शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

पाणीटंचाई निवारणार्थ १४१ कामे पूर्ण

By admin | Updated: May 5, 2016 00:54 IST

जिल्ह्यात २६३ गावामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून टंचाई निवारणार्थ ४१६ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या.

१०८ कामे प्रगतिपथावर : टंचाईग्रस्त ५७ गावांना मिळाला दिलासाभंडारा : जिल्ह्यात २६३ गावामध्ये पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून टंचाई निवारणार्थ ४१६ उपाययोजना प्रस्तावित केल्या होत्या. त्यापैकी ५७ गावातील १४१ कामे पूर्ण झाली असून या गावांना पाणी टंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात २६३ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने वर्तविली होती. त्यानुसार प्रशासनाकडून संबंधित ग्रामपंचायतीकडून तत्काळ उपाययोजनांची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार ४१६ उपाययोजना प्रस्तावित करुन तातडीच्या २५५ कामांना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी तत्काळ मंजुरी दिली. यामध्ये १४८ नवीन विंधन विहीरी, ३१ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, १५७ विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती, ८० विहिरीतील गाळ काढणे असे ४१६ कामे प्रस्तावित होते. त्यापैकी विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीच्या १५७ कामांना तात्काळ मंजुरी देवून त्यापैकी १२४ कामे पूर्ण झाली आहेत.१४८ विंधन विहीरीपैकी ८५ कामांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी १७ कामे पूर्ण झाली आहेत.शिवाय ४९ विंधन विहीरी इतर योजनामधून मंजूर केल्या असून त्यापैकी ४० कामे पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती पैकी १४ कामे पूर्ण झाली आहेत. यातून टंचाईग्रस्त ५७ गावांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित ८१ गावातील १०८ उपाययोजनांची कामे प्रगतीपथावर असून येत्या आठवडयात ही कामे पूर्ण केली जाणार आहेत.जिल्ह्यात ६०५७ हातपंप कार्यरत आहेत. याशिवाय ९२ विंधन विहिरीवर आधारीत विद्युत पंपावर पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हातपंप, विद्युत पंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा परिषद मध्ये उपअभियंता यांचे कार्यालय आहे. तसेच पंचायत समिती स्तरावर खंड विकास अधिकारी यांच्या अधिनस्त ट्रायसेम यांत्रिकी हातपंप कर्मचाऱ्यांचे दुरुस्तीपथक आहे. (नगर प्रतिनिधी)