शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

ऐंशीनंतरही ज्येष्ठांचा आत्मविश्वास; २८७ वृद्धांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यात ८० वर्षांवरील वृद्धांनाही कोरोनाची लागण झाली. पहिल्या लाटेत ११७ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या लाटेत २०२ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. यावेळी २१ वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८० वर्षांवरील एकूण ३२ वृद्धांचा मृत्यू झाल्या. परंतु अन्य २८७  वयोवृद्धांनी जगण्याची उमेद सोडली नाही.

ठळक मुद्देजगण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची : इतरांनाही दिली प्रेरणा

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले, मात्र जगण्याची इच्छाशक्ती व आत्मविश्वास दांडगा करीत जिल्ह्यातील २८७ वृद्धांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. इतरांनाही याबाबत ते प्रेरणा देत आहेत.भंडारा जिल्ह्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला. दुसऱ्या लाटेत एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यात ८० वर्षांवरील वृद्धांनाही कोरोनाची लागण झाली. पहिल्या लाटेत ११७ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या लाटेत २०२ वृद्ध पॉझिटिव्ह आढळले. यावेळी २१ वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत ८० वर्षांवरील एकूण ३२ वृद्धांचा मृत्यू झाल्या. परंतु अन्य २८७  वयोवृद्धांनी जगण्याची उमेद सोडली नाही. प्रचंड इच्छाशक्ती व दांडगा आत्मविश्वास जोपासत त्यांनी कोरोनाला हरविले. ६० ते ७० या वयोगटातील ३०६ वयोवृद्ध दुसरा लाटेत मृत्युमुखी पडले तसेच ७१ ते ७९ या वयोगटातील १२२ ज्येष्ठ कोरोनामुळे मृत पावले आहेत. जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक झाल्यानंतरही वृध्दांनी विशेष काळजी घेतल्याचे पाॅझिटिव्ह हाेण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले.

आम्हाला कुणीच हरवू शकत नाही

मनुष्याने एकदा मनात आत्मविश्वास निर्माण केला व जिंकण्याची जिद्द सोडली नाही तर तो शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो. कोरोनाच्या बाबतीतही हेच झाले.  मी हिंमत हारली नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. आप्तस्वकीय यांच्याशी बोलत होतो, नातवंडांची हालचाल विचारत होतो. अशात मन गमत गेले.  कोरोनावर  आपण हमखासपणे मात करू शकतो.- नारायण खेडीकर, एकोडी, ता. साकोली

दोन महिन्यांपूर्वी मला कोरोना झाला होता. मात्र मी हिंमत सोडली नाही. आरोग्य विभागामार्फत मिळालेली औषधे नियमित वेळेत सेवन केली. कोरोना ब्लॉकमध्ये असतानाही काही अस्वस्थ वाटायचे. मात्र मनाने कधीही खचून गेलो नाही. १४ दिवसांनंतर सुटी झाल्यावर एक वेगळा अनुभव मी प्राप्त केला. माणसाने कधीही जगण्याची उमेद सोडू नये.- बाबुराव वासनिक, ज्येष्ठ नागरिक, भंडारा

४० ते ६० या वयोगटात सर्वाधिक मृत्यू

पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भंडारा जिल्ह्यासाठी अत्यंत घातक ठरली. ४० ते ६० या वयोगटातील नागरिक सर्वाधिक मृत्युमुखी पडले. ४० ते ५०  या वयोगटातील १७५ व्यक्ती दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे मृत पावले तसेच ५१ ते ६० या वयोगटातील ३०४ व्यक्ती कोरोनाच्या लढाईत हारल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या