शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बावनथडी प्रकल्पाचे काम कालबद्ध वेळेत पूर्ण करा

By admin | Updated: September 13, 2015 00:34 IST

राज्यातील खोळंबलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाच्या निरिक्षणाकरिता अंदाज समितीला पाठविले.

समितीने घेतला आढावा : बावनथडी संघर्ष समितीने अंदाज समितीला सोपविले निवेदनतुमसर : राज्यातील खोळंबलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देऊन आवश्यक निधीची उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्पाच्या निरिक्षणाकरिता अंदाज समितीला पाठविले. यावेळी बावनथडी संघर्ष समितीच्यावतीने समितीचे स्वागत करून बावनथडीचे काम कालबद्ध वेळेत पुर्ण करण्यासंबंधी निवेदन दिले.धरणात साठविलेल्या पाण्याचा साठा १०० टक्के क्षमतेपर्यंत होईल या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करावी, बावनथडी प्रकल्पामुळे अंदाजे १७,००० हेक्टर भूमीसिंचनाची अपेक्षा असून त्याकरिता १,००० आऊटलेट गरज असून उपवितरीकेची तात्काळ निर्मिती करणे, विस्थापितांचे १०० टक्के पुनवर्सन व सोयी सुविधासह जमिनीचा मोबदला देण्यात यावा. तसेच प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या भिती २५ ते ३० वर्ष जुनाट असून कालव्यात जंगली रोपट्यांची लागवड झाली. त्यावरील जीर्ण पुलांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे, मुख्य कालव्यातून तुमसर तालुक्यातील खापा, मांगली, सुकळी, मांढळ, देव्हाडी, सिवनी, कोष्टी, बाम्हणी इत्यादी गावातातील अंतिम टोकापर्यंत पाणी पोहचत नाही त्यात तांत्रिक दृष्ट्या उपवितरिकेचे निर्माण झाले नसल्याने व आवश्यक उतार मिळत नसल्याने पाणी पोहचत नाही त्या करिता उपाययोजना करावी, बावनथडी प्रकल्पाचे कार्यालय गोंदिया येथे आहे. वास्तविक पाहता प्रकल्पापासून १२५ कि.मी. अंतरावर कार्यालय असल्याने आवश्यक कामे करण्यासाठी जास्त वेळ व पैसा खर्च होत असल्यामुळे कामांत दिरंगाई होत आली असून प्रकल्पाची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. पुर्वी चार उपअभियंता कार्यालये होती आता दोन उपअभियंता कार्यालये शिल्लक असून अधिकारी नाही. परिणामी प्रकल्पाच्या कामात अडथळा होत आहे. गोंदिया येथील कार्यालयाचे तुमसरात स्थलांतर करावे, आवश्यकतेप्रमाणे शाखा कार्यालयाची स्थापना करून कालबद्ध वेळेत बावनथडी प्रकल्प पुर्णत्वास आणण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तारीक कुरैशी, सचिव टाटा लांजेवार यांनी अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतेकर यांना केली. (शहर प्रतिनिधी)