शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम विरोधात काँग्रेस आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:25 IST

काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणामुळे देश उभा झाला आहे. राज्यावर पूर्वी दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब, शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देनाना पटोले : तुमसर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणामुळे देश उभा झाला आहे. राज्यावर पूर्वी दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब, शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत. अपघात विमा योजनेत प्रवाशांकडून प्रत्येकी एक रूपया घेण्यात येत असून दररोज ६७ लक्ष प्रवाशांकडून तो जमा केला जात आहे. स्वामीनाथन आयोग लागू न करण्याचा निर्णय केंद्र शासनाने केली आहे. ईव्हीएम विरूद्ध राज्यात राण उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.तुमसर येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.१९७२ साली दुष्काळ पडला होता. तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्याचा सामना केला होता. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी भाजप प्रणीत सरकारने नाकारल्या. उलट जीएसटी जुलमी कायदा आणला, उद्योगपतींना त्याचा फायदा होत आहे. केंद्रीय अंदाजपत्रक गोंधळात मंजूर करवून घेतला. यात मनी बिल मंजूर करण्यात आले. चर्चा करू दिली नाही. पंतप्रधान फसल विमा योजना फसवी असून राज्य सरकारने सुरू केलेली बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेतून दरदिवशी ६७ लाख रूपये एसटी प्रवाशांकडून जमा केले जात आहे.जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारतात गरीबी नाही, असा अहवाल दिला आहे. उज्वला गॅस योजना खेड्यापाड्यात यशस्वी झाली नाही. उलट त्यामुळे गरीब श्रीमंताच्या यादीत आले. मोदी सरकारने ११ अरब ९८ कोटी रूपये प्रसार व प्रचारावर खर्च केले. पुढील महिन्यात होत असलेली कॉलेजच्या निवडणूका काँग्रेस पक्षाची युवा संघटना लढणार आहे. त्याकरिता तयारीचे निर्देश माजी खासदार नाना पटोले यांनी दिले.याप्रसंगी नाना पटोले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. प्रदेश महिला महासचिव कुंदा वैद्य तथा स्थानिक महिला काँग्रेस, सेवादल कार्यकर्त्यांची नियुक्तीपत्र नाना पटोले यांनी दिले.व्यासपीठावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अरविंद कारेमोरे, नारायणराव तितिरमारे, जि.प. माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, शहराध्यक्ष अमरनाथ रगडे, युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे, काँगे्रस सेवादलचे जिल्हाध्यक्ष विनोद भगत, के.के. पंचबुद्धे, तालुकाध्यक्ष शंकर राऊत, निरज गौर, कान्हा बावनकर, प्रफुल्ल बिसने, शुभम गभने, चैनलाल मसरके, विपीन कुंभारे, कमलाकर निखाडे, खुशाल पुष्पतोडे, स्रेहल रोडगे, भोले, कांबळे, अमीत लांजेवार. संचालन व आभार नगरसेवक बाळा ठाकूर यांनी मानले. बैठकीला शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चमकोगिरी करणाऱ्यांना संधी नाहीकाँग्रेस पक्षात केवळ चमकोगीरी करणाऱ्यांना किंमत दिली जाणार नाही. संघटनेचे काम, सर्वसामान्यांची कामे घेवून रस्त्यावर उतरण्याचा सल्ला नाना पटोले यांनी दिला. कामे करणाºयांनाच संधी मिळेल असे त्यांनी सांगितले. आठ दिवसात विविध विषयावर आंदोलन स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.