शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

भेल प्रकल्पाचे काम लवकरच पूर्णत्वास नेणार

By admin | Updated: January 4, 2016 00:30 IST

तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता प्रयत्न सुरु असून लवकरच हा प्रकल्प सुरु होण्याची ....

पत्रपरिषद : नाना पटोले यांची माहिती, २ हजार ७०० कोटी रुपयांची मान्यतासाकोली : तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता प्रयत्न सुरु असून लवकरच हा प्रकल्प सुरु होण्याची आशा खासदार नाना पटोले यांनी साकोली येथे पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केली. चर्चेदरम्यान पटोले यांनी अनेक विषयावर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.भेल प्रकल्पाबाबद बोलताना पटोले म्हणाले, भेल बोर्डाच्या बैठकीत २ हजार ७०० कोटी रुपयांना मान्यता घेण्यात आली असून कॅबिनेटची संमती मिळताच काम सुरु होईल. याबाबद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रिय उर्जामंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच मान्यता मिळणार असल्याचे सांगितले. सौर उर्जाचे साहित्य सध्या विदेशातून विशेषत: चीनमधून आयात करण्यात येत आहे. यावर सबसीडीसाठी १ हजार ७०० कोटी रुपयांचा भुर्दंड देशाच्या तिजोरीवर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.शेतकरी आत्महत्या व दुष्काळाबाबद बोलताना ते म्हणाले, तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात २०११ ते २०१४ पर्यंत सतत दुष्काळी स्थिती असतांना महाराष्ट्राला चार वर्षात केवळ २ हजार ७०० कोटी रुपये मिळाले. मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रात येताच मागील वर्षी १,९२० कोटी व यावर्षी ४ हजार कोटी एवढी रक्कम केंद्र शासनाने राज्याला दिली आहे. परंतु सततच्या दुष्काळी परिस्थितीशी तोंड देत असतानाही विरोधी पक्ष सहकार्य करण्याऐवजी राजकारण करीत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोध करण्याऐवजी सहाकर्य करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून राज्य शासनाला आकस्मिक निधी म्हणून सुमारे ५० कोटी रुपयांची तरतूद असते. परंतु आमच्या प्रयत्नामुळे यावर्षी ५५० कोटी रुपये आकस्मिक निधी मिळाल्याचेही पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्रातील अनेक गावे यावर्षी दुष्काळग्रस्त असून त्यासाठी ४,१०० कोटी रुपयांची मदत केंद्राकडून मागण्यात आली होती. केंद्राने या निधीत कोणतीही कपात न करता पुर्ण निधी दिला. मागणी केली तेव्हा पूर्ण निधी देण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना असल्याचेही पटोले यांनी सांगितले. परिसरातील अभयारण्यामागच्या गावांना अडचणी निर्माण होण्याच्या शक्यतेकडे विचारले असता ते म्हणाले, वनविभाग अतिरेक करु शकणार नाही. यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. पूर्वी जंगलाच्या काही आरक्षित भागात गुरांचा चारा व जंगलावर आधारित दैनंदिन गरजा भागविल्या जात असत. आता वनविभागाने असा आरक्षीत क्षेत्रात अतिक्रमण करुन विस्तार हक्काची जागा रेकार्डला दाखविली जाते.लाखनी, साकोली व सौंदड येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यासाठी या तीन ठिकाणी उड्डाणपुल बांधकामासाठी चालविलेल्या प्रयत्नाना यश येऊन ९०० कोटी रुपयांची तरतुद केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली असून २३ जानेवारीला उड्डाण पुलाचे भूमिपूजन होणार असल्याचेही खा. पटोले यांनी सांगितले. यावेळी आ. बाळा काशीवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)