शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

भेल प्रकल्पाचे काम लवकरच पूर्णत्वास नेणार

By admin | Updated: January 4, 2016 00:30 IST

तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता प्रयत्न सुरु असून लवकरच हा प्रकल्प सुरु होण्याची ....

पत्रपरिषद : नाना पटोले यांची माहिती, २ हजार ७०० कोटी रुपयांची मान्यतासाकोली : तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता प्रयत्न सुरु असून लवकरच हा प्रकल्प सुरु होण्याची आशा खासदार नाना पटोले यांनी साकोली येथे पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केली. चर्चेदरम्यान पटोले यांनी अनेक विषयावर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.भेल प्रकल्पाबाबद बोलताना पटोले म्हणाले, भेल बोर्डाच्या बैठकीत २ हजार ७०० कोटी रुपयांना मान्यता घेण्यात आली असून कॅबिनेटची संमती मिळताच काम सुरु होईल. याबाबद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रिय उर्जामंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच मान्यता मिळणार असल्याचे सांगितले. सौर उर्जाचे साहित्य सध्या विदेशातून विशेषत: चीनमधून आयात करण्यात येत आहे. यावर सबसीडीसाठी १ हजार ७०० कोटी रुपयांचा भुर्दंड देशाच्या तिजोरीवर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.शेतकरी आत्महत्या व दुष्काळाबाबद बोलताना ते म्हणाले, तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात २०११ ते २०१४ पर्यंत सतत दुष्काळी स्थिती असतांना महाराष्ट्राला चार वर्षात केवळ २ हजार ७०० कोटी रुपये मिळाले. मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रात येताच मागील वर्षी १,९२० कोटी व यावर्षी ४ हजार कोटी एवढी रक्कम केंद्र शासनाने राज्याला दिली आहे. परंतु सततच्या दुष्काळी परिस्थितीशी तोंड देत असतानाही विरोधी पक्ष सहकार्य करण्याऐवजी राजकारण करीत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोध करण्याऐवजी सहाकर्य करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनाला आकस्मिक निधी म्हणून सुमारे ५० कोटी रुपयांची तरतूद असते. परंतु आमच्या प्रयत्नामुळे यावर्षी ५५० कोटी रुपये आकस्मिक निधी मिळाल्याचेही पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक गावे यावर्षी दुष्काळग्रस्त असून त्यासाठी ४,१०० कोटी रुपयांची मदत केंद्राकडून मागण्यात आली होती. केंद्राने या निधीत कोणतीही कपात न करता पुर्ण निधी दिला. मागणी केली तेव्हा पूर्ण निधी देण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना असल्याचेही पटोले यांनी सांगितले. परिसरातील अभयारण्यामागच्या गावांना अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेकडे विचारले असता ते म्हणाले, वनविभाग अतिरेक करु शकणार नाही. यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. पूर्वी जंगलाच्या काही आरक्षित भागात गुरांचा चारा व जंगलावर आधारित दैनंदिन गरजा भागविल्या जात असत. आता वनविभागाने असा आरक्षीत क्षेत्रात अतिक्रमण करुन विस्तार हक्काची जागा रेकार्डला दाखविली जाते.लाखनी, साकोली व सौंदड येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यासाठी या तीन ठिकाणी उड्डाणपुल बांधकामासाठी चालविलेल्या प्रयत्नाना यश येऊन ९०० कोटी रुपयांची तरतुद केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली असून २३ जानेवारीला उड्डाण पुलाचे भूमिपूजन होणार असल्याचेही खा. पटोले यांनी सांगितले. यावेळी आ. बाळा काशीवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)