शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ १४१ कामे पूर्ण

By admin | Updated: May 5, 2016 00:54 IST

जिल्ह्यात २६३ गावामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून टंचाई निवारणार्थ ४१६ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या.

१०८ कामे प्रगतिपथावर : टंचाईग्रस्त ५७ गावांना मिळाला दिलासाभंडारा : जिल्ह्यात २६३ गावामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून टंचाई निवारणार्थ ४१६ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. त्यापैकी ५७ गावातील १४१ कामे पूर्ण झाली असून या गावांना पाणी टंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २६३ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने वर्तविली होती. त्यानुसार प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायतीकडून तत्काळ उपाययोजनांची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार ४१६ उपाययोजना प्रस्तावित करुन तातडीच्या २५५ कामांना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी तत्काळ मंजुरी दिली. यामध्ये १४८ नवीन विंधन विहीरी, ३१ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १५७ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, ८० विहिरीतील गाळ काढणे असे ४१६ कामे प्रस्तावित होते. त्यापैकी विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीच्या १५७ कामांना तात्काळ मंजुरी देवून त्यापैकी १२४ कामे पूर्ण झाली आहेत.१४८ विंधन विहीरीपैकी ८५ कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी १७ कामे पूर्ण झाली आहेत.शिवाय ४९ विंधन विहीरी इतर योजनामधून मंजूर केल्या असून त्यापैकी ४० कामे पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती पैकी १४ कामे पूर्ण झाली आहेत. यातून टंचाईग्रस्त ५७ गावांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित ८१ गावातील १०८ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून येत्या आठवडयात ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.जिल्ह्यात ६०५७ हातपंप कार्यरत आहेत. याशिवाय ९२ विंधन विहिरीवर आधारीत विद्युत पंपावर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हातपंप, विद्युत पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा परिषद मध्ये उपअभियंता यांचे कार्यालय आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर खंड विकास अधिकारी यांच्या अधिनस्त ट्रायसेम यांत्रिकी हातपंप कर्मचाऱ्यांचे दुरुस्तीपथक आहे. (नगर प्रतिनिधी)