी मात्र झुकतेमाप देण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)वाघाये बनणार जिल्हाध्यक्ष !जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपंचायतीमध्ये काँग्रेसच्या विजयाचे श्रेय माजी आमदार सेवक वाघाये यांना जाते. जिल्हाध्यक्षपदी त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी जिल्हा महासचिव प्रेमसागर गणवीर यांच्याही नावाची चर्चा आहे. परंतु वाघाये यांना जिल्हाध्यक्षपद देऊ करण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे त्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नसल्याचेही सूत्राने सांगितले.